शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीनिष्ठा ठरली श्रेष्ठ

By admin | Updated: October 21, 2014 13:55 IST

सांगोल्यात पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीनिष्ठेला अधिक महत्त्व असल्याने निवडणुकीत मोदी लाट अगर कोणत्याही पक्षाचा प्रभाव जाणवला नाही.

अरुण लिगाडे■ सांगोला

 
सांगोला विधानसभेची निवडणूक शेतीचा पाणीप्रश्न, महागाई, भ्रष्टाचार, सुशिक्षित बेरोजगारी याच मुद्यांवर लढवली गेली. तालुक्यात पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीनिष्ठेला अधिक महत्त्व असल्याने निवडणुकीत मोदी लाट अगर कोणत्याही पक्षाचा प्रभाव जाणवला नाही. 
आ. गणपतराव देशमुख व माजी आ. अँड. शहाजीबापू पाटील यांच्यात पारंपरिक लढत असल्याने नेहमीप्रमाणे निवडणुकीत मोठी चुरस पाहावयास मिळाली. या निवडणुकीत मतदारांनी आ. देशमुख यांच्यावर स्थानिक विकासकामांपेक्षा व्यक्तीनिष्ठा, संयमी नेतृत्वावर विश्‍वास ठेवून सर्वच जाती-पातीच्या मतदारांनी मोठय़ा मताधिक्याने निवडून दिले. 
त्यांच्या विजयाला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी हातभार लावल्यामुळे त्यांना विजयाची हॅट्ट्रिक साधता आली. 
विजयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. दीपक साळुंखे-पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. या निवडणुकीत रिपाइं , रा.स.प., भारिप बहुजन महासंघ, भीमक्रांती सामाजिक संघटना यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने आ. देशमुखांचा विजय सोयीस्कर झाला. 
त्यांना निवडणुकीत ९४ हजार ३७४ मते मिळाली असली तरी या विजयात धनगर, मराठा समाजासह अल्पसंख्याक समाज, व्यापारी, उद्योगपतींनी मोठी मदत केली आहे. उलट अँड. शहाजीबापू पाटील यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन ते 'एकला चलो रे'चा नारा देत निवडणुकीला सामोरे गेले. त्यांना मिळालेली ६९ हजार मते शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विचार करण्यास लावणारी आहेत. 
तालुक्यात अँड. शहाजीबापू पाटील यांना मानणारा मतदार आजही टिकून असल्याने ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांच्या मागचा चाहता वर्ग हटत नाही हे त्यांना मिळालेल्या मतांवरून दिसून आले. 
भाजपचे उमेदवार श्रीकांत देशमुख यांना मोदी लाटेचा कसलाही फायदा झाला नाही. सन २00९ मध्ये ते जनसुराज्य पक्षाकडून लढले, त्यावेळी त्यांना १३ हजार मते मिळाली होती. पण यंदा भाजपच्या तिकिटावर लढल्यावर त्यांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही. 
अपक्ष उमेदवार संभाजी आलदर यांनी प्रथमच निवडणूक लढवित साडेसात हजार मते मिळवली. त्यांच्या उमेदवारीचा आ. देशमुख यांना फटका बसेल, असे वाटले होते. मात्र आलदर यांना मिळालेल्या मतांचा अँड. शहाजीबापू यांनाच तोटा झाला आहे. 
पाण्याची जबाबदारी 
■ दुष्काळी तालुका अशी ओळख कायमस्वरूपी पुसून टाकण्याकरिता टेंभू-म्हैसाळ योजना, सांगोला उपसा सिंचन योजनांची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आ. देशमुख यांच्यावर मतदारांनी पुन्हा एकदा टाकली आहे. तालुक्यातील अल्पसंख्याक, गोरगरीब मजूर पोटाची खळगी भरण्याकरिता ऊस तोडणी व मातीकामावर जातो. यांच्यासाठी तालुक्यात कायमस्वरूपी रोजगार निर्मिती करण्याची गरज आहे.
 
सत्तेसाठी काहीपण
 ■ तालुक्याचा विकास या मुद्यावर आ. गणपतराव देशमुख, आ. दीपक साळुंखे-पाटील, माजी आ. अँड. शहाजीबापू पाटील यांनी महाआघाडी स्थापन करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविल्या होत्या. त्यात त्यांना यशही मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीत तिघांनी विकासकामाच्या मुद्यावर एकत्रित प्रचार केला होता; मात्र विधानसभा निवडणूक आ. देशमुख, अँड. पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात लढून सत्तेसाठी काहीपण.. हेच दाखवून दिले.