शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

सुभाष देशमुख गटाची पीछेहाट, सर्वपक्षीय आघाड्यांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:24 IST

सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाची ग्रामपंचायत निवडणुकीत पीछेहाट झाली आहे. ...

सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाची ग्रामपंचायत निवडणुकीत पीछेहाट झाली आहे. नऊ ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली असली तर तब्बल २५ ग्रामपंचायती त्यांना गमवाव्या लागल्या आहेत. सर्वपक्षीय आघाड्यांनी भाजपचा वारू रोखल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले.

तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सुभाष देशमुख यांच्या मतदार संघातील ३४ ग्रामपंचायतींचा समावेश होता. बाळगी ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर ३३ पैकी ९ ग्रामपंचायती भाजपला राखता आल्या. त्यात होटगी - सावतखेड, इंगळगी, हत्तरसंग, होटगी स्टेशन, औराद, यत्नाळ, कणबस (ग), कारकल, सादेपूर यांचा समावेश आहे. माळकवठे ग्रामपंचायतीतील पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे.

भाजपची राज्यातून सत्ता गेल्याने सुभाष देशमुख यांचे मंत्रिपदही गेले. त्याचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला बसला आहे. सत्ता गेल्याने भाजपचे कार्यकर्ते सैरभैर झाले असून, देशमुख यांचा गट विस्कळीत झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्ते भाजपकडून लढण्याऐवजी अन्य आघाड्यांमध्ये गेले. त्यामुळे भाजपच्या हातून अनेक ग्रामपंचायती निसटल्या. विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली. परंतु, पक्षीय पातळीवर त्याची मांडणी करण्यात नेते व कार्यकर्ते अपयशी ठरले.

-------

संपर्क तुटल्याचा फटका

सुभाष देशमुख यांची सेकंड इनिंग तशी नाराजीतूनच सुरू झाली. ग्रामीण भागातून त्यांचे मताधिक्य घटल्याने त्यांना आपली नाराजी लपवता आली नाही. याविषयी उघडपणे चर्चा सुरू झाली. त्यातून कोविड, अतिवृष्टी, महापूर या संकट काळात भीमा नदीच्या खोऱ्यात देशमुख यांच्याविरोधात सूर आळविण्याचे काम भाजपतूनच सुरू झाले. मतदार संघाशी सुभाष देशमुख यांचा संपर्क कमी झाला. पुत्र मनिष देशमुख यांच्यावर त्यांनी जबाबदारी दिली. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. याउलट माजी आमदार दिलीप माने यांनी संपर्क वाढवला. वडापूर, सादेपूर, गुंजेगाव , माळकवठे या ग्रामपंचायती माने गटांनी खेचून घेतल्या.

--------

सर्वपक्षीय आघाड्यांना पसंती

राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने कार्यकर्ते पक्षभेद विसरून सोयीनुसार एकत्र आले. अनेक ठिकाणी सर्वपक्षीय आघाडी करून निवडणुका लढविण्यात आल्या. या निवडणुकीत भाजपची दुसरी फळी कार्यरत नव्हती. कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणारा आणि त्यांचे संघटन करणारा नेता नसल्याने भाजपऐवजी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र आघाड्या करून निवडणूक लढणे पसंत केले.

---------

बिनविरोधसाठी प्रयत्न कमी पडले

मतदार संघात बाळगी ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. अक्कलकोट मतदार संघात समाविष्ट असलेल्या बोरामणी, संगदरी, तीर्थ, दिंडूर, लिंबीचिंचोळी या पाच ग्रामपंचायतींची निवडणूक स्थानिक पातळीवर बिनविरोध झाली. सुभाष देशमुख यांच्या मतदार संघात तसा प्रयत्न कोणत्याही राजकीय नेत्याने अथवा पक्षाने केल्याचे दिसून आले नाही.