शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांची उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:22 IST

सोलापूर जिल्ह्यामध्ये १२ नगर परिषदा होत्या. मात्र, मागील महिन्यात अकलूज, महाळुंग, वैराग व नातेपुते या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा ...

सोलापूर जिल्ह्यामध्ये १२ नगर परिषदा होत्या. मात्र, मागील महिन्यात अकलूज, महाळुंग, वैराग व नातेपुते या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. वॉर्डात मतदार संख्या मर्यादित असते. त्यामुळे अनेकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाॅर्डात विविध कार्यक्रम, कोरोनाकाळात लोकांना मदत केली होती. वाॅर्डातील मर्यादित मतदार संख्येमुळे आर्थिक खर्चदेखील उमेदवारांना परवडणारा असतो. मात्र, वाॅर्डनिहायऐवजी प्रभागनिहाय निवडणुका झाल्यास एका प्रभागात अधिक मतदार असणार आहेत. नव्या इच्छुक कार्यकर्त्यांना व अपक्ष उमेदवारांना आर्थिक सांगड घालणे कठीण होणार आहे. आपल्या वाॅर्डात सक्षम असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तर प्रभागात मतदार जादा असल्याने निवडणूक लढवणे अवघड होणार आहे.

...............

असा असणार मतदान अधिकार

महानगरपालिकेत तीन वाॅर्डांचा एक प्रभाग असणार आहे. त्याचबरोबर अ व ब वर्ग असलेल्या नगर परिषदेत दोन वाॅर्डांचा एक प्रभाग आहे. यामुळे येथील मतदारांना एका वेळी दोन उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. तर क वर्ग असलेल्या नगर परिषदेत वाॅर्डनिहाय प्रभाग रचना आहे. यामुळे येथील मतदारांना एकाच उमेदवाराला मतदान करता येणार आहे.

.............

वर्गनिहाय नगर परिषद

बार्शी - अ, पंढरपूर - ब, अक्कलकोट - ब, करमाळा ( क), दुधनी (क), मंगळवेढा (क), सांगोला (क), माढा (क), मोहोळ (क), कुर्डुवाडी ( क), मैदर्गी (क), माळशिरस - क, श्रीपूर- माहळुंग - क, अकलूज (क) , वैराग (क), नातेपुते (क)

..............

अगामी नगरपालिका निवडणुका वाॅर्डनिहाय झाल्या, तर सर्वांचा फायदाच होईल. मोठ्या प्रभागात नगरसेवक आणि नागरिक यामधील संवादाचा अभाव दिसतो. छोट्या वाॅर्ड रचनेमध्ये नगरसेवक ही चांगले काम करू शकतील.

-योगेश आधटराव, नागरिक, पंढरपूर

...................

प्रभागनिहाय निवडणुका होणार असल्याने पक्षनिहाय निवडणुका होतील. याचा फायदा निधी उपलब्ध करून घ्यायला होणार आहे. यामुळे शहराच्या विकासाला अधिक निधी मिळून शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल.

- मुकुंद पवार, प्राध्यापक, पंढरपूर

..........

सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक प्रभागात दोन उमेदवार राहतील व नागरिकांचे प्रश्न अधिक सुटले जातील. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रतिनिधी सहजरीत्या उपलब्ध होतील.

-सुधीर अभंगराव, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

.........................

राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्यामुळे याचा फायदा आघाडी सरकारला निश्चित होऊ शकतो.

-उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

.....................

दोन उमदेवार एका प्रभागात असतील त्या प्रभागातील विकास कामे, रस्ता, ड्रेनेज व अन्य कामे अधिक चांगल्यारीत्या मार्गी लागतील. शहराच्या विकासासाठी प्रभागनिहाय निवडणुका होणे गरजेचे आहे.

-धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

......................

वाॅर्डनिहाय उमेदवार असल्यास जबाबदारी निश्चित होते. प्रभाग रचना असल्यास जबाबदार कोणाला धरायचे, काम कोणाला सांगायचे, याबाबत नागरिक अस्वस्थ असतात. वाॅर्डनिहाय निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीचा निभाव लागणार नाही.

-श्रीकांत देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप