शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

माणूस उभा करण्याला प्राधान्य ! पाणी फाऊंडेशनचे कार्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 15:51 IST

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही गावात पैसा देत नाही;

सोलापूर, दि. 28 - पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही गावात पैसा देत नाही; पण जलसंधारणासाठी प्रत्येक माणसाला श्रमदान करण्यास प्रेरित करून त्याला उभा करण्याचे काम मात्र आम्ही करीत आहोत, असे पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांनी यांनी आज येथे स्पष्ट केले.डॉ. पोळ यांना डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती समाजसेवा पुरस्कार जाहीर झाला. तो स्वीकारण्यासाठी आज ते येथे आले आहेत. सोलापूर श्रमिक पत्रकार संघात त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, समाजाला ज्ञानी करण्याचा पाणी फाऊंडेशनचा उद्देश आहे. जलसंधारणासंदर्भातील कामे पूर्वी यंत्राच्या सहाय्याने केली जायची; पण आम्ही यंत्राला दूर केलं आणि श्रमदानाला महत्त्व दिले. श्रमदान नसल्याने आत्मियता नसायची. आता गावागावातील कामे प्रत्येक गावक-याचे श्रम घेऊनच पूर्ण होत असल्यामुळे या कामांमध्ये आता आत्मियता आली आहे.सध्या ‘काडी कचरामुक्त शिवार’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.  शेतातील कचरा आणि काड्या फेकून देण्याऐवजी त्या मातीत पुरून टाकण्यासाठी जनजागरण केले जात आहे. गांढूळ खताचा वापरही मोठ्या प्रमाणावर व्हावा, यासाठी शेतक-यांना प्रवृत्त केले जात आहे. यामुळे जमिनीचा पोत वाढण्याला मदत होते, असे ते म्हणाले.

पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी यंदा 60 तालुके निवडले होते; पण पुढील वर्षी ही संख्या आम्ही 90 तालुक्यांपर्यंत नेणार आहोत. तालुका निवडताना आम्ही गावामध्ये सहा-सहा महिने पाहणी करतो. यासाठी स्वतंत्र पथक आहे. गावात पाणी या विषयावर ग्रामसभा घेतली जाते. या ग्रामसभेला एकूण लोकसंख्येच्या किती लोक येतात. पाण्याविषयी त्यांना किती आत्मियता आहे. त्यांची श्रमदान करण्याची इच्छाशक्ती आहे का? हे तपासून पाहूनच गावाची निवड केली जात असल्याचे डॉ. पोळ यांनी सांगितले.