शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी यात्रेतील संचारबंदीचा कालावधी कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST

पंढरपूर : पंढरपूर शहरात व शहराच्या आजूबाजूच्या गावात जास्त दिवस संचारबंदी ठेवल्यास सुरळीत होत चाललेली आर्थिक परिस्थिती पुन्हा विस्कळीत ...

पंढरपूर : पंढरपूर शहरात व शहराच्या आजूबाजूच्या गावात जास्त दिवस संचारबंदी ठेवल्यास सुरळीत होत चाललेली आर्थिक परिस्थिती पुन्हा विस्कळीत होऊ शकते. यामुळे आषाढी यात्रेदरम्यान तीन दिवसच संचारबंदी करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.

कारोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यावर प्रतिबंध घालताना जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर व परिसरातील नऊ गावांमध्ये १७ जुलै ते २१ जुलै २०२१ दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी जाहीर केली आहे. यामुळे पंढरपुरातील सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे. वास्तविक, पंढरपुरात येणाऱ्या सर्वच मार्गांवर त्रिस्तरीय नाकाबंदी केली जाणार आहे. तीन हजार पोलिसांमार्फत बंदोबस्त करण्याचे नियोजन शासनामार्फत केले आहे. तसेच एस.टी. महामंडळाच्या बसही या काळात बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर व परिसरात खाजगी वाहने अथवा बसने भाविक येण्याची शक्यताच नाही.

तीर्थक्षेत्र पंढरपूर हे चार यात्रांवर जगणारे गाव आहे. मागील दीड वर्षापासून सतत संचारबंदी व वर्षभरातील यात्रा रद्द झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुन्हा एकदा शासनाने आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात येण्यासाठी चौफेर नाकाबंदी केली. याच काळात पंढरपूर शहर व परिसरातील गावामध्ये संचारबंदी करण्याचे निर्देश काढणे हे येथील अर्थकारणासाठी अयोग्य आहे. त्यामुळे सुरळीत होत चाललेली आर्थिक परिस्थिती पुन्हा विस्कळीत होणार आहे.

-----

तीन दिवस राहावी संचारबंदी

अशा परिस्थितीत याचा फटका लहान-मोठा व्यापारी वर्ग, कष्टकरी मजूर, प्रासादिक भांडार, रिक्षा-टांगेवाले, मजूर, भाजी विक्रेते व शेतकरी यांना बसणार आहे. यामुळे तीन दिवसच संचारबंदी असावी, असे पत्र अजित पवार यांना दिले असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.