शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

धार्मिक वादातून होईल तिसरे महायुद्ध

By admin | Updated: August 23, 2014 00:57 IST

मुजफ्फर हुसेन : पॅलेस्टाईन-इस्रायल जगातील सर्वात मोठा प्रश्न

सोलापूर : जागतिक पातळीवर पॅलेस्टाईन आणि इस्रायल या देशातील संघर्ष ही जगातील सर्वात मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. दोन्ही देशांतील अनेक वर्षांपासून चालत आलेला धार्मिक वाद हा न संपणारा विषय असून भविष्यात जर तिसरे महायुद्ध झाले तर ते धर्मावर आधारित होईल, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांनी व्यक्त केले. विवेक विचार केंद्राच्या कार्यक्रमानिमित्त मुजफ्फर हुसेन हे शुक्रवारी सोलापुरात आले होते. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. मुजफ्फर हुसेन म्हणाले की, मध्य पूर्व व मध्य आशियाईमध्ये सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. सीरिया, इराण, इराक येथील युद्धनीतीवर दररोज बातम्या येत आहेत. क्रूड तेल डोळ्यांसामोर ठेवून अमेरिका राजकारण करीत आहे. यहुदीनंतर उदयाला आलेल्या ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मातील लोकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. कधीही न संपणारा हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. इस्रायलमध्ये निर्माण झालेला मुस्लीमबहुल पॅलेस्टाईन देश यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. येणाऱ्या काळात भविष्यामध्ये तिसऱ्या महायुद्धाला कोठून सुरुवात होईल, हे सांगता येत नाही. मात्र हे महायुद्ध फक्त धर्मावर आधारित असेल आणि चौथ्या महायुद्धात फक्त दगडांचा वापर होईल, असे भाकीत मुजफ्फर हुसेन यांनी केले. बहुतांश राष्ट्रांमध्ये मातृभाषेला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. परस्परांतील संबंधात सुधार व्हावा म्हणून आजूबाजूच्या देशातील भाषा अवगत केली जाते. मात्र भारतामध्ये कॅनडा, इंग्लंड, अमेरिका आदी देशांतील भाषेकडे जास्त आकर्षण असल्याचे दिसून येते. वास्तविक पाहता शेजारी असलेल्या इस्लाम देशाची उर्दू, अरबी भाषादेखील अवगत करण्यावर भर दिला पाहिजे.-------------------------------भारताला पर्याय नाही....इराकच्या क्रूड तेलावर देशातील सर्व दळणवळणाची भिस्त अवलंबून आहे. हे क्रूड तेल जर बंद झाले तर देशातील ९0 टक्के तेलपुरवठा बंद होईल. भारत हा अनेक नैसर्गिक साधनसंपत्तीयुक्त आहे. मोठ्या प्रमाणात समुद्र परिसर लाभला आहे. मात्र एकाही शास्त्रज्ञाला आणि संशोधकाला क्रूड तेल किंवा ऊर्जास्रोताचा शोध लावता आला नाही, ही मोठी शोकांतिका आहे. भारताला क्रूड तेलासाठी इराकनंतर पर्याय नाही, अशी चिंता यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मुजफ्फर हुसेन यांनी व्यक्त केली.