शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृतींची सरमिसळ थांबवा: पाटणकर

By admin | Updated: July 29, 2014 01:10 IST

सोलापूर शाखेच्या वतीने सत्कार

सोलापूर: देशात अच्छे दिन नव्हे बुरे दिनच दिसत आहेत. पाश्चिमात्य, देशी या दोन संस्कृतीची सरमिसळ होत आहे, ती थांबवा़ या देशाला लाभलेली संगीत, कला, संस्कृती वाढवा, असे प्रतिपादन कोल्हापुरात होणाऱ्या १२ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ़ भारत पाटणकर यांनी केले़ विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे १२ वे साहित्य संमेलन २ आणि ३ आॅगस्ट रोजी कोल्हापुरात होत आहे़ सोमवारी सायंकाळी गोविंदश्री सांस्कृतिक कार्यालयात संमेलनाचे अध्यक्ष डॉ़ पाटणकर यांचा सोलापूर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला़ याप्रसंगी बोलत असताना त्यांनी वरील प्रतिपादन केले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ पोळके होते़ व्यासपीठावर चळवळीच्या सोलापूर शाखेचे महेश कांबळे, जिल्हाध्यक्ष मदन पोळके , सचिव मनोज जाधव, सहसचिव पवन कांबळे, शरद व्हनकडे यांची उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ पाटणकर यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली़ ‘अच्छे दिन आने वाले है’ असे सांगत सत्तेवर भाजप सरकार आले; मात्र सरकारकडून तशी कामे दिसत नाहीत़ मागील सरकारच्या काळात टूजी, स्पेक्ट्रमसारखे घोटाळे झाले़ सरकारची तिजोरी रिकामी होत आहे़ सांगा देशाचा कसा विकास होईल? असा प्रश्नही पाटणकर यांनी यावेळी केला़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन कांबळे यांनी केले़ सूत्रसंचालन दिनेश क्षीरसागर यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनोज जाधव यांनी मानले़ यावेळी सहसचिव पवन कांबळे, गणेश भिसे, संतोष भद्रशेट्टी, सुभाष बनसोडे, सुभाष बनसोडे, मोहन अनपट यांच्यासह शिक्षक आणि चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते़ याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी विविधता आणि नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या या देशात जोपर्यंत जातीव्यवस्था आहे तोपर्यंत हा देश महासत्ताक होऊ शकणार नसल्याचे म्हणाले़ समतेचा, मानवतेचा विचार रुजला पाहिजे यासाठी विद्रोही चळवळ कार्यरत आहे़ ही चळवळ क ोणाला शिव्या घालणारी नाही़ विद्रोही चळवळीच्या विचारधारेला मानवतेची परंपरा आहे़ महात्मा बसवेश्वरांपासून ते सांप्रदायिक चळवळींनी जाती-भेदाविरोधात लढा दिला आहे़ पंढरपुरातील विठ्ठलाला बडवे यांच्या ताब्यातून मुक्त करुन चळवळीने मोठ यश दाखवून दिल्याचे सांगत हिंदू जीवनप्रणाली तपासून घेण्याचे आवाहन पोळके यांनी केले़