शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

अनुदान कमी झालं अन्‌ खताच्या किंमती वाढल्या! बळीराजाचं कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:23 IST

शेतकऱ्यांच्या मालकीचे असणाऱ्या इफको या कंपनीने आपल्या खताच्या किमती जाहीर केल्या. १८४६ डीएपी या खताची किंमत १९०० रुपये प्रति ...

शेतकऱ्यांच्या मालकीचे असणाऱ्या इफको या कंपनीने आपल्या खताच्या किमती जाहीर केल्या. १८४६ डीएपी या खताची किंमत १९०० रुपये प्रति ५० किलो बॅगची झाली आहे. यापूर्वी या बॅगची किंमत १३०० रुपये होती. याच प्रमाणे १०:२६: २६ या खताची किंमत १७७५ रुपये झाली असून यापूर्वी या खताची किंमत ११७५ रुपये होती. १५:१५:१५ या खताची किंमत १५०० रुपये प्रति पॅक झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत १ हजार रुपये प्रति बॅग होती. १२:३२:१६ या खताची किंमत १८०० रुपये प्रति बॅग झाली असून यापूर्वी या खताची किंमत १२५० रुपये होती. तर २०:२०:० या खताची किंमत १३५० रुपये झाली आहे. यापूर्वी या खताची किंमत ९५० रुपये होती.

तब्बल पाचशे ते सहाशे रुपये प्रमाणे खताच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अद्याप इतर कंपन्यांनी आपले दर जाहीर केलेले नाहीत.

सध्या बाजारात जुन्या दराचा लाखो मेट्रिक टन खते गोडावूनमध्ये असून या सर्व खतांचा खत विक्रेत्यांकडून काळाबाजार होण्याची शक्यता आहे.

गेल्या पंधरा - वीस वर्षाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात खताच्या किमती कधीच वाढलेल्या नव्हत्या. केंद्र सरकार रासायनिक खत उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यास टाळाटाळ करत असून रखडलेले अब्जावधी रुपयांचे अनुदान देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दाखवली आहे. यामुळे आता रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतात प्रचंड दरवाढ केली आहे.

कोट घेणे...

इफ्को कंपनीचे नवीन खताचे दर पत्रक पाहिले बघून धक्काच बसला. एवढी महाग खते झाली तर शेतकऱ्यांना शेती करणे अडचणीचे होईल. खत वापरण्याचे प्रमाण कमी होईल. या दरवाढीचा शेतकरी म्हणून मी निषेध करतो.

-

राजेंद्र बारकुंड, शेतकरी चिखलठाण

---

दरवाढ अन्यायकारक असून, यापुढील काळात शेतकरी खत वापराचे प्रमाण कमी करतील. केंद्र शासनाने पुन्हा विचार करून रासायनिक खतांवरील अनुदान वाढवावे व रासायनिक खत उत्पादन कंपन्यांचे रखडलेले अनुदान तात्काळ कंपन्यांना द्यावे तरच खतांची दरवाढ नियंत्रणात राहील.

- धुळाभाऊ कोकरे, शेतकरी कुगाव.

---

कोरोनामुळे आयात होणारी खते बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आयात होणारी खते बंद झाली आहेत. फॉस्फरिक ॲसिडच्या किमती जागतिक बाजारात गगनाला भिडल्या आहेत यामुळे ही दरवाढ अटळ आहे. आता केंद्र शासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे किंवा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात खताचे अनुदान जमा करावे म्हणजे खताचा काळाबाजार कमी होईल आणि हवे तेवढेच शेतकरी खताचा वापर करतील, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.

----