शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कुरनूर धरण ५१ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST

नळदुर्गचा नर मादी धबधबा सुरू झाल्याने बोरी नदीच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असून, धरणाची वाटचाल ही ५० टक्क्यांपुढे सुरू ...

नळदुर्गचा नर मादी धबधबा सुरू झाल्याने बोरी नदीच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असून, धरणाची वाटचाल ही ५० टक्क्यांपुढे सुरू झाली आहे. हे धरण दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात भरते. परंतु, यावर्षी जुलैच्या महिन्याच्या शेवटी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षीदेखील तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हे धरण जुलैच्या शेवटी ५० टक्के भरत आहे. पाऊस असाच कायम राहिल्यास लवकरच धरण भरेल, अशी शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पावसाळा संपेपर्यंत खबरदारी घेण्याची गरज आहे.

----

इतिहासात प्रथमच...

कुरनूर धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच जुलैमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतक-यातून समाधान व्यक्त होत आहे. या धरणावर हजारो शेतक-यांची पाईपलाईन अवलंबून आहे. तीन नगरपालिकांसह ५१ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या पाण्यामुळे तूर्तास तरी सर्वांचा पाणीप्रश्न मिटला आहे.

------

चपळगाव मंडलात २४० टक्के पाऊस

दरम्यान, यावर्षीच्या पावसाने चपळगाव मंडलातील सरासरी ओलांडली आहे. आजपर्यंत सरासरीच्या १७२ टक्के पाऊस एकट्या चपळगाव मंडलात बरसला आहे. जून महिन्यात सरासरीच्या ११३ टक्के हजेरी लावलेल्या पावसाने जुलै महिन्यात चपळगाव मंडलात सरासरीच्या २३२ टक्के हजेरी लावली आहे. यामुळे प्रथमच जुलै महिन्यात या भागातील ओढे, नाले, नद्या प्रवाहीत झाले आहेत. अती पावसाने खरीप पिकांना मात्र फटका बसला आहे.

---

फोटो : २६ कुरनूर

जिल्ह्यातील पावसाने कुरनूर धरण ५१ टक्के भरलेले दृश्य

260721\fb_img_1602038839089.jpg

सोलापूर जिल्ह्यातील पावसाने कुरनूर धरणात पाणीसाठा वाढत असल्याचे छायाचित्र..