शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीसह द्राक्ष, डाळिंब बागायतदारांच्या चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:01 IST

मंगळवेढा : मंगळवेढा शहर व परिसरात बुधवारी सायंकाळपासून गुरूवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस झाला. ...

मंगळवेढा : मंगळवेढा शहर व परिसरात बुधवारी सायंकाळपासून गुरूवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे ज्वारी, द्राक्ष व डाळिंब बागायतदार यांच्या चिंतेत भर पडली. मात्र, दुपारनंतर ऊन पडल्यामुळे ज्वारीला या हवामानाचा कसलाही धोका नसल्याने ज्वारी काढणीला वेग आला आहे.

मंगळवेढा तालुक्यात ५४ हजार हेक्टरवर ज्वारी व अन्य कडधान्यांची पिके आहेत. यामध्ये सर्वाधिक ज्वारीचे पीक आहे. यावर्षी ज्वारीच्या कोठारात ज्वारीचे पीक चांगले आले आहे. पेरणी मागे-पुढे झाली असली तरी ज्वारीचे पीक मात्र दमदार आले आहे. सध्या ज्वारी काढणीचे दिवस असून, दररोज बोराळे नाका येथे अडीच ते तीन हजार मजूर रोजगारसाठी येत आहेत. तसेच अनेक मजूर काळ्या शिवारामध्ये तळ ठोकून आहेत. हे मजूर एकरावर ज्वारी काढणीचे काम घेत आहेत. मात्र, कालच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु, गुरुवारी दुपारी ऊन व सावली असे ढगाळ वातावरण तयार झाले होते. मात्र, ज्वारीवर या वातावरणाचा कसलाही परिणाम होत नाही. द्राक्ष, डाळिंबासह इतर पिकांना अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

तालुक्यात सात हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष तर १५ हजार हेक्टरवर डाळिंबाचे पीक आहे. अगोदरच अवकाळी पावसाने ही पिके वाया गेली होती. त्यातच कोरोनानंतर आता कुठेतरी शेतकरी पीक घेऊ लागला असताना यामध्ये अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने अधिकच भर घातली आहे. त्यामुळे शेतकरी सतत निसर्गाच्या व मानवनिर्मित वातावरणाच्या संकटात सापडू लागला आहे.

ज्वारी काढणीसाठी लगबग

सध्या नवीन ज्वारीला अडीच ते तीन हजार रूपयांचा दर आहे तर जुन्या ज्वारीला साडेतीन ते चार हजारांचा भाव आहे. करडई, हरभरा, जवस ही पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. वातावरणाचा पिकांना फटका बसू नये, म्हणून शेतकरी जादा मजूर लावून शेतातील कामे करून घेत आहेत.