शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

दुकानदाराला मास्क नसेल तर होणार परवाना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST

राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा टप्पा संपल्यानंतर जिल्हा परिषदेने ‘माझे गाव कोरोनामुक्त’ ही मोहीम हाती घेतली ...

राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा टप्पा संपल्यानंतर जिल्हा परिषदेने ‘माझे गाव कोरोनामुक्त’ ही मोहीम हाती घेतली आहे. गावे कोरोनामुक्त करण्याच्या मोहिमेचे उद्दिष्ट असून, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता गावपातळीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गावातील प्रत्येकाने मास्क घातलाच पाहिजे. रस्त्यावर विनामास्क आढळणाऱ्यांना ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आणि आरोग्य सेवकांमार्फत तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्यांदा दुकानदार, रस्त्यावरील भाजीविक्रेते, बसस्थानक, सरकारी कार्यालयात येणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून १५ डिसेंबर रोजी सर्व गावात आरोग्य व ग्रामपंचायत विभागामार्फत प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात येणार आहे. ७ डिसेंबर रोजी ७ गावात या मोहिमेला सुरुवात करण्यात येईल. जिल्ह्यात अद्यापही कोरोना रुग्ण आढळत आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी चाचण्या वाढविण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा तपासणी करण्यात येईल. नवीन वर्षात ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण अत्यंत कमी करण्यावर भर असेल, असे स्वामी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव उपस्थित होते.

अठरा वेळा तपासणी केली

खोकलले तरी नागरिक घाबरतात, म्हणून आंबट पदार्थ वर्ज्य केले. लोकांमध्ये मिसळण्यासाठी १८ वेळा कोरोना चाचणी केल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले. त्यामुळे शंका आली की चाचणी करा व कोरोनाला घाबरू नका, असे आवाहन यावेळी केले.