शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

माढ्यातील ३८ गावांत विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST

कुर्डुवाडी महावितरण उपविभागातील ३८ गावांतून महावितरण कंपनीने थकीत वीजबिलाची केलेली वसुली ही जिल्ह्यात लक्षणीय ठरली. त्यावेळी ज्या ग्राहकांनी दिलेले ...

कुर्डुवाडी महावितरण उपविभागातील ३८ गावांतून महावितरण कंपनीने थकीत वीजबिलाची केलेली वसुली ही जिल्ह्यात लक्षणीय ठरली. त्यावेळी ज्या ग्राहकांनी दिलेले टप्पे किंवा किमान थकबाकी भरली नाही, त्यांचे डीपीदेखील बंद करण्यात आले होते. त्यावेळी महावितरणला सहकार्य म्हणून कुर्डुवाडी, लऊळ, ढवळस, म्हैसगाव, कुर्डू, शिराळ, अंबाड, पडसाळी, अकुलगाव, बारलोणी, रोपळे, भूताष्टे परिसरातील शेतकऱ्यांनी किमान तीन किंवा पाच हजार रुपये कनेक्शननुसार महावितरणच्या पथकाकडे जमा केले. त्यामुळे थकबाकी वसुलीत आघाडी घेतलेल्या या विभागाची जिल्ह्यात चर्चा झाली. परंतु, महावितरण कंपनी वीजपुरवठ्यात मागे पडल्याची खंत शेतकऱ्यांतून व्यक्त झाली आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न या परिसराला भेडसावत असताना कमी प्रमाणात वीजपुरवठा होत आहे. आता कमी दाबाने वीजपुरवठा सुरू झाला आहे.

महावितरणने वीजप्रवाह उच्च दाबाने सुरू करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. दोन-दोन दिवस वीज न येणे, आली तर कमी दाब असणे, त्यामुळे विद्युत मोटारी यावर चालत नाहीत. ग्राहक या त्रासाला कंटाळले आहेत.

----

१४८ कोटींची थकबाकी वसूल

कुर्डुवाडी उपविभागांतर्गत व्यवसायिक, औद्योगिक, घरगुती, शेतीसह प्रकारात मार्चएन्डपर्यंत १४८ कोटींची थकबाकी ग्राहकांकडे होती. टप्पे टप्पे देऊन महावितरणच्या पथकाने ही थकबाकी वसूल केली. त्यानंतरच खंडित वीजपुरवठ्याचे डीपी जोडण्यात आले. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांची वीज त्यांनी तोडली होती.

.................

सध्या वीजपुरवठा खंडित होतोय ही बाब सत्य आहे. परंतु, याला महावितरणचे कार्यालय जबाबदार नाही. कारण वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीकडून गेल्या काही दिवसांत तांत्रिक कारणामुळे योग्य तो वीजपुरवठा झाला नाही. गुरुवारपासून वीजपुरवठा व्यवस्थित होईल.

- उल्हास कानगुडे,सहायक अभियंता, महावितरण उपविभाग कुर्डुवाडी