शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ऊस वाहतूकदारांना मुकादमांकडून गंडा

By admin | Updated: December 19, 2014 00:26 IST

मजूर आलेच नाहीत : सुमारे ५0 ते ६0 कोटींचा फटका

प्रकाश पाटील - कोपार्डे --साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे. बहुतांश ऊस वाहतूक करणारे वाहनमालक मजूर बीड, उस्मानाबाद लातूर, जत, बार्शी या भागातून आणतात. यासाठी या ऊसतोड मजुरांना वाहनमालकांना मोठ्या प्रमाणात रक्कम अ‍ॅडव्हान्स म्हणून द्यावी लागते; पण अलीकडच्या काळात या ऊसतोड मजुरांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.यावर्षी तर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनमालकांकडून लाखोंची उचल करूनही किमान १२५ ते १५० ऊसतोड मजूर टोळ्या न आल्याने ५० ते ६० कोटींचा वाहनमालकांना गंडा बसला आहे.यावर्षी ऊसदर आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याने साखर कारखान्यांचे गाळप हंगाम नोव्हेंबरमध्येच सुरू झाले आहेत. जिल्ह्यात ऊस वाहतूक व तोडणीची एक पद्धत तयार आहे. यानुसार ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांना ऊसतोड मजुरांच्या टोळ्या करण्यासाठी अ‍ॅडव्हान्स दिली जाते. वाहनमालक ती घेऊन ऊसतोड मजूर पुरवठा करणाऱ्या मुकादमाला देतात. हा अ‍ॅडव्हान्स मुकादम सर्वसाधारण आॅगस्ट महिन्यात ऊसतोड मजुरांना पैसे देण्यासाठी घेत असतो. यावेळी कारखाने ज्या वाहनमालकाला हे पैसे अ‍ॅडव्हान्स द्यावयाचे आहे, त्यांच्याबरोबर करार करतात. त्यासाठी किमान चार मोठे शेतकरी जामीन घेतले जातात. त्यामुळे कारखान्यांच्या पैशाला हमी राहते. मात्र, वाहनमालक ज्या मुकादमाला अ‍ॅडव्हान्स म्हणून पैसे देतात. त्यांच्याकडून कोणतीच हमी न घेता केवळ विश्वासावर ८ ते १० लाख रुपये दिले जातात. मात्र, अलीकडे या मुकादमांकडून मोठ्या प्रमाणात विश्वासघात होत असून, पैसे उचलायचे मात्र ऊसतोड मजूर पुरवायचेच नाहीत, असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे वाहनमालकाचे वाहन एक तर बंद करून उभे ठेवावे लागते. त्याशिवाय ८ ते १० लाख रुपये मजुरांना देण्यासाठी हकनाक बुडाल्याने व त्याला वाहनमालकालाच जबाबदार धरले जाते. एवढ्या मोठ्या रकमेची भरपाई करायची कोठून हा यक्षपश्न या वाहनमालकांसमोर आहे. त्याशिवाय या रकमेला व्याज आकारले जाते ते वेगळेच. यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांच्यापुढे आत्महत्येशिवाय पर्यायच उरलेला नाही.१० ते १५ लाखांचे वाहन, ऊसतोड मजुरांसाठी एक टोळीला १० ते १२ लाखांचा अ‍ॅडव्हान्स देणे. डिझेलचे वाढलेले दर व कामापेक्षा मजुरांकडून होणारी जादा ऊचल यामुळे ऊस वाहतूक वाहन मालक म्हणजे व्याजात पिसणी झाले आहे. एवढे करूनही संपूर्ण हंगामात ५० ते ६० हजारांचे वाहन मालकांकडे शिल्लक राहते. त्यापेक्षा ५० रुपयांचा कोयता घेऊन ऊसतोड केल्यास किमान हंगामात ५० ते ६० हजारांचा धंदा होतो. त्याशिवाय जनावरांना वैरण मिळून शेतीची कामेही पाहता येतात. - विजय पाटील, वाहन मालक, कुडित्रे, ऊसतोड मजुरांची पटपडताळणी घोषणा हवेतचभाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी या प्रकरणातील दाहकता अनुभवली होती. यासाठी त्यानां स्वत: माजी कृषिमंत्री शरद पवार यांना शाळा पट पडताळणी प्रमाणे ऊसतोड मजुरांचीही पटपडताळणी करण्याची यंत्रणा निर्माण करावी, अशी विनंती केल्यानंतर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व कृषिमंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांनी २०११-१२ मध्ये ऊसतोड मजुरांची पटपडताळणी करण्याची घोषणा केली होती; पण ती हवेतच विरली.हंगाम सुरुवातील मराठवाड्यात ऊसतोड मजूर मुकादमांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. वाहनमालकांच्यावतीने त्यांना विनंती केली, तरीही १५ ते २० टोळ्या आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहनमालक, कारखाना यांचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच कारखान्यात आहे.- सुरेश अपराध, शेती अधिकारी, कुंभी-कासारीजिल्ह्यातील किमान १२५ ते १५० मजूर टोळ्या ऊसतोडीसाठी आल्याच नाहीतएकेका वाहनमालकांच्याकडून १० ते १२ लाख रुपये ऊसतोड मजुरांची उचल५० ते ६० कोटी रुपये उचल करून ऊसतोड मजूर आलेच नाहीत