शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांची उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:22 IST

सोलापूर जिल्ह्यामध्ये १२ नगर परिषदा होत्या. मात्र, मागील महिन्यात अकलूज, महाळुंग, वैराग व नातेपुते या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा ...

सोलापूर जिल्ह्यामध्ये १२ नगर परिषदा होत्या. मात्र, मागील महिन्यात अकलूज, महाळुंग, वैराग व नातेपुते या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. वॉर्डात मतदार संख्या मर्यादित असते. त्यामुळे अनेकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाॅर्डात विविध कार्यक्रम, कोरोनाकाळात लोकांना मदत केली होती. वाॅर्डातील मर्यादित मतदार संख्येमुळे आर्थिक खर्चदेखील उमेदवारांना परवडणारा असतो. मात्र, वाॅर्डनिहायऐवजी प्रभागनिहाय निवडणुका झाल्यास एका प्रभागात अधिक मतदार असणार आहेत. नव्या इच्छुक कार्यकर्त्यांना व अपक्ष उमेदवारांना आर्थिक सांगड घालणे कठीण होणार आहे. आपल्या वाॅर्डात सक्षम असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तर प्रभागात मतदार जादा असल्याने निवडणूक लढवणे अवघड होणार आहे.

...............

असा असणार मतदान अधिकार

महानगरपालिकेत तीन वाॅर्डांचा एक प्रभाग असणार आहे. त्याचबरोबर अ व ब वर्ग असलेल्या नगर परिषदेत दोन वाॅर्डांचा एक प्रभाग आहे. यामुळे येथील मतदारांना एका वेळी दोन उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. तर क वर्ग असलेल्या नगर परिषदेत वाॅर्डनिहाय प्रभाग रचना आहे. यामुळे येथील मतदारांना एकाच उमेदवाराला मतदान करता येणार आहे.

.............

वर्गनिहाय नगर परिषद

बार्शी - अ, पंढरपूर - ब, अक्कलकोट - ब, करमाळा ( क), दुधनी (क), मंगळवेढा (क), सांगोला (क), माढा (क), मोहोळ (क), कुर्डुवाडी ( क), मैदर्गी (क), माळशिरस - क, श्रीपूर- माहळुंग - क, अकलूज (क) , वैराग (क), नातेपुते (क)

..............

अगामी नगरपालिका निवडणुका वाॅर्डनिहाय झाल्या, तर सर्वांचा फायदाच होईल. मोठ्या प्रभागात नगरसेवक आणि नागरिक यामधील संवादाचा अभाव दिसतो. छोट्या वाॅर्ड रचनेमध्ये नगरसेवक ही चांगले काम करू शकतील.

-योगेश आधटराव, नागरिक, पंढरपूर

...................

प्रभागनिहाय निवडणुका होणार असल्याने पक्षनिहाय निवडणुका होतील. याचा फायदा निधी उपलब्ध करून घ्यायला होणार आहे. यामुळे शहराच्या विकासाला अधिक निधी मिळून शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल.

- मुकुंद पवार, प्राध्यापक, पंढरपूर

..........

सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक प्रभागात दोन उमेदवार राहतील व नागरिकांचे प्रश्न अधिक सुटले जातील. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रतिनिधी सहजरीत्या उपलब्ध होतील.

-सुधीर अभंगराव, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

.........................

राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्यामुळे याचा फायदा आघाडी सरकारला निश्चित होऊ शकतो.

-उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

.....................

दोन उमदेवार एका प्रभागात असतील त्या प्रभागातील विकास कामे, रस्ता, ड्रेनेज व अन्य कामे अधिक चांगल्यारीत्या मार्गी लागतील. शहराच्या विकासासाठी प्रभागनिहाय निवडणुका होणे गरजेचे आहे.

-धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

......................

वाॅर्डनिहाय उमेदवार असल्यास जबाबदारी निश्चित होते. प्रभाग रचना असल्यास जबाबदार कोणाला धरायचे, काम कोणाला सांगायचे, याबाबत नागरिक अस्वस्थ असतात. वाॅर्डनिहाय निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीचा निभाव लागणार नाही.

-श्रीकांत देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप