शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

इथल्या कष्टकरी, श्रमिकांना जगण्यासाठी उभारी हवीय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:46 IST

दोन महिन्यांहून अधिक काळ लादलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल. त्यामुळे टाळेबंदीचा परतीचा प्रवास सुरू झाला.

दोन महिन्यांहून अधिक काळ लादलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल. त्यामुळे टाळेबंदीचा परतीचा प्रवास सुरू झाला, असे म्हणायला हरकत नाही. जनजीवन पूर्वपदावर येणार असल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत आपली दिनचर्या सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले. परंतु या टप्पयावर शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेत महत्त्वाचा बदल झाला, तो म्हणजे अगदी सुरुवातीला देशभर टाळेबंदी सुरू करताना प्रधानमंत्र्यांनी कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याची भूमिका घेतली होती. त्यात बदल करून आता कोरोनाशी युद्ध नव्हे तर कोरोनासह जगायला शिकू या, अशी भूमिका आहे.

महाराष्ट्र राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी नुकतेच लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी झाल्याचे प्रतिपादन केले. त्यांच्या मते महाराष्ट्रात कोरोना प्रसाराचा वेग राज्यात कमी झाला आहे. एका माणसाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तो इतर किती जणांना संसर्ग करू शकतो, याला ‘संसर्गदर’ म्हणतात. तो आपल्याकडे मार्च महिन्यामध्ये ४ च्या आसपास होता तर आता आपल्या सर्वांगीण प्रयत्नामुळे १.२३ पर्यंत खाली आला आहे. तो आणखीन खाली येण्यासाठी नागरिकांचे सहकार्य हवे आहे. 

एकीकडे शासकीय अधिकारी भलावण करतात तर दुसरीकडे सोलापुरातील कष्टकºयांनी व्यापलेल्या भागातील चित्र चिंता करायला लावतेय. बाधितांची संख्या, मृतांची संख्या, रुग्णसेवेची कमतरता गरीब रुग्णांची हेळसांड आणि खासगी डॉक्टरांचा नकार, अशा अनेक गोष्टींमुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांची बदली झाली. राज्य शासन आणि प्रशासन सोलापूरविषयी उशिरा का होईना जागे झाले हेही नसे थोडके. इथले कारखानदार आणि कष्टकरीवर्ग खूपच भयभीत आणि भविष्याविषयी चिंतित आहेत. टाळेबंदी उठून जनजीवन सुरू झाले तरीही मोकळेपणाने सहभाग देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. सगळेच अस्वस्थ आहेत. कारण टाळेबंदीच्या काळातील श्रमिकांचा अनुभव खूपच जीवघेणा होता, दुर्दैवाने अजूनही आहे. हातावर पोट असणाºयांना उपाशीपोटी राहावे लागले. त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नाही.. म्हणून स्वत:च्या डोळ्यांदेखत बायको, मुलांना तडफडताना पाहिलेल्या मजुरांची जगण्याची उमेद खचली, तर कारखानदार या महामारीने हादरून गेले आहेत. कारखाने चालू करण्याच्या मानसिकतेत नाहीत. 

खरेतर कोरोना विषाणूने इथल्या समाजजीवनामध्ये विष कालवले असेच म्हणावे लागेल. आजपर्यंत ज्यांच्यासोबत एकत्रित राहिलो त्यांच्याशी दूर राहावे लागतेय. श्रीमंत लोकांचा कष्टकºयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तसं पाहिलं तर ‘सोशल डिस्टन्स’मुळे समाजातल्या सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवहारालाच मर्यादा आल्या. समाज दुभंगला. देवळे, मशिदी, चर्च बंद. शाळा-महाविद्यालये बंद. सण, उत्सव, परंपरा साजरा करता येत नाहीत. त्यामुळे लोकांनी जन्मल्यापासून पोसलेली सांस्कृतिक मानसिकता घायाळ झाली. लग्न, वाढदिवस. जयंत्या, पुण्यतिथ्या अशा सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आली. शतकानुशतकांची परंपरा असणारी पंढरीची वारी यंदा पायी जाणार नाही. ही गोष्टच लाखो वारकºयांना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या मान्य न होणारी आहे. हॉटेल्स, मॉल्स, सिनेमा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, नृत्य, गाणी आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमांवर बंदी आल्यामुळे लोकांच्या भावना आणि मनं थिजली. पूर्वीप्रमाणे आप्तेष्टांच्या भेटीगाठी थांबल्यामुळे व्यक्त होणं थांबलं. गप्पा बंद झाल्या. मोकळं होणंच थांबल्यामुळे सगळेच अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थताच कष्टकºयांच्या अनारोग्याला कारणीभूत ठरते. आर्थिक परिस्थिती बदलल्याशिवाय आरोग्य सुधारणे शक्य नाही. 

नाशिकच्या मालेगावमधील यंत्रमाग कारखाने चालू झाले, तर मग सोलापुरातील कारखाने बंद का? केंद्रीय मंत्रिमंडळाने आत्मनिर्भर भारत घोषित करून लघु आणि मध्यम उद्योग सक्षम करण्याची योजना जाहीर केली, त्याचा फायदा घेत सोलापुरातील चादर कारखाने सुरू व्हायला हवेत. त्यातून कारखानदारांचे पुनर्वसन आणि कामगारांना रोजगार मिळेल. पोटभर जेवण आणि अंगभर काम मिळाले की, आरोग्य आपोआप सुधारेल. हे सारं व्यक्त होण्याचा मथितार्थ एकच आहे. इथल्या कष्टकरी, श्रमिकांना जगण्यासाठी उभारी हवीय.. एवढेच...!- प्रा. विलास बेत (लेखक परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी