शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सुभाष देशमुख गटाची पीछेहाट, सर्वपक्षीय आघाड्यांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:24 IST

सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाची ग्रामपंचायत निवडणुकीत पीछेहाट झाली आहे. ...

सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाची ग्रामपंचायत निवडणुकीत पीछेहाट झाली आहे. नऊ ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली असली तर तब्बल २५ ग्रामपंचायती त्यांना गमवाव्या लागल्या आहेत. सर्वपक्षीय आघाड्यांनी भाजपचा वारू रोखल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले.

तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सुभाष देशमुख यांच्या मतदार संघातील ३४ ग्रामपंचायतींचा समावेश होता. बाळगी ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर ३३ पैकी ९ ग्रामपंचायती भाजपला राखता आल्या. त्यात होटगी - सावतखेड, इंगळगी, हत्तरसंग, होटगी स्टेशन, औराद, यत्नाळ, कणबस (ग), कारकल, सादेपूर यांचा समावेश आहे. माळकवठे ग्रामपंचायतीतील पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे.

भाजपची राज्यातून सत्ता गेल्याने सुभाष देशमुख यांचे मंत्रिपदही गेले. त्याचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला बसला आहे. सत्ता गेल्याने भाजपचे कार्यकर्ते सैरभैर झाले असून, देशमुख यांचा गट विस्कळीत झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्ते भाजपकडून लढण्याऐवजी अन्य आघाड्यांमध्ये गेले. त्यामुळे भाजपच्या हातून अनेक ग्रामपंचायती निसटल्या. विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली. परंतु, पक्षीय पातळीवर त्याची मांडणी करण्यात नेते व कार्यकर्ते अपयशी ठरले.

-------

संपर्क तुटल्याचा फटका

सुभाष देशमुख यांची सेकंड इनिंग तशी नाराजीतूनच सुरू झाली. ग्रामीण भागातून त्यांचे मताधिक्य घटल्याने त्यांना आपली नाराजी लपवता आली नाही. याविषयी उघडपणे चर्चा सुरू झाली. त्यातून कोविड, अतिवृष्टी, महापूर या संकट काळात भीमा नदीच्या खोऱ्यात देशमुख यांच्याविरोधात सूर आळविण्याचे काम भाजपतूनच सुरू झाले. मतदार संघाशी सुभाष देशमुख यांचा संपर्क कमी झाला. पुत्र मनिष देशमुख यांच्यावर त्यांनी जबाबदारी दिली. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. याउलट माजी आमदार दिलीप माने यांनी संपर्क वाढवला. वडापूर, सादेपूर, गुंजेगाव , माळकवठे या ग्रामपंचायती माने गटांनी खेचून घेतल्या.

--------

सर्वपक्षीय आघाड्यांना पसंती

राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने कार्यकर्ते पक्षभेद विसरून सोयीनुसार एकत्र आले. अनेक ठिकाणी सर्वपक्षीय आघाडी करून निवडणुका लढविण्यात आल्या. या निवडणुकीत भाजपची दुसरी फळी कार्यरत नव्हती. कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणारा आणि त्यांचे संघटन करणारा नेता नसल्याने भाजपऐवजी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र आघाड्या करून निवडणूक लढणे पसंत केले.

---------

बिनविरोधसाठी प्रयत्न कमी पडले

मतदार संघात बाळगी ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. अक्कलकोट मतदार संघात समाविष्ट असलेल्या बोरामणी, संगदरी, तीर्थ, दिंडूर, लिंबीचिंचोळी या पाच ग्रामपंचायतींची निवडणूक स्थानिक पातळीवर बिनविरोध झाली. सुभाष देशमुख यांच्या मतदार संघात तसा प्रयत्न कोणत्याही राजकीय नेत्याने अथवा पक्षाने केल्याचे दिसून आले नाही.