शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांची उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:22 IST

सोलापूर जिल्ह्यामध्ये १२ नगर परिषदा होत्या. मात्र, मागील महिन्यात अकलूज, महाळुंग, वैराग व नातेपुते या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा ...

सोलापूर जिल्ह्यामध्ये १२ नगर परिषदा होत्या. मात्र, मागील महिन्यात अकलूज, महाळुंग, वैराग व नातेपुते या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. वॉर्डात मतदार संख्या मर्यादित असते. त्यामुळे अनेकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाॅर्डात विविध कार्यक्रम, कोरोनाकाळात लोकांना मदत केली होती. वाॅर्डातील मर्यादित मतदार संख्येमुळे आर्थिक खर्चदेखील उमेदवारांना परवडणारा असतो. मात्र, वाॅर्डनिहायऐवजी प्रभागनिहाय निवडणुका झाल्यास एका प्रभागात अधिक मतदार असणार आहेत. नव्या इच्छुक कार्यकर्त्यांना व अपक्ष उमेदवारांना आर्थिक सांगड घालणे कठीण होणार आहे. आपल्या वाॅर्डात सक्षम असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तर प्रभागात मतदार जादा असल्याने निवडणूक लढवणे अवघड होणार आहे.

...............

असा असणार मतदान अधिकार

महानगरपालिकेत तीन वाॅर्डांचा एक प्रभाग असणार आहे. त्याचबरोबर अ व ब वर्ग असलेल्या नगर परिषदेत दोन वाॅर्डांचा एक प्रभाग आहे. यामुळे येथील मतदारांना एका वेळी दोन उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. तर क वर्ग असलेल्या नगर परिषदेत वाॅर्डनिहाय प्रभाग रचना आहे. यामुळे येथील मतदारांना एकाच उमेदवाराला मतदान करता येणार आहे.

.............

वर्गनिहाय नगर परिषद

बार्शी - अ, पंढरपूर - ब, अक्कलकोट - ब, करमाळा ( क), दुधनी (क), मंगळवेढा (क), सांगोला (क), माढा (क), मोहोळ (क), कुर्डुवाडी ( क), मैदर्गी (क), माळशिरस - क, श्रीपूर- माहळुंग - क, अकलूज (क) , वैराग (क), नातेपुते (क)

..............

अगामी नगरपालिका निवडणुका वाॅर्डनिहाय झाल्या, तर सर्वांचा फायदाच होईल. मोठ्या प्रभागात नगरसेवक आणि नागरिक यामधील संवादाचा अभाव दिसतो. छोट्या वाॅर्ड रचनेमध्ये नगरसेवक ही चांगले काम करू शकतील.

-योगेश आधटराव, नागरिक, पंढरपूर

...................

प्रभागनिहाय निवडणुका होणार असल्याने पक्षनिहाय निवडणुका होतील. याचा फायदा निधी उपलब्ध करून घ्यायला होणार आहे. यामुळे शहराच्या विकासाला अधिक निधी मिळून शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल.

- मुकुंद पवार, प्राध्यापक, पंढरपूर

..........

सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक प्रभागात दोन उमेदवार राहतील व नागरिकांचे प्रश्न अधिक सुटले जातील. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रतिनिधी सहजरीत्या उपलब्ध होतील.

-सुधीर अभंगराव, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

.........................

राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्यामुळे याचा फायदा आघाडी सरकारला निश्चित होऊ शकतो.

-उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

.....................

दोन उमदेवार एका प्रभागात असतील त्या प्रभागातील विकास कामे, रस्ता, ड्रेनेज व अन्य कामे अधिक चांगल्यारीत्या मार्गी लागतील. शहराच्या विकासासाठी प्रभागनिहाय निवडणुका होणे गरजेचे आहे.

-धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

......................

वाॅर्डनिहाय उमेदवार असल्यास जबाबदारी निश्चित होते. प्रभाग रचना असल्यास जबाबदार कोणाला धरायचे, काम कोणाला सांगायचे, याबाबत नागरिक अस्वस्थ असतात. वाॅर्डनिहाय निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीचा निभाव लागणार नाही.

-श्रीकांत देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप