शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

विठ्ठलाच्या उत्पन्नात चौपट वाढ

By admin | Updated: July 12, 2014 00:15 IST

बडवे-उत्पातांशिवाय पहिलीच वारी: गर्दी कमी असूनही वाढले दान

पंढरपूर: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बडवेमुक्त झाल्यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नामध्ये गतवर्षीपेक्षा यंदा चौपट वाढ झाली असून यंदा १८ लाख ७६ हजार ३५८ रूपयांचे दान विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावर गोळा झाले आहे. गतवर्षी ६ लाख ४५ हजार २०० रूपये गोळा झाले होते. प्रत्येक वर्षी आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रमुख पालख्यांबरोबर लाखो भाविक पंढरीत दाखल होत असतात, हे सर्वांनाच माहिती आहे. यामुळे पंढरपूर शहराबरोबरच इतर गावातील व्यापारी माल खरेदी लवकर येतात. यंदाच्या वर्षीही असाच प्रकार घडला. परंतु आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रमुख पालख्यांसह भाविकांची गर्दी कमी असल्याचे जाणवत होते. यामुळे सर्व चिंतीत पडले. दशमीच्या दिवशी सकाळी काहीच गर्दी नव्हती. परंतु त्याच दिवशी सायंकाळी भाविकांची गर्दी वाढली. एकादशीदिवशी पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावरच जादा गर्दी होती. त्यानंतर द्वादशीदिवशी पंढरपूर मोकळे झाले. यामुळे व्यापाऱ्यांना अपेक्षीत असा व्यवसाय झाला नाही.असे असले तरी विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नावर याचा काहीच परिणाम जाणवला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बडवे-उत्पातांना मंदिरातून बाहेर काढल्याने विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावर थेट पडणारी रक्कम मंदिर समितीच्या उत्पन्नात जमा झाली आहे.यामुळे यंदाच्या वर्षी गतवर्षीच्या तुलनेने मंदिर समितीला जादा उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी आषाढ पंधरवड्यात विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावरील दानासाठी बडवे-उत्पातांनी ६ लाख ३२ हजार २०० रूपयांना लिलाव घेतला होता. यामुळे एवढीच रक्कम मंदिर समितीला मिळाली होती. परंतु यंदाच्या वर्षी विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावरील दान थेट मंदिर समितीला मिळाले आहे. यामुळे मंदिर समितीला २० लाख २७ हजार ३५८ रूपये उत्पन्न मिळाले.--------------------बडवे-उत्पातांविना पहिलीच वारीउच्च न्यायालयाच्या आदेशान्वये यंदाच्या वर्षी बडवे-उत्पात मुक्त आषाढी झाली आहे. या आषाढीमध्ये दोन्ही समाजाकडून आणल्या जात असलेल्या यजमानांचा त्रास भाविकांना सहन करावा लागला नाही. त्याचबरोबर विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावरील बडवे-उत्पात मंडळींकडून मागण्यात येणारी दक्षिणा बंद झाल्याने दर्शनरांग सुरळीत व व्यवस्थित पुढे जात होती असे सांगण्यात आले़------------------यंदाच्या वर्षी दुष्काळामुळे भाविकांच्या संख्येत घट असली तरी मंदिर समितीच्या उत्पन्नात काहीही फरक जाणवला नसून याउलट मंदिर समितीला जास्तच उत्पन्न मिळाले आहे.- संजय तेली कार्यकारी अधिकारी,विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती