शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

अनुदान कमी झालं अन्‌ खताच्या किंमती वाढल्या! बळीराजाचं कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:23 IST

शेतकऱ्यांच्या मालकीचे असणाऱ्या इफको या कंपनीने आपल्या खताच्या किमती जाहीर केल्या. १८४६ डीएपी या खताची किंमत १९०० रुपये प्रति ...

शेतकऱ्यांच्या मालकीचे असणाऱ्या इफको या कंपनीने आपल्या खताच्या किमती जाहीर केल्या. १८४६ डीएपी या खताची किंमत १९०० रुपये प्रति ५० किलो बॅगची झाली आहे. यापूर्वी या बॅगची किंमत १३०० रुपये होती. याच प्रमाणे १०:२६: २६ या खताची किंमत १७७५ रुपये झाली असून यापूर्वी या खताची किंमत ११७५ रुपये होती. १५:१५:१५ या खताची किंमत १५०० रुपये प्रति पॅक झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत १ हजार रुपये प्रति बॅग होती. १२:३२:१६ या खताची किंमत १८०० रुपये प्रति बॅग झाली असून यापूर्वी या खताची किंमत १२५० रुपये होती. तर २०:२०:० या खताची किंमत १३५० रुपये झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत ९५० रुपये होती.

तब्बल पाचशे ते सहाशे रुपये प्रमाणे खताच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अद्याप इतर कंपन्यांनी आपले दर जाहीर केलेले नाहीत.

सध्या बाजारात जुन्या दराचा लाखो मेट्रिक टन खते गोडावूनमध्ये असून या सर्व खतांचा खत विक्रेत्यांकडून काळाबाजार होण्याची शक्यता आहे.

गेल्या पंधरा - वीस वर्षाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात खताच्या किमती कधीच वाढलेल्या नव्हत्या. केंद्र सरकार रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यास टाळाटाळ करत असून रखडलेले अब्जावधी रुपयांचे अनुदान देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दाखवली आहे. यामुळे आता रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतात प्रचंड दरवाढ केली आहे.

कोट घेणे...

इफ्को कंपनीचे नवीन खताचे दर पत्रक पाहिले बघून धक्काच बसला. एवढी महाग खते झाली तर शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे होईल. खत वापरण्याचे प्रमाण कमी होईल. या दरवाढीचा शेतकरी म्हणून मी निषेध करतो.

-

राजेंद्र बारकुंड, शेतकरी चिखलठाण

---

दरवाढ अन्यायकारक असून, यापुढील काळात शेतकरी खत वापराचे प्रमाण कमी करतील. केंद्र शासनाने पुन्हा विचार करून रासायनिक खतांवरील अनुदान वाढवावे व रासायनिक खत उत्पादन कंपन्यांचे रखडलेले अनुदान तात्काळ कंपन्यांना द्यावे तरच खतांची दरवाढ नियंत्रणात राहील.

- धुळाभाऊ कोकरे, शेतकरी कुगाव.

---

कोरोनामुळे आयात होणारी खते बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आयात होणारी खते बंद झाली आहेत. फॉस्फरिक ॲसिडच्या किमती जागतिक बाजारात गगनाला भिडल्या आहेत यामुळे ही दरवाढ अटळ आहे. आता केंद्र शासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे किंवा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात खताचे अनुदान जमा करावे म्हणजे खताचा काळाबाजार कमी होईल आणि हवे तेवढेच शेतकरी खताचा वापर करतील, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

----