शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या तीन दिवसात होणार विक्रमी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:21 IST

जैनवाडी ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणूक करत इतर ग्रामपंचायतींसमोर ठेवलेला आदर्श घेत देवडे, पुनर्वसन आदी ग्रामपंचायतींची वाटचालही बिनविरोधकडे सुरू आहे. ७२ ...

जैनवाडी ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणूक करत इतर ग्रामपंचायतींसमोर ठेवलेला आदर्श घेत देवडे, पुनर्वसन आदी ग्रामपंचायतींची वाटचालही बिनविरोधकडे सुरू आहे. ७२ ग्रामपंचायतींसाठी अनेक गावांमध्ये दुहेरी, तिहेरी लढती होण्याची शक्यता आहे. सुट्टीच्या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये अनेक गावात नाराजांची मनधरणी करत आपापल्या पॅनलला कसा फायदा होईल, यासाठी प्रत्येक गटाची धावपळ सुरू होती. मात्र तरीही अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करणारच या भूमिकेत असल्याने तालुका पातळीवरील नेतृत्वासमोर हा विषय मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

पहिल्या तीन दिवसात ७२ ग्रामपंचायतींसाठी १०० अर्ज दाखल झाले. सुट्टीच्या तीन दिवसांच्या कालावधीत प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याच्याच प्रती अधिकृतपणे निवडणूक निर्णय विभागाकडे देण्यासाठी सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवसात मोठी गर्दी होणार असल्याचे संकेत आहेत.

जैनवाडीनंतर आणखी ग्रामपंचायती बिनविरोधच्या मार्गावर

जैनवाडी (ता. पंढरपूर) या ग्रामपंचायतीने मागील ४० वर्षांची परंपरा खंडित करत ग्रामस्थांनी सर्वानुमते ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करत तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींसमोर नवा आदर्श घालून दिला आहे. त्यानंतर आता देवडे, पुनर्वसन गावठाण (पटवर्धन कुरोली) आदी ग्रामपंचायतींचीही बिनविरोधकडे वाटचाल सुरू आहे. तालुक्यातील आणखी किती ग्रामपंचायती शेवटपर्यंत बिनविरोध होतात, याची उत्सुकता लागली आहे. तोपर्यंत प्रशासन तालुका स्तरावरील नेते व गावातील प्रमुख त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

शासनाच्या नव्या जीआरमुळे अनेकांचा हिरमोड

ग्रामपंचायत म्हटले की गावागावात उमेदवारांची भाऊगर्दी असते; मात्र गेल्या पंचवार्षिक निवडणूक लढविलेल्या उमेदवाराला निवडणूक आयोगाने खर्चाचा तपशील सादर करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी दिला होता. त्या कालावधीतही त्या विजयी झालेल्या किंवा पराभूत झालेल्या उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे खर्चाचा तपशील सादर केला नाही म्हणून यावर्षी निवडणूक आयोगाने नवीन जीआर काढत मागील निवडणुकीतील ज्या उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही, त्यांना निवडणूक लढविता येणार नाही, असा आदेशच काढल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे ते आता आपल्या घरातील इतर उमेदवार देता येतील का याची चाचपणी करत आहेत.