शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

माणूस उभा करण्याला प्राधान्य ! पाणी फाऊंडेशनचे कार्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 15:51 IST

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही गावात पैसा देत नाही;

सोलापूर, दि. 28 - पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही गावात पैसा देत नाही; पण जलसंधारणासाठी प्रत्येक माणसाला श्रमदान करण्यास प्रेरित करून त्याला उभा करण्याचे काम मात्र आम्ही करीत आहोत, असे पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांनी यांनी आज येथे स्पष्ट केले.डॉ. पोळ यांना डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती समाजसेवा पुरस्कार जाहीर झाला. तो स्वीकारण्यासाठी आज ते येथे आले आहेत. सोलापूर श्रमिक पत्रकार संघात त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, समाजाला ज्ञानी करण्याचा पाणी फाऊंडेशनचा उद्देश आहे. जलसंधारणासंदर्भातील कामे पूर्वी यंत्राच्या सहाय्याने केली जायची; पण आम्ही यंत्राला दूर केलं आणि श्रमदानाला महत्त्व दिले. श्रमदान नसल्याने आत्मियता नसायची. आता गावागावातील कामे प्रत्येक गावक-याचे श्रम घेऊनच पूर्ण होत असल्यामुळे या कामांमध्ये आता आत्मियता आली आहे.सध्या ‘काडी कचरामुक्त शिवार’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.  शेतातील कचरा आणि काड्या फेकून देण्याऐवजी त्या मातीत पुरून टाकण्यासाठी जनजागरण केले जात आहे. गांढूळ खताचा वापरही मोठ्या प्रमाणावर व्हावा, यासाठी शेतक-यांना प्रवृत्त केले जात आहे. यामुळे जमिनीचा पोत वाढण्याला मदत होते, असे ते म्हणाले.

पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी यंदा 60 तालुके निवडले होते; पण पुढील वर्षी ही संख्या आम्ही 90 तालुक्यांपर्यंत नेणार आहोत. तालुका निवडताना आम्ही गावामध्ये सहा-सहा महिने पाहणी करतो. यासाठी स्वतंत्र पथक आहे. गावात पाणी या विषयावर ग्रामसभा घेतली जाते. या ग्रामसभेला एकूण लोकसंख्येच्या किती लोक येतात. पाण्याविषयी त्यांना किती आत्मियता आहे. त्यांची श्रमदान करण्याची इच्छाशक्ती आहे का? हे तपासून पाहूनच गावाची निवड केली जात असल्याचे डॉ. पोळ यांनी सांगितले.