शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

३२१ किलो कचऱ्यापासून १०० किलो जैविक खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:44 IST

ठाणे : ठाणे शहरात कचऱ्याची समस्या भेडसावत असताना कचराकुंडीत किंवा कचराभूमीवर घरातील कचरा जाण्यापासून पर्यावरणप्रेमी प्रतीक वालावलकर या तरुणाने ...

ठाणे : ठाणे शहरात कचऱ्याची समस्या भेडसावत असताना कचराकुंडीत किंवा कचराभूमीवर घरातील कचरा जाण्यापासून पर्यावरणप्रेमी प्रतीक वालावलकर या तरुणाने रोखला आहे. प्रतीकच्या घरातील कोणताही विघटनशील कचरा हा घराबाहेर जात नाही. घरातच तो विघटनशील कचऱ्यापासून जैवखत बनवून सुका (अविघटनशील) कचरा पुनःप्रक्रियेसाठी देत आहे. आतापर्यंत त्याने विघटनशील कचऱ्याचे १०० किलो दर्जेदार जैव खतात रूपांतर केले. जवळपास ३२१ किलो सेंद्रिय कचऱ्याच्या विघटनातून ३१ टक्के जैव खताचे उत्पन्न मिळाल्याचे प्रतीकने सांगितले.

परिसरात दुर्गंधी आणि रोगराई पसरविण्यास कारणीभूत ठरणारा सेंद्रिय कचरा घराबाहेर न जाता त्याचे घरच्याघरीच दुर्गंधीविरहित शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होऊन जैव खतात रूपांतर व्हावे, या विचारातून प्रतीकने घरातच सेंद्रिय कचऱ्यापासून जैव खतनिर्मिती या प्रकल्पांतर्गत सेंद्रिय कचरा खाणारी बादली वापरायला २० सप्टेंबर २०१७ रोजी सुरुवात केली. २० सप्टेंबर २०१७ ते २८ मार्च २०२१ या १२८५ दिवसांत (३ वर्षे आणि १८९ दिवस) या प्रकल्पामुळे घरातील जवळपास ३२१ किलोग्रॅम सेंद्रिय कचरा प्रतीक आणि त्याच्या कुटुंबाने कचराकुंडीत आणि ओघाने शहरातील कचराभूमीवर जाण्यापासून रोखला. त्या कचऱ्याचे झाडांच्या वाढीकरिता आणि मातीची सुपीकता, तिचा पोत वाढविण्याकरिता आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांनी युक्त अशा दर्जेदार जैव खतात रूपांतर केले. या प्रक्रियेत प्रतीक आणि त्याचे कुटुंबीय घरात दररोज उत्पन्न होणारा सेंद्रिय कचरा शक्य तेवढा बारीक चिरून तो जैव खतनिर्मितीच्या बादलीत नीट पसरवून टाकतात आणि बादलीतील जैवविघटन प्रक्रिया कार्यान्वित झालेल्या थराशी तो एकरूप होईल अशा पद्धतीने तो ढवळतात; ज्याकरिता पंधरा ते वीस मिनिटे लागतात.

सुक्या कचऱ्याचे पुनर्रचक्रीकरण

उत्कृष्ट प्रतीचे जैव खत नजरेने, गंधाने आणि स्पर्शाने ओळखण्याच्या काही खुणा आहेत आणि या सगळ्या खुणा आमच्या जैव खताशी अगदी तंतोतंत जुळतात असे निरीक्षण प्रतीकने नोंदविले. त्याच्या घरातील ई-वेस्टसह कागद, प्लास्टिक, काच, धातू, लाकूड, कापड, रबर, चामडे असा सर्व प्रकारचा सुका कचरा पुनर्चक्रीकरणाकरिता दिला जातो, असे तो अभिमानाने सांगतो.