शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
4
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
5
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
6
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
7
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
8
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
9
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
10
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
11
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
12
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
13
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
14
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
15
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
16
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
17
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
18
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
19
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
20
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल

संस्कृतींची सरमिसळ थांबवा: पाटणकर

By admin | Updated: July 29, 2014 01:10 IST

सोलापूर शाखेच्या वतीने सत्कार

सोलापूर: देशात अच्छे दिन नव्हे बुरे दिनच दिसत आहेत. पाश्चिमात्य, देशी या दोन संस्कृतीची सरमिसळ होत आहे, ती थांबवा़ या देशाला लाभलेली संगीत, कला, संस्कृती वाढवा, असे प्रतिपादन कोल्हापुरात होणाऱ्या १२ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ़ भारत पाटणकर यांनी केले़ विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे १२ वे साहित्य संमेलन २ आणि ३ आॅगस्ट रोजी कोल्हापुरात होत आहे़ सोमवारी सायंकाळी गोविंदश्री सांस्कृतिक कार्यालयात संमेलनाचे अध्यक्ष डॉ़ पाटणकर यांचा सोलापूर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला़ याप्रसंगी बोलत असताना त्यांनी वरील प्रतिपादन केले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ पोळके होते़ व्यासपीठावर चळवळीच्या सोलापूर शाखेचे महेश कांबळे, जिल्हाध्यक्ष मदन पोळके , सचिव मनोज जाधव, सहसचिव पवन कांबळे, शरद व्हनकडे यांची उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ पाटणकर यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली़ ‘अच्छे दिन आने वाले है’ असे सांगत सत्तेवर भाजप सरकार आले; मात्र सरकारकडून तशी कामे दिसत नाहीत़ मागील सरकारच्या काळात टूजी, स्पेक्ट्रमसारखे घोटाळे झाले़ सरकारची तिजोरी रिकामी होत आहे़ सांगा देशाचा कसा विकास होईल? असा प्रश्नही पाटणकर यांनी यावेळी केला़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन कांबळे यांनी केले़ सूत्रसंचालन दिनेश क्षीरसागर यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनोज जाधव यांनी मानले़ यावेळी सहसचिव पवन कांबळे, गणेश भिसे, संतोष भद्रशेट्टी, सुभाष बनसोडे, सुभाष बनसोडे, मोहन अनपट यांच्यासह शिक्षक आणि चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते़ याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी विविधता आणि नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या या देशात जोपर्यंत जातीव्यवस्था आहे तोपर्यंत हा देश महासत्ताक होऊ शकणार नसल्याचे म्हणाले़ समतेचा, मानवतेचा विचार रुजला पाहिजे यासाठी विद्रोही चळवळ कार्यरत आहे़ ही चळवळ क ोणाला शिव्या घालणारी नाही़ विद्रोही चळवळीच्या विचारधारेला मानवतेची परंपरा आहे़ महात्मा बसवेश्वरांपासून ते सांप्रदायिक चळवळींनी जाती-भेदाविरोधात लढा दिला आहे़ पंढरपुरातील विठ्ठलाला बडवे यांच्या ताब्यातून मुक्त करुन चळवळीने मोठ यश दाखवून दिल्याचे सांगत हिंदू जीवनप्रणाली तपासून घेण्याचे आवाहन पोळके यांनी केले़