शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोधच्या नावाखाली दिला अधिकाऱ्यांनी वेळ वाढवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:11 IST

दिवसभरात काही गावांमध्ये चिन्हांच्या वाटपावरून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सावळा गोंधळ सुरू होता. त्यामुळे नियमापेक्षा हा वेळ कोणी वाढवून ...

दिवसभरात काही गावांमध्ये चिन्हांच्या वाटपावरून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सावळा गोंधळ सुरू होता. त्यामुळे नियमापेक्षा हा वेळ कोणी वाढवून दिला त्या अधिकाऱ्यांवरच आता कारवाईची मागणी होत आहे. निवडणूक विभागाने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी दुपारी ३ पर्यंतचा वेळ दिला होता. त्यानंतर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार होते. मात्र काही गावांमध्ये पॅनलप्रमुख व उमेदवारांनी ग्रामपंचायत बिनविरोध होईल. यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी केली. त्यामुळे काही गावांना अधिकाऱ्यांनी वेळ वाढवून दिला. मात्र रात्री ६ वाजेपर्यंतही त्या गावात बिनविरोधवर एकमत होत नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही चलबिचल सुरू होती. शेवटी गावामध्ये दोन्ही पॅनल समोरासमोर आल्याने बिनविरोधवर एकमत न होता अधिकाऱ्यांसमोरच वाद-विवाद होण्याची शक्यता निर्माण होताच अधिकाऱ्यांनी उशिरा पोलिसांना पाचारण केले. शेवटी काही ग्रामपंचायती बिनविरोध तर झाल्याच नाहीत; मात्र बिनविरोधसाठी थांबलेले तेच उमेदवार रात्री चिन्हे घेऊन गावाकडे परतले. बिनविरोधच्या नावाखाली काही गावे, उमेदवारांना वेळ कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणत्या नियमाखाली वाढवून दिला त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

-----

नागरिकांचं गाऱ्हाणं...

७२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार विवेक साळुंखे यांची नियुक्ती केली आहे. तर त्यांना सहाय्यक म्हणून नायब तहसीलदार एस. पी. तिटकारे यांच्याकडे जबाबदारी आहे. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी तहसीलच्या आवारात गोंधळ घडूनही त्यांना माहिती नसल्याचे सांगण्यात आले. नायब तहसीलदारांनी शासकीय कामानिमित्त परगावी असल्याचे तर तहसीलदारांनी माहिती घेतो, असे सांगून वेळ मारून नेल्याचे खेड भाळवणीचे दत्तात्रय साळुंखे, लक्ष्मण साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

------

काही गावांमधील उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर आमची सही नाही, अशा हरकती घेतल्या होत्या. त्यामुळे काही गावांच्या प्रक्रिया थांबवून त्यांच्या समक्ष आधार कार्ड, इतर कागदपत्रे तपासणीची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे चिन्हवाटपाला वेळ लागला. मात्र काही ठिकाणी वेळ वाढवून देण्याचा प्रकार व चिन्ह वाटून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा प्रकार घडला असल्यास आपण याबाबत माहिती घेऊ.

- विवेक साळुंखे, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, पंढरपूर