ही रॅली काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली भगवंत मैदान येथून निघाली. ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पोहचून तेथे सभेत रूपांत झाले.
समारोपाच्यावेळी काॅ. तानाजी ठोंबरे म्हणाले, केंद्र सरकार हुकूमशाही पध्दतीने वाटचाल करीत आहे.,देशातील सर्वात मोठा घटक शेतकरी हे कायदा रद्द करण्याची मागणी करीत असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. परंतू कोणतीही तमा न बाळगता हे अंदोलन कायदे रद्द मागे घेवूनच थांबेल.
यावेळी किसान सभेचे काॅम्रेड लक्ष्मण घाडगे यानीही मनोगत व्यक्त केले.
रॅली यशस्वी करण्यासाठी किसान सभेचे काॅ. लक्ष्मण घाडगे, पैगंबर मुलाणी, काॅ. बाळासाहेब जगदाळे, सुनील जावळी, आयटक संलग्न डाॅ. जगदाळे मामा हाॅस्पीटल श्रमिक संघाचे काॅ. लहू आगलावे, काॅ. धनाजी पवार, काॅ. भारत भोसले, किसान मूळे, अनिल शिंदे, अनिसचे प्रा. ए.बी. कदम, विनायक माळी, ग्रामपंचायत संघटनेचे काॅ. ए. बी. कुलकर्णी, रशीद इनामदार, बांधकाम कामगार संघटनेचे काॅ. अनिरूध्द नखाते, बालाजी शितोळे, शफीन बागवान, संतोश मोहिते, आयटक महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटनेचे काॅ. प्रविण मस्तूद, परमेश्वर पवार, उमेश मदणे, सुधीर सेवकर, ऑल इंडिया स्टुडंन्टस फेडरेशनचे काॅ. पवन आहिरे, भारत पवार, दीपक कोकाटे, तूषार कांबळे, अविराज चांदणे, बँक संघटनेच्या सरिता कुलकर्णी आदी उपस्थित होते.
फोटो २७बार्शी-रॅली
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास समर्थन देण्यासाठी बार्शीत किसान सभेच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
----