शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

दरवेशी समाजाचे जगणेही बनले अवघड

By admin | Updated: December 17, 2014 23:08 IST

उदरनिर्वाहाचा प्रश्न : कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनीही गेल्या आणि शासनाकडून गुन्हेही दाखल

तानाजी घोरपडे - हुपरी -प्राणीबंदी कायद्याच्या नावाखाली शासनाने दरवेशी समाजाकडून त्यांची उपजिविका चालविण्याचे पारंपरिक साधन असणारी अस्वले हिरावून घेतली आहेत. भरीस भर म्हणून त्यांच्यावर खटलेही दाखल केले. उदरनिर्वाहासाठी राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनीही कुळकायद्याने गेल्या. परिणामी, कुटुंबाच्या चरितार्थासाठी या दरवेशी समाजाला मन:स्ताप सोसत दारोदार अस्वलाशिवाय भटकंती करावी लागत आहे. शासनाने दाखल केलेल्या खटल्यामुळे दरवेशींचे जगणेच अवघड होऊन बसले आहे.एकेकाळी राजाश्रय लाभलेल्या दरवेशी समाजाची जगण्यासाठीची परवड थांबविण्यासाठी शासनाने खटले मागे घेऊन अस्वले पाळण्यास पूर्ववत परवानगी द्यावी, राजर्षी शाहू महाराजांनी कसण्यासाठी दिलेली जमीन परत मिळावी, अशी आर्तता रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील बाळासाहेब हुसेन दरवेशी (वय ७०) हे प्रत्येकाजवळ बोलून दाखवत भावनाविवश होऊन अस्वलांबाबत असलेली माया, जिव्हाळा आपल्या कातर स्वरात बोलत अश्रुवाटे मोकळी करीत असतात.टेंबलाई (कोल्हापूर) देवीच्या यात्रेत पाचव्या माळेला राजर्षी शाहू महाराजांची पालखी नेली जात असे. या पालखीच्या मागे अस्वल व वाघांचा खेळ होत असे. वाघ अस्वलाच्या पोषणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी दरवेशी पाडळी येथे दरवेशी कुटुंबांना शंभर एकर जमीन इनाम दिली होती; पण ही जमीन कुळांनी पुन्हा ताब्यात घेऊन दरवेशींना हाकलून लावल्याने या कुटुंबांची त्यावेळेपासून परवड सुरू आहे. ती अद्यापपर्यंत सुरूच आहे. आमच्या जगण्याचा आधार असणारी अस्वले ही आमची मुले होती. त्यांच्याशिवाय जगताना दु:ख होत आहे. असे सांगत बाबासाहेब दरवेशी यांच्या डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू त्यांच्या भावना सांगून जात होत्या. वार्धक्यामुळे दुसरे कोणतेही काम त्यांना पेलवत नाही. छत्रपती शाहू महाराजांनी उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन कुळकायद्यामध्ये गेली आहे, ती जमीन परत मिळावी यासाठी साकडे घालत आहेत. अस्वले नाहीत, तर निदान जमीन तरी परत मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.एकेकाळी राजाश्रय लाभलेल्या भारतीय लोककलेतील पारंपरिक लोककलाकाराला प्राणीबंदी आदेशामुळे अस्वलाशिवाय पोटाच्या उदरनिर्वाहासाठी दारोदार भटकंती करावी लागत आहे. अस्वल नाही, तर फिरणे जिवाला पटत नाही. ही व्यथा कुणाला सांगून पटतच नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची परवड सुरू असतानाच शासनाने प्राणीबंदी कायद्याखाली दाखल केलेल्या खटल्यामुळे या दरवेशींना हैराण करून सोडले आहे. तसेच त्यांचे जगणेही मुश्कील केले आहे, अशा व्यथा लोकप्रतिनिधींना व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या दरवेशींचा आवाज कोणाच्याही कानापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे शासनदरबारी त्यांची कोणी दखलही घेतलेली नाही. साप, वानर, हत्ती, उंट, आदींचे खेळ दाखविले जातात. मग अस्वलांच्या खेळावरच का बंदी, असा प्रश्न दरवेशींकडून विचारला जात आहे.