सोलापूर-मंगळवेढा रस्त्यालगत असलेल्या तिऱ्हे गावची जिल्हा परिषद शाळेच्या ५ खोल्या स्त्यात गेल्या आहेत. रस्त्याचे काम करताना गरजेनुसार काही खोल्यांचे पाडकाम केले आहे तर चार वर्गखोल्या आहेत. मात्र कोरोनामुळे शाळा बंद असताना काहींनी शाळेसमोरील
रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत पत्र्याचे शाॅपिंग उभारले आहे. आता शाळा सुरू झाल्यानंतर या शॉपिंगमुळे शाळेत जाण्याचा रस्ता बंद झाला आहे.
ही बाब लक्षात आल्याने मुख्याध्यापकांनी २५ नोव्हेंबर रोजी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. वर्गात जाता येत नाही व साहित्यही बाहेर काढता येत नाही, असे मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. मात्र त्याची दखल कोणीच घेतली नाही.
प्रत्यक्षात २७ जानेवारीपासून शाळा सुरू झाल्यानंतर नागरिकांना ही बाब लक्षात आली. विजय जाधव व इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना अनधिकृत पत्रा शेड काढून शाळेचा रस्ता रिकामा करून देण्याबाबत पत्र दिले आहे.
-----
मुलांपेक्षा मुली अधिक
ग्रामस्थ व मुख्याध्यापकांचे पत्र मिळाले आहे. अतिक्रमण शेड काढण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार यांनी सांगितले.
- पर्याय म्हणून मंदिरात शाळा भरविण्यास सुरुवात केली; मात्र मुली आल्याच नाहीत.
- तिर्हे येथे पाचवी ते सातवी इयत्तेत ३४ मुली व ३१ मुले असे एकूण ६५ विद्यार्थी आहेत. पैकी ११ मुली शाळेत येत आहेत.