शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणाची उंची वाढवणं तितकंसं सोपं नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:22 IST

इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी उजनी जलाशयातून पाण्याचा उपसा करून पाच टीएमसी पाणी नेण्याची योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेला ...

इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी उजनी जलाशयातून पाण्याचा उपसा करून पाच टीएमसी पाणी नेण्याची योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेला जिल्ह्यातून तीव्र विरोध केला जात आहे. कोणत्याही स्थितीत पाणी उचलता येणार नाही, अशी भूमिका सर्वस्तरातून घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन पाटील यांनी उजनी धरणाची उंची दोन फुटाने वाढवल्यास धरणात १२ टीएमसी पाणीसाठा होऊ शकेल. त्यातून पाच टीएमसी इंदापूरला नेण्यास हरकत नाही. या कामासाठी फारसा खर्च येणार नाही भूसंपादनाची देखील गरज नाही असे मत व्यक्त केले आहे.

माजी आमदार राजन पाटील यांच्या मताशी असहमती दर्शवत धरणाची उंची वाढवणे आता तितकेसे सोपे राहिले नाही. त्यात अनेक अडचणी आहेत. उंची वाढवणे व्यावहारिक आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. नाव न छापण्याच्या अटीवर या अधिकाऱ्यांनी त्यातील अडथळे आणि तांत्रिक मुद्दे अधोरेखित केले.

------

यापूर्वीच उंची ०.६ मीटरने वाढवली

उजनी धरणाचा प्रकल्पीय पाणीसाठा ११७ टीएमसी होता. पूरनियंत्रणाच्या नावाखाली १९९३ साली दरवाज्यांवर लोखंडी फ्लॅप टाकून ०.६ मीटरने उंची वाढवण्यात आली आहे. ६ टीएमसी पाणी साठा वाढला. उजनीचा पाणीसाठा ११७ वरून १२३ टीएमसी झाला आहे;मात्र कागदोपत्री त्याची नोंद नाही.आजही कागदोपत्री ११७ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद केली जाते.वाढीव पाणी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सोडले जाते.

-----

तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे

उजनी धरणाची उंची वाढवण्याची कल्पना तांत्रिकदृष्ट्या अडचणीची ठरते असे मत तज्ज्ञांनी मांडले. धरण काळ्या मातीत बांधण्यात आले आहे. दोन्ही बाजूला मातीचे भराव आहेत. त्याची क्षमता तपासावी लागेल. दरवाजांची मजबुती, धरणाची साठवण क्षमता तपासावी लागेल. १९६७ साली बांधकाम सुरू झाले त्यावेळी २५० ग्रेडचे लोखंडी बार (सळई) वापरण्यात आले होते. आता ५०० ग्रेडचे बार उपलब्ध आहेत. कमी जाडीच्या बारमुळे त्याची स्थैर्यता तपासण्याची गरज आहे. १९८० साली धरणात पाणीसाठा करण्यात आला. तेव्हापासून धरणाच्या बांधाचा वापर सुरू आहे. आधीच चुन्यात केलेले बांधकाम किती टिकाऊ असेल हे सांगता येत नाही. उंची वाढली तर तळातील बांधकामावर दाब येतो उंची वाढवण्याचे मार्जिन संपले आहे. इतक्या वर्षांनंतर बांधकामाची कार्यक्षमता कमी होत असते. हा विचारही व्हायला हवा असे मत त्यांनी मांडले.

------

भूसंपादनाचा मोठा अडथळा

धरणाची जसजशी उंची वाढेल तसे त्यातील पाणी पसरत जाते. दोन फुटाने धरणाची उंची वाढवल्यास पाणी पातळी वाढणार, त्यासाठी किमान ४३ हजार हेक्टरपेक्षा जास्त भूसंपादन करावे लागेल. सध्या उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात ऊस, केळी अशी पैशांची पिके घेतली जातात. तेथील शेतकरी सहजासहजी भूसंपादनास संमती देतील अशी स्थिती नाही. पूर्वी गरजेपेक्षा अधिक भूसंपादन केले असले तरी ०.६ मीटर उंची वाढल्याने ही जमीन व्यापली आहे. उर्वरित जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. अशा स्थितीत भूसंपादन हा मोठा अडथळा ठरू शकतो.

---------

पाणी कोठून उपलब्ध करणार ?

धरणाची उंची वाढवली तरी त्यासाठी पाणी कोठून उपलब्ध करणार हा प्रश्न आहे. उजनी धरणावर पुणे जिल्ह्यात नवीन १५ धरणे बांधण्यात आली आहेत. उजनीत पाणी येणे कमी झाले आहे. आता तर दर चार वर्षांत एकदाच उजनी पूर्ण क्षमतेने भरते. ही वस्तुस्थिती असून वाढीव पाणी उपलब्ध झाले तरच धरणाच्या उंचीची कल्पना व्यवहार्य ठरू शकते,असे मत भीमा कालवा मंडळाचे निवृत्त अधीक्षक अभियंता ब. दा. तोंडे यांनी व्यक्त केले.

-----