अरण : संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सोमवारी सांगता झाली़ पांडुरंगाची पालखी भक्तिमय वातावरणात, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठुनामाचा जयघोष करीत पंढरपूरकडे रवाना झाली़ सकाळपासून आकाशात ढग जमले होते, अधून-मधून श्रावणी सरी बरसत होत्या़ तेव्हा सकाळी ८ वाजता संत सावता माळी मंदिरापासून हजारो जनसमुदाय परतीच्या प्रवासाला निघाला़ दोन किलोमीटर अंतर भाविकांनी फुलून गेला होता़ टाळ-मृदंगाचा गजर, अभंग गात आणि विठुनामाचा जयघोष करीत मोठ्या उत्साहात अरण येथील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्यास निरोप दिला़ अरण येथील दत्तात्रय चौधरी, हरिभाऊ गोरे, हनुमंत जाधव, साधू गायकवाड, शिवदास वसेकर व टाळकरी मंडळींनी विसावा ठिकाणापर्यंत जयघोष करीत गेले होते़ पालखीच्या रथाला पंडित सुर्वे यांची बैलजोडी जुंपलेली होती़ यावेळी देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल गाजरे, अॅड़ विजय शिंदे, जि़ प़ सभापती शिवाजी कांबळे, भारत शिंदे, सावता रणदिवे, पुजारी रमेश वसेकर, अंकुश वसेकर, यात्रा कमिटीचे विलास वसेकर आदी उपस्थित होते़ ---------------------------रांगोळ्याच्या पायघड्या अरण येथील पाटील वस्तीवरील तरुणांनी दोन किलोमीटरपर्यंतच्या पालखी मार्गाची स्वच्छता करून रांगोळ्यांच्या आकर्षक पायघड्या साकारल्या होत्या़ यासाठी शिवाजी सावंत, शिवाजी पाटील, सुनील थोरात, प्रदीप पाटील, बाबू पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले़ पांडुरंगाची पालखी विसाव्याला थांबल्यानंतर भाविकांनी श्रद्धेने पेढे वाटून आनंद साजरा केला़ त्यानंतर नामदेव सावंत कुटुंबाच्या वतीने सर्व भाविकांसाठी भोजनाची सोय केली़ महामार्ग पोलीस व ग्रामीण पोलिसांनी पालखी मार्गावर बंदोबस्त ठेवला होता़
पांडुरंगाची पालखी पंढरपूरकडे रवाना
By admin | Updated: July 29, 2014 01:17 IST