शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पंढरीत वारकऱ्यांना फटका

By admin | Updated: July 13, 2014 01:32 IST

रेल्वे कर्मचाऱ्यांचे अज्ञान; तिकीट मागितले एका गावचे दिले दुसरीकडचे

पंढरपूर : पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या हजारो भाविकांनी घरी परतत असताना रेल्वेने जाणे पसंत केले आहे, परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अज्ञानामुळे अनेक भाविकांना स्वत:च्या गावाऐवजी दुसऱ्याच गावचे तिकीट दिल्याने नाहक आर्थिक तसेच मानसिक भुर्दंड मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला.गुरूवारी आषाढी एकादशी असल्याने त्या दिवशी चंद्रभागेत पवित्र स्नान करून विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेतले. गुरूवारी सकाळपासूनच रेल्वे स्थानकावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तिकीट खिडकीमध्ये तिकीट विक्रीचे काम करण्यासाठी नवीन कर्मचारी असल्याने त्यांना प्रत्येक गाड्यांचे क्रमांक माहीत नव्हते. यामुळे अनेक भाविकांना ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणच्या पुढच्या गावाचे तिकीट वाटण्यात येत होते. यामुळे अनेक भाविकांना विनाकारण जादा खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत होता.असाच प्रकार दीपक उखरूड महाजन, मनोज प्रभाकर महाजन, अनिता दीपक महाजन, द्वारकाबाई नामदेव चौधरी, तुळशीदास चंद्रकांत चौधरी, योगिता तुळशीदास चौधरी, अनिल केशव चौधरी व मंगला अनिल चौधरी (रा. सर्व वाघोड, ता. रावेर, जि. जळगाव) यांच्याबरोबर घडला. या सर्वांना बुऱ्हाणपूरपर्यंत जाण्याचे तिकीट हवे होते, परंतु त्यांना भुसावळपर्यंत तिकीट मिळेल म्हणून सांगण्यात आले. त्यांनी पर्याय नसल्याने तिकीट विकत घेतले. परंतु त्यांच्या समोरच काही भाविकांना त्यांना हवे असलेले गावापर्यंतचे तिकीट दिले. यामुळे महाजन कुटुंबीयांनी परत तिकीट बदलून मागितले, परंतु तिकीट विक्री करणाऱ्यांनी त्यांना दमदाटी करून माघारी पाठविले.संतप्त भाविकांनी पंढरपूर येथील रेल्वेचे मुख्य वाणिज्य अधिकारी एम. के. गोसावी यांच्याकडे दाद मागितली असता त्यांच्याकडेही त्यांना न्याय मिळाला नाही. यामुळे त्यांनी आषाढी यात्रेनिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आलेल्या उपविभागीय वाणिज्य व्यवस्थापक ए. एस. रिसभूड यांच्याकडे धाव घेतली. ए. एस. रिसभूड यांनी महाजन यांना तिकीट विक्री केंद्रात त्या तिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे नेऊन तिकीट रद्द करून दुसरे तिकीट दिले. सर्व तिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असा प्रकार करू नका, असा आदेश दिला.