शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

बिनविरोधच्या नावाखाली दिला अधिकाऱ्यांनी वेळ वाढवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:11 IST

दिवसभरात काही गावांमध्ये चिन्हांच्या वाटपावरून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सावळा गोंधळ सुरू होता. त्यामुळे नियमापेक्षा हा वेळ कोणी वाढवून ...

दिवसभरात काही गावांमध्ये चिन्हांच्या वाटपावरून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सावळा गोंधळ सुरू होता. त्यामुळे नियमापेक्षा हा वेळ कोणी वाढवून दिला त्या अधिकाऱ्यांवरच आता कारवाईची मागणी होत आहे. निवडणूक विभागाने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी दुपारी ३ पर्यंतचा वेळ दिला होता. त्यानंतर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार होते. मात्र काही गावांमध्ये पॅनलप्रमुख व उमेदवारांनी ग्रामपंचायत बिनविरोध होईल. यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी केली. त्यामुळे काही गावांना अधिकाऱ्यांनी वेळ वाढवून दिला. मात्र रात्री ६ वाजेपर्यंतही त्या गावात बिनविरोधवर एकमत होत नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही चलबिचल सुरू होती. शेवटी गावामध्ये दोन्ही पॅनल समोरासमोर आल्याने बिनविरोधवर एकमत न होता अधिकाऱ्यांसमोरच वाद-विवाद होण्याची शक्यता निर्माण होताच अधिकाऱ्यांनी उशिरा पोलिसांना पाचारण केले. शेवटी काही ग्रामपंचायती बिनविरोध तर झाल्याच नाहीत; मात्र बिनविरोधसाठी थांबलेले तेच उमेदवार रात्री चिन्हे घेऊन गावाकडे परतले. बिनविरोधच्या नावाखाली काही गावे, उमेदवारांना वेळ कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणत्या नियमाखाली वाढवून दिला त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

-----

नागरिकांचं गाऱ्हाणं...

७२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार विवेक साळुंखे यांची नियुक्ती केली आहे. तर त्यांना सहाय्यक म्हणून नायब तहसीलदार एस. पी. तिटकारे यांच्याकडे जबाबदारी आहे. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी तहसीलच्या आवारात गोंधळ घडूनही त्यांना माहिती नसल्याचे सांगण्यात आले. नायब तहसीलदारांनी शासकीय कामानिमित्त परगावी असल्याचे तर तहसीलदारांनी माहिती घेतो, असे सांगून वेळ मारून नेल्याचे खेड भाळवणीचे दत्तात्रय साळुंखे, लक्ष्मण साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

------

काही गावांमधील उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर आमची सही नाही, अशा हरकती घेतल्या होत्या. त्यामुळे काही गावांच्या प्रक्रिया थांबवून त्यांच्या समक्ष आधार कार्ड, इतर कागदपत्रे तपासणीची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे चिन्हवाटपाला वेळ लागला. मात्र काही ठिकाणी वेळ वाढवून देण्याचा प्रकार व चिन्ह वाटून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा प्रकार घडला असल्यास आपण याबाबत माहिती घेऊ.

- विवेक साळुंखे, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, पंढरपूर