शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

उजनीतून सोडलेले पाणी शेतकरी हितासाठी की वीजबिल वसुलीसाठी? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:26 IST

पावसाळा सुरू होऊन अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी पंढरपूर तालुक्यात विहीर व बोअरची पाणीपातळी वाढण्यासारखे पर्जन्यमान ...

पावसाळा सुरू होऊन अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी पंढरपूर तालुक्यात विहीर व बोअरची पाणीपातळी वाढण्यासारखे पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पिके धोक्यात येऊ लागली आहेत. अशातच उजनी धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांमधून मागणी जोर धरू लागली होती. याचा शासनस्तरावर विचार करून कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आणि कालव्याला पाणी सोडले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु वीजबिल भरा, अन्यथा रोहित्रच बंद करण्याचा पराक्रम वीज वितरणने सुरू केला आहे. त्यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी शेतीसाठी का वीजबिल वसुलीसाठी, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार

रासायनिक खते, कीटकनाशके आणि मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. परंतु शेतमालासह भाजीपाला कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. असे असताना रोहित्रामध्ये केवळ तेल टाकावे लागले तरीही बिल भरण्याचा अट्टाहास वीज वितरणकडून केला जातो. त्यामुळे रोहित्रामध्ये किरकोळ बिघाडापासून ते जळलेला भरण्यापासूनचा खर्च अनेकवेळा शेतकरी पदरमोड करून करणे सोयीचे समजतात. तरीही वीजबिलाच्या वसुलीसाठी रोहित्र बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केला जातोय, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

कोट ::::::::::::::

वीजबिल भरल्याशिवाय महावितरण चालणार नाही. परंतु सध्या शेतकरीही आर्थिक अडचणीत आहे. वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस मुदतवाढ द्यावी, यासाठी मी प्रयत्न करीत आहे.

- बबनराव शिंदे

आमदार, माढा

कोट ::::::::::::::::::

भाजप सरकारच्या काळात कधीही शेतकऱ्यांची वीज खंडित केली नाही. कोरोनाच्या काळात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शासनाने मदत करणे गरजेचे असताना वीजबिलासाठी वीज खंडित करण्याचा चालू असलेला प्रकार चुकीचा आहे, हे त्वरित बंद करावे.

- समाधान आवताडे

आमदार, पंढरपूर-मंगळवेढा