शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

तर रेल्वेतील चेंगराचेंगरी रोखू शकेल !

By admin | Updated: May 20, 2014 01:07 IST

इंद्रायणीचीच अधिक भीती : मुंबई-पुणे-सोलापूर गाडीला एकच क्रमांक असावा

सोलापूर : पुण्यात इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे प्रशासन, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अलर्ट झाले आहेत. दरम्यान, गाडी एकच मात्र तिचे काही अंतरांपर्यंत वेगवेगळे क्रमांक असल्यामुळे ही घटना घडल्याच्या प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांमधून ऐकावयास मिळाल्या. मुंबई-पुणे ही गाडी २२१५ या क्रमांकाने धावते. पुढे ती पुणे-सोलापूर इंद्रायणी म्हणून धावताना तिचा क्रमांक बदलला जातो. सोलापूरपर्यंत इंद्रायणी एक्स्प्रेसचा क्रमांक असतो तो २२१७०. दुपारी दीड ते पावणेदोनच्या दरम्यान इंद्रायणी सोलापूरला येते. ती काही वेळानंतर पुन्हा पुण्याकडे मार्गस्थ होते. मार्गस्थ होणार्‍या या गाडीचा क्रमांक पुन्हा बदलला जातो. दुपारी दोन वाजता सुटलेली इंद्रायणी पुढे मुंबईकडे जाते. त्यावेळी तिचा क्रमांक २२१० असा होतो. काही जणांना सोलापूरहून मुंबईकडे जावे लागते. इंद्रायणी गाडीतून जर प्रवास करावयाचा असेल तर त्याला पुणेपर्यंतच प्रवास मिळतो. पुन्हा त्याला तिकीट काढून पुढचा प्रवास करावा लागतो. एकूणच सातत्याने बदलत असलेल्या गाडी क्रमांकाचा फटकाही बसतो. शिवाय मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडण्याची शक्यता असते. जी गाडी मुंंबईहून पुण्याला धावते. तीच गाडी इंद्रायणी नावाने पुढे सोलापूर आणि लगेच पुण्याला रवाना होते, त्या गाडीचा क्रमांक कायम ठेवला तर दुर्घटना टळू शकेल, असा अंदाज जिल्हा प्रवासी संघाचे अध्यक्ष हर्षद मोरे, उपाध्यक्ष संजय पाटील, सोलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव आदींनी वर्तवला आहे.

--------------------------

लोहमार्ग, आरपीएफ पछाडत आहेत जंग जंग ४पुण्याहून सोलापूरला तर सोलापूरहून पुण्याला जाणार्‍या प्रवाशांची संख्या वाढतच असते. पुण्याहून सोलापूरला येणार्‍या इंद्रायणीतून उतरणार्‍या आणि गाडीत प्रवेश मिळण्यासाठी प्रवासी आमने-सामने भिडत असतात. यातून मोठ्या प्रमाणावर गोंधळ तर उडतोच शिवाय काही दुर्घटना घडण्याची भीती अधिक असते. इंद्रायणी येण्याच्या आणि जाण्याच्या वेळेत लोहमार्ग आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जवान आपल्या परीने गर्दीवर नियंत्रण आणतात खरे. मात्र शेवटी प्रवाशांचेही काही कर्तव्य आहे.