शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ परिवाराने अडचणींवर मात करीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:26 IST

जपली उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : अनेक अडचणींचा सामना करीत धोत्री येथील गोकुळ शुगरच्या व्यवस्थापनाने ...

जपली उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : अनेक अडचणींचा सामना करीत धोत्री येथील गोकुळ शुगरच्या व्यवस्थापनाने गतवर्षी गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीपेक्षा जादा दर देऊन आतापर्यंतच्या उच्चांकी दराची परंपरा कायम राखली आहे. कारखान्याने प्रतिटन २१११ रुपयांप्रमाणे ऊस बिलाची रक्कम शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांच्या आकस्मिक निधनाने परिवारासह शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट होते. गतवर्षीच्या गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या रकमा मिळाल्या नव्हत्या, तर ऊसतोडणी यंत्रणा आणि मजुरांची बिले थकली होती. यापूर्वी गोकुळ शुगरने प्रतिटन २६१० रुपये दर दिला होता. त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील तो उच्चांकी दर होता. गतवर्षीच्या हंगामासाठी या कारखान्याला २०१८ रुपये एफआरपी निश्चित करण्यात आला. मात्र, कारखान्याने त्याहीपेक्षा जादा दर देण्याचा निर्णय घेतला. २१११ रुपयांप्रमाणे ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली असल्याची माहिती चेअरमन दत्तात्रय शिंदे, संस्थापक बलभीम शिंदे यांनी दिली.

आगामी गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना बिलाची रक्कम दर दहा दिवसांनी अदा करण्यात येणार आहे. प्रतिदिन ४,५०० मे. टन गाळप क्षमता असून, १८ मेगावॅटचा सहवीजनिर्मिती प्रकल्प आहे. याच गळीत हंगामापासून आसवनी डिस्टिलरी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपिल शिंदे यांनी सांगितले.

आगामी गळीत हंगामासाठी १०,५०० हेक्टर उसाची नोंद करण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, तुळजापूर, बार्शी, मोहोळ आणि अक्कलकोट या सहा तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची नोंदणी सुरू असल्याचे चेअरमन दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे. यावेळी संचालक विशाल शिंदे उपस्थित होते.

----

अडचणीच्या काळात शेतकऱ्यांनी खूप सहकार्य केले आहे. तुमच्या परिवाराची दयनीय स्थिती असताना वित्तीय संस्था, सहकाऱ्यांनी सहकार्य केले. शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला. त्यामुळेच सावरू शकलो.

- दत्तात्रय शिंदे, चेअरमन, गोकुळ शुगर