शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

दरवेशी समाजाचे जगणेही बनले अवघड

By admin | Updated: December 17, 2014 23:08 IST

उदरनिर्वाहाचा प्रश्न : कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनीही गेल्या आणि शासनाकडून गुन्हेही दाखल

तानाजी घोरपडे - हुपरी -प्राणीबंदी कायद्याच्या नावाखाली शासनाने दरवेशी समाजाकडून त्यांची उपजिविका चालविण्याचे पारंपरिक साधन असणारी अस्वले हिरावून घेतली आहेत. भरीस भर म्हणून त्यांच्यावर खटलेही दाखल केले. उदरनिर्वाहासाठी राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनीही कुळकायद्याने गेल्या. परिणामी, कुटुंबाच्या चरितार्थासाठी या दरवेशी समाजाला मन:स्ताप सोसत दारोदार अस्वलाशिवाय भटकंती करावी लागत आहे. शासनाने दाखल केलेल्या खटल्यामुळे दरवेशींचे जगणेच अवघड होऊन बसले आहे.एकेकाळी राजाश्रय लाभलेल्या दरवेशी समाजाची जगण्यासाठीची परवड थांबविण्यासाठी शासनाने खटले मागे घेऊन अस्वले पाळण्यास पूर्ववत परवानगी द्यावी, राजर्षी शाहू महाराजांनी कसण्यासाठी दिलेली जमीन परत मिळावी, अशी आर्तता रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील बाळासाहेब हुसेन दरवेशी (वय ७०) हे प्रत्येकाजवळ बोलून दाखवत भावनाविवश होऊन अस्वलांबाबत असलेली माया, जिव्हाळा आपल्या कातर स्वरात बोलत अश्रुवाटे मोकळी करीत असतात.टेंबलाई (कोल्हापूर) देवीच्या यात्रेत पाचव्या माळेला राजर्षी शाहू महाराजांची पालखी नेली जात असे. या पालखीच्या मागे अस्वल व वाघांचा खेळ होत असे. वाघ अस्वलाच्या पोषणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी दरवेशी पाडळी येथे दरवेशी कुटुंबांना शंभर एकर जमीन इनाम दिली होती; पण ही जमीन कुळांनी पुन्हा ताब्यात घेऊन दरवेशींना हाकलून लावल्याने या कुटुंबांची त्यावेळेपासून परवड सुरू आहे. ती अद्यापपर्यंत सुरूच आहे. आमच्या जगण्याचा आधार असणारी अस्वले ही आमची मुले होती. त्यांच्याशिवाय जगताना दु:ख होत आहे. असे सांगत बाबासाहेब दरवेशी यांच्या डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू त्यांच्या भावना सांगून जात होत्या. वार्धक्यामुळे दुसरे कोणतेही काम त्यांना पेलवत नाही. छत्रपती शाहू महाराजांनी उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन कुळकायद्यामध्ये गेली आहे, ती जमीन परत मिळावी यासाठी साकडे घालत आहेत. अस्वले नाहीत, तर निदान जमीन तरी परत मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.एकेकाळी राजाश्रय लाभलेल्या भारतीय लोककलेतील पारंपरिक लोककलाकाराला प्राणीबंदी आदेशामुळे अस्वलाशिवाय पोटाच्या उदरनिर्वाहासाठी दारोदार भटकंती करावी लागत आहे. अस्वल नाही, तर फिरणे जिवाला पटत नाही. ही व्यथा कुणाला सांगून पटतच नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची परवड सुरू असतानाच शासनाने प्राणीबंदी कायद्याखाली दाखल केलेल्या खटल्यामुळे या दरवेशींना हैराण करून सोडले आहे. तसेच त्यांचे जगणेही मुश्कील केले आहे, अशा व्यथा लोकप्रतिनिधींना व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या दरवेशींचा आवाज कोणाच्याही कानापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे शासनदरबारी त्यांची कोणी दखलही घेतलेली नाही. साप, वानर, हत्ती, उंट, आदींचे खेळ दाखविले जातात. मग अस्वलांच्या खेळावरच का बंदी, असा प्रश्न दरवेशींकडून विचारला जात आहे.