शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिवंत नागांविनाच शिराळ्यात पंचमी

By admin | Updated: August 1, 2014 23:24 IST

लाखोंची उपस्थिती : बाराशे वर्षांची परंपरा खंडित;

शिराळा : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत यंदा प्रथमच जिवंत नागांच्या अनुपस्थितीत शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी आज (शुक्रवारी) साजरी झाली. ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात, चेहऱ्यावर उत्साह दाखवत शिराळकरांसह लाखो भाविक उत्सवात सहभागी झाले. तब्बल १२०० वर्षांच्या परंपरेत यावर्षी खंड पडला, तरी शिराळकरांचा संयम हे यंदाच्या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.नागपंचमीसाठी जिवंत नाग पकडण्यावर आणि त्यांची मिरवणूक काढण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे नागपंचमीला होणाऱ्या जिवंत नागपूजेला शिराळ्यात यावर्षी बगल दिली गेली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी प्रशासनाने चोख तयारी ठेवली होती. आज सकाळी साडेसहापासून नागाची प्रतीकात्मक मूर्ती, प्रतिमा वाजत-गाजत ग्रामदैवत अंबामातेच्या दर्शनाला नेण्यासाठी नागमंडळांच्या कार्यकर्त्यांनी रांग लागली होती. दरवर्षी हातात नागाची गाडगी असणारे कार्यकर्ते यावेळी मोकळ्या हाताने मंदिराच्या आवारात बसलेले दिसत होते. दुपारी दोनच्यादरम्यान प्रमोद महाजन, सुनील महाजन, सुमंत महाजन, वैजनाथ महाजन, डी. आर. महाजन, रामचंद्र महाजन या महाजन कुटुंबियांच्या घरात मानाच्या पालखीचे पूजन, आरती झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी पालखी आल्यावर दुपारी अडीचच्यादरम्यान मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणुकीत प्रत्येक नागराज मंडळाने ट्रॅक्टरमध्ये नागाची प्रतीकात्मक मूर्ती, प्रतिमा ठेवल्या होत्या. ट्रॅक्टरपुढे डॉल्बी, बेंजो, बॅण्डपथके होती. ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात नागमंडळांचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करत होते. यावेळी मानाच्या पालखीपुढे मानाच्या जिवंत नागाऐवजी मातीचा नाग कोतवालांनी हातात धरला होता. मिरवणूक गुरुवार पेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठ, लक्ष्मी चौक, मेन रोड या मार्गावरून अंबामाता मंदिरापर्यंत नेण्यात आली. मिरवणूक रात्री दहापर्यंत सुरू होती. उत्सवासाठी लाखो भाविकांची उपस्थिती होती. मात्र जिवंत नागांच्या दर्शनाअभावी भाविक, ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. जिवंत नागाची पूजा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी ग्रामस्थ ग्रामदेवतेस साकडे घालत होते. अंबामाता मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होती. (वार्ताहर)