शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आषाढी यात्रेतील संचारबंदीचा कालावधी कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST

पंढरपूर : पंढरपूर शहरात व शहराच्या आजूबाजूच्या गावात जास्त दिवस संचारबंदी ठेवल्यास सुरळीत होत चाललेली आर्थिक परिस्थिती पुन्हा विस्कळीत ...

पंढरपूर : पंढरपूर शहरात व शहराच्या आजूबाजूच्या गावात जास्त दिवस संचारबंदी ठेवल्यास सुरळीत होत चाललेली आर्थिक परिस्थिती पुन्हा विस्कळीत होऊ शकते. यामुळे आषाढी यात्रेदरम्यान तीन दिवसच संचारबंदी करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.

कारोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यावर प्रतिबंध घालताना जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर व परिसरातील नऊ गावांमध्ये १७ जुलै ते २१ जुलै २०२१ दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी जाहीर केली आहे. यामुळे पंढरपुरातील सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे. वास्तविक, पंढरपुरात येणाऱ्या सर्वच मार्गांवर त्रिस्तरीय नाकाबंदी केली जाणार आहे. तीन हजार पोलिसांमार्फत बंदोबस्त करण्याचे नियोजन शासनामार्फत केले आहे. तसेच एस.टी. महामंडळाच्या बसही या काळात बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर व परिसरात खाजगी वाहने अथवा बसने भाविक येण्याची शक्यताच नाही.

तीर्थक्षेत्र पंढरपूर हे चार यात्रांवर जगणारे गाव आहे. मागील दीड वर्षापासून सतत संचारबंदी व वर्षभरातील यात्रा रद्द झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुन्हा एकदा शासनाने आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात येण्यासाठी चौफेर नाकाबंदी केली. याच काळात पंढरपूर शहर व परिसरातील गावामध्ये संचारबंदी करण्याचे निर्देश काढणे हे येथील अर्थकारणासाठी अयोग्य आहे. त्यामुळे सुरळीत होत चाललेली आर्थिक परिस्थिती पुन्हा विस्कळीत होणार आहे.

-----

तीन दिवस राहावी संचारबंदी

अशा परिस्थितीत याचा फटका लहान-मोठा व्यापारी वर्ग, कष्टकरी मजूर, प्रासादिक भांडार, रिक्षा-टांगेवाले, मजूर, भाजी विक्रेते व शेतकरी यांना बसणार आहे. यामुळे तीन दिवसच संचारबंदी असावी, असे पत्र अजित पवार यांना दिले असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.