शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

उजनीतून सोडलेले पाणी शेतकरी हितासाठी की वीजबिल वसुलीसाठी? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:26 IST

पावसाळा सुरू होऊन अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी पंढरपूर तालुक्यात विहीर व बोअरची पाणीपातळी वाढण्यासारखे पर्जन्यमान ...

पावसाळा सुरू होऊन अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी पंढरपूर तालुक्यात विहीर व बोअरची पाणीपातळी वाढण्यासारखे पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पिके धोक्यात येऊ लागली आहेत. अशातच उजनी धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांमधून मागणी जोर धरू लागली होती. याचा शासनस्तरावर विचार करून कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आणि कालव्याला पाणी सोडले. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु वीजबिल भरा, अन्यथा रोहित्रच बंद करण्याचा पराक्रम वीज वितरणने सुरू केला आहे. त्यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी शेतीसाठी का वीजबिल वसुलीसाठी, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार

रासायनिक खते, कीटकनाशके आणि मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. परंतु शेतमालासह भाजीपाला कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. असे असताना रोहित्रामध्ये केवळ तेल टाकावे लागले तरीही बिल भरण्याचा अट्टाहास वीज वितरणकडून केला जातो. त्यामुळे रोहित्रामध्ये किरकोळ बिघाडापासून ते जळलेला भरण्यापासूनचा खर्च अनेकवेळा शेतकरी पदरमोड करून करणे सोयीचे समजतात. तरीही वीजबिलाच्या वसुलीसाठी रोहित्र बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केला जातोय, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

कोट ::::::::::::::

वीजबिल भरल्याशिवाय महावितरण चालणार नाही. परंतु सध्या शेतकरीही आर्थिक अडचणीत आहे. वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस मुदतवाढ द्यावी, यासाठी मी प्रयत्न करीत आहे.

- बबनराव शिंदे

आमदार, माढा

कोट ::::::::::::::::::

भाजप सरकारच्या काळात कधीही शेतकऱ्यांची वीज खंडित केली नाही. कोरोनाच्या काळात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शासनाने मदत करणे गरजेचे असताना वीजबिलासाठी वीज खंडित करण्याचा चालू असलेला प्रकार चुकीचा आहे, हे त्वरित बंद करावे.

- समाधान आवताडे

आमदार, पंढरपूर-मंगळवेढा