शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

बिनविरोधच्या नावाखाली दिला अधिकाऱ्यांनी वेळ वाढवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:11 IST

दिवसभरात काही गावांमध्ये चिन्हांच्या वाटपावरून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सावळा गोंधळ सुरू होता. त्यामुळे नियमापेक्षा हा वेळ कोणी वाढवून ...

दिवसभरात काही गावांमध्ये चिन्हांच्या वाटपावरून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सावळा गोंधळ सुरू होता. त्यामुळे नियमापेक्षा हा वेळ कोणी वाढवून दिला त्या अधिकाऱ्यांवरच आता कारवाईची मागणी होत आहे. निवडणूक विभागाने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यासाठी दुपारी ३ पर्यंतचा वेळ दिला होता. त्यानंतर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार होते. मात्र काही गावांमध्ये पॅनलप्रमुख व उमेदवारांनी ग्रामपंचायत बिनविरोध होईल. यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी केली. त्यामुळे काही गावांना अधिकाऱ्यांनी वेळ वाढवून दिला. मात्र रात्री ६ वाजेपर्यंतही त्या गावात बिनविरोधवर एकमत होत नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही चलबिचल सुरू होती. शेवटी गावामध्ये दोन्ही पॅनल समोरासमोर आल्याने बिनविरोधवर एकमत न होता अधिकाऱ्यांसमोरच वाद-विवाद होण्याची शक्यता निर्माण होताच अधिकाऱ्यांनी उशिरा पोलिसांना पाचारण केले. शेवटी काही ग्रामपंचायती बिनविरोध तर झाल्याच नाहीत; मात्र बिनविरोधसाठी थांबलेले तेच उमेदवार रात्री चिन्हे घेऊन गावाकडे परतले. बिनविरोधच्या नावाखाली काही गावे, उमेदवारांना वेळ कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणत्या नियमाखाली वाढवून दिला त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

-----

नागरिकांचं गाऱ्हाणं...

७२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार विवेक साळुंखे यांची नियुक्ती केली आहे. तर त्यांना सहाय्यक म्हणून नायब तहसीलदार एस. पी. तिटकारे यांच्याकडे जबाबदारी आहे. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी तहसीलच्या आवारात गोंधळ घडूनही त्यांना माहिती नसल्याचे सांगण्यात आले. नायब तहसीलदारांनी शासकीय कामानिमित्त परगावी असल्याचे तर तहसीलदारांनी माहिती घेतो, असे सांगून वेळ मारून नेल्याचे खेड भाळवणीचे दत्तात्रय साळुंखे, लक्ष्मण साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

------

काही गावांमधील उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर आमची सही नाही, अशा हरकती घेतल्या होत्या. त्यामुळे काही गावांच्या प्रक्रिया थांबवून त्यांच्या समक्ष आधार कार्ड, इतर कागदपत्रे तपासणीची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे चिन्हवाटपाला वेळ लागला. मात्र काही ठिकाणी वेळ वाढवून देण्याचा प्रकार व चिन्ह वाटून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा प्रकार घडला असल्यास आपण याबाबत माहिती घेऊ.

- विवेक साळुंखे, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, पंढरपूर