शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

आषाढी यात्रेतील संचारबंदीचा कालावधी कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST

पंढरपूर : पंढरपूर शहरात व शहराच्या आजूबाजूच्या गावात जास्त दिवस संचारबंदी ठेवल्यास सुरळीत होत चाललेली आर्थिक परिस्थिती पुन्हा विस्कळीत ...

पंढरपूर : पंढरपूर शहरात व शहराच्या आजूबाजूच्या गावात जास्त दिवस संचारबंदी ठेवल्यास सुरळीत होत चाललेली आर्थिक परिस्थिती पुन्हा विस्कळीत होऊ शकते. यामुळे आषाढी यात्रेदरम्यान तीन दिवसच संचारबंदी करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.

कारोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यावर प्रतिबंध घालताना जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर व परिसरातील नऊ गावांमध्ये १७ जुलै ते २१ जुलै २०२१ दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी जाहीर केली आहे. यामुळे पंढरपुरातील सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे. वास्तविक, पंढरपुरात येणाऱ्या सर्वच मार्गांवर त्रिस्तरीय नाकाबंदी केली जाणार आहे. तीन हजार पोलिसांमार्फत बंदोबस्त करण्याचे नियोजन शासनामार्फत केले आहे. तसेच एस.टी. महामंडळाच्या बसही या काळात बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर व परिसरात खाजगी वाहने अथवा बसने भाविक येण्याची शक्यताच नाही.

तीर्थक्षेत्र पंढरपूर हे चार यात्रांवर जगणारे गाव आहे. मागील दीड वर्षापासून सतत संचारबंदी व वर्षभरातील यात्रा रद्द झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुन्हा एकदा शासनाने आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात येण्यासाठी चौफेर नाकाबंदी केली. याच काळात पंढरपूर शहर व परिसरातील गावामध्ये संचारबंदी करण्याचे निर्देश काढणे हे येथील अर्थकारणासाठी अयोग्य आहे. त्यामुळे सुरळीत होत चाललेली आर्थिक परिस्थिती पुन्हा विस्कळीत होणार आहे.

-----

तीन दिवस राहावी संचारबंदी

अशा परिस्थितीत याचा फटका लहान-मोठा व्यापारी वर्ग, कष्टकरी मजूर, प्रासादिक भांडार, रिक्षा-टांगेवाले, मजूर, भाजी विक्रेते व शेतकरी यांना बसणार आहे. यामुळे तीन दिवसच संचारबंदी असावी, असे पत्र अजित पवार यांना दिले असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.