शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून कामगारावर लोखंडी सळईने हल्ला: ११ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:44 IST

ठाणे : पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार देणाऱ्याला मदत केल्याच्या रागातून श्यामसुंदर कांबळे (वय ४३) याच्यासह १३ जणांच्या टोळक्याने लोखंडी ...

ठाणे : पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार देणाऱ्याला मदत केल्याच्या रागातून श्यामसुंदर कांबळे (वय ४३) याच्यासह १३ जणांच्या टोळक्याने लोखंडी सळईने साहेबराव गायकवाड (४२) यांना जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी श्यामसुंदर याच्यासह ११ जणांना अटक केली आहे.

तुर्केपाडा, घोडबंदर रोड येथील रहिवासी सुशिला वाघमारे यांच्याकडे राजाभाऊ चव्हाण याच्यासह चौघांनी चार हजारांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी २५ ऑगस्ट रोजी सुशिला यांच्यासमवेत तक्रार दाखल करण्यासाठी साहेबराव गायकवाड गेले होते. याच गोष्टीचा राग मनात धरुन २५ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजण्याच्यासुमारास आम्रपाली गायकवाड या त्यांच्या घरात पाहुणे मंडळींसह जेवण करीत असताना श्याम कांबळे याने आपल्या साथीदारांसह त्यांच्या घरात शिरकाव केला. त्यानंतर किसन पाईकराव आणि श्याम यांनी आम्रपाली यांचे पती साहेबराव यांच्या डाव्या पायावर आणि हातावर लोखंडी सळईने जबर मारहाण केली. संदीप शेळके, अमोल पाईकराव आदी सात ते आठजणांनी त्यांना हाताने मारहाण केली. त्याचवेळी आम्रपाली यांची मुलगी श्रद्धा आणि नणंद राधा माधळकर यांनाही मारहाण करून शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या घरावर दगडफेक करीत घरातील सामानाचेही नुकसान केले. याबाबत गायकवाड कुटुंबियांनी २६ ऑगस्ट रोजी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने श्याम कांबळे, संदीप शेळके, किसन पाईकराव, अमोल पाईकराव, संजू चौरे, गजानन तारपे, सुभाष नरवडे आणि मोकिंदा नरवडे आदी ११ जणांना गुरुवारी रात्री अटक केली. या सर्वांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.