उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांना राजकारणात पोळले आहे. गावात भांडणतंटे करुन पोलीस स्टेशन व न्यायालयाच्या पायऱ्या झिजवून कार्यकर्ते आर्थिक अडचणीत आले आहेत. अनेक वर्षांपासूनचा कटू अनुभव लक्षात घेता अनेक गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामध्ये पडसाळीचाही समावेश आहे. शेतीसाठी विजेचा पुरवठा पुरेशा दाबाने होत नसल्याची येथील प्रमुख समस्या. या विषयावर संपूर्ण गाव एकत्र आला अन् संपूर्ण ९ सदस्य अविरोध करण्याचा निर्णय झाला.
मात्र अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी दोघे इच्छुक होते. दोघेही सामंजस्य असल्याने चिठ्ठीद्वारे एकाचे नाव अंतिम करण्यासाठी एकमत झाले. समाधान रोकडे व धर्मा रोकडे यांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यात धर्मा रोकडे यांच्या नशिबी सदस्यपद होते. एकच जागा असल्याने धर्मा रोकडे बिनविरोध सदस्य झाले. बुधवारी झालेल्या आरक्षण सोडतीत पडसाळी गावचे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने धर्मा रोकडे यांच्या सरपंचपदावर शिक्कामोर्तब झाले.
-----
असाच प्रकार साखरेवाडीच्या हिराबाई भागवत सुतार यांच्याबाबत झाला आहे. साखरेवाडी गावही निवडणुकीवेळी गटबाजीतुन
होणार्या भांडणाला वैतागले आहे. म्हणून गावकर्यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यात हिराबाई सुतार बिनविरोध सदस्य झाल्या व बुधवारी निघालेल्या आरक्षणात सरपंचपदाची संधी मिळाली आहे.