शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

‘सांडपाणी’ असा गोंडस शब्दप्रयोग करून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:22 IST

करमाळा : उजनी जलाशयाच्या उर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे ‘सांडपाणी’ असा गोंडस शब्दप्रयोग करून जलसंपदा खात्याने ...

करमाळा : उजनी जलाशयाच्या उर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे ‘सांडपाणी’ असा गोंडस शब्दप्रयोग करून जलसंपदा खात्याने राज्य शासनाची दिशाभूल केली आहे. यावर उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. उजनीवर अवलंबून असणाऱ्या मूळ उजनी धरणग्रस्तांसाठी अतिशय अन्यायकारक आहे. त्यामुळे ही योजना तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.

यावेळी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, माजी सभापती शेखर गाडे, बाजार समितीचे संचालक आनंदकुमार ढेरे, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, संदीप यादव, सुनील भोसले, बाळासाहेब टकले, युवासेनेचे शंभूराजे फरतडे, सरपंच दादा कोकरे, संभाजी रिटे, गणेश घोरपडे, गंगाधर वाघमोडे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आह की, जलसंपदा विभागाने २२ एप्रिल रोजी एक आदेश काढून कृष्णा खोरे विकास महामंडळास उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी उचलून मुळा मुठा उजव्या कालव्यात सोडून खडकवासला प्रकल्पाचे सिंचन स्थिरीकरण करण्यासाठी आवश्‍यक त्या बाबींच्या पूर्तता करण्याच्या सूचना लेखी पत्रान्वये दिलेल्या आहेत. या प्रस्तावित योजनेचा पूर्वसंभाव्यता अहवाल व्यवहार्य असल्याची खातरजमा करणे, योजनेचा सविस्तर सर्व्हे करून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देणे, तसेच योजनेसाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देणे आदी सूचना दिलेल्या आहेत.

वस्तुत: उजनी जलाशयाच्या उर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे ‘सांडपाणी’ असा गोंडस शब्दप्रयोग करून जलसंपदा खात्याने राज्य शासनाची दिशाभूल केली आहे. उजनी जलाशयातील पाणीवाटप खरं तर यापूर्वीच पूर्ण झालेलं आहे. मूळ सिंचन आराखडाप्रमाणे आता यापुढे पाणी कोणत्याही उपसा सिंचन योजनेस देता येत नाही.

सांडपाण्यावरचा हक्क कोणी ठरविला

सांडपाण्याच्या नावाखाली खडकवासला प्रकल्पाचे स्थिरीकरण करताना, सांडपाण्यावर फक्त या योजनेचाच हक्क आहे का, हे कुणी ठरवले, उलट सांडपाणी शुद्ध करून ते उजनीत सोडून उजनीवर असलेला ताण कमी करणं गरजेचं आहे. सांडपाण्याच्या गोंडस नावाखाली खडकवासला प्रकल्पाचे स्थिरीकरण करण्याचा घातलेला घाट, उचललं जाणारं पाणी ही उजनी जलाशयाची हत्याच ठरेल.

दरवर्षी उन्हाळ्यात उजनी धरण मृत साठ्यात जाते. मृत साठ्यात वजा पन्नास टक्के इतके पाणी अनेकदा खाली जाते. या काळात सर्व पाणीपुरवठा योजना बंद पडल्याची वस्तुस्थिती आहे. उजनीच्या लाभक्षेत्रातील सर्व शेती ओसाड पडलेली असते. सहा- सहा महिने लाभक्षेत्रात पाणी सोडता येत नाही. अशी स्थिती अनेकदा निर्माण झालेली असते. त्यात पुन्हा पाच टीएमसी पाणी उचलणे म्हणजे धरणग्रस्तांवर फार मोठा अन्याय आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही असे निवेदनात म्हटले आहे.

फोटो ओळी : उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देताना पदाधिकारी.