शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान कमी झालं अन्‌ खताच्या किंमती वाढल्या! बळीराजाचं कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:23 IST

शेतकऱ्यांच्या मालकीचे असणाऱ्या इफको या कंपनीने आपल्या खताच्या किमती जाहीर केल्या. १८४६ डीएपी या खताची किंमत १९०० रुपये प्रति ...

शेतकऱ्यांच्या मालकीचे असणाऱ्या इफको या कंपनीने आपल्या खताच्या किमती जाहीर केल्या. १८४६ डीएपी या खताची किंमत १९०० रुपये प्रति ५० किलो बॅगची झाली आहे. यापूर्वी या बॅगची किंमत १३०० रुपये होती. याच प्रमाणे १०:२६: २६ या खताची किंमत १७७५ रुपये झाली असून यापूर्वी या खताची किंमत ११७५ रुपये होती. १५:१५:१५ या खताची किंमत १५०० रुपये प्रति पॅक झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत १ हजार रुपये प्रति बॅग होती. १२:३२:१६ या खताची किंमत १८०० रुपये प्रति बॅग झाली असून यापूर्वी या खताची किंमत १२५० रुपये होती. तर २०:२०:० या खताची किंमत १३५० रुपये झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत ९५० रुपये होती.

तब्बल पाचशे ते सहाशे रुपये प्रमाणे खताच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अद्याप इतर कंपन्यांनी आपले दर जाहीर केलेले नाहीत.

सध्या बाजारात जुन्या दराचा लाखो मेट्रिक टन खते गोडावूनमध्ये असून या सर्व खतांचा खत विक्रेत्यांकडून काळाबाजार होण्याची शक्यता आहे.

गेल्या पंधरा - वीस वर्षाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात खताच्या किमती कधीच वाढलेल्या नव्हत्या. केंद्र सरकार रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यास टाळाटाळ करत असून रखडलेले अब्जावधी रुपयांचे अनुदान देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दाखवली आहे. यामुळे आता रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतात प्रचंड दरवाढ केली आहे.

कोट घेणे...

इफ्को कंपनीचे नवीन खताचे दर पत्रक पाहिले बघून धक्काच बसला. एवढी महाग खते झाली तर शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे होईल. खत वापरण्याचे प्रमाण कमी होईल. या दरवाढीचा शेतकरी म्हणून मी निषेध करतो.

-

राजेंद्र बारकुंड, शेतकरी चिखलठाण

---

दरवाढ अन्यायकारक असून, यापुढील काळात शेतकरी खत वापराचे प्रमाण कमी करतील. केंद्र शासनाने पुन्हा विचार करून रासायनिक खतांवरील अनुदान वाढवावे व रासायनिक खत उत्पादन कंपन्यांचे रखडलेले अनुदान तात्काळ कंपन्यांना द्यावे तरच खतांची दरवाढ नियंत्रणात राहील.

- धुळाभाऊ कोकरे, शेतकरी कुगाव.

---

कोरोनामुळे आयात होणारी खते बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आयात होणारी खते बंद झाली आहेत. फॉस्फरिक ॲसिडच्या किमती जागतिक बाजारात गगनाला भिडल्या आहेत यामुळे ही दरवाढ अटळ आहे. आता केंद्र शासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे किंवा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात खताचे अनुदान जमा करावे म्हणजे खताचा काळाबाजार कमी होईल आणि हवे तेवढेच शेतकरी खताचा वापर करतील, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

----