शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

राजकारणी, समाजसेवक एकत्र आल्यास विकास

By admin | Updated: September 3, 2014 01:08 IST

निशिगंधा माळी: जिल्हा युवा पुरस्काराचे वितरण

सोलापूर : समाजसेवक नेहमीच राजकारण्यांना दोष देत केलेल्या कामांवर आक्षेप घेतात. हे दोघे कधी एकत्र बसून विकासाचा आराखडा बनवत नाहीत. ज्यावेळी समाजसेवक व राजकारणी एकत्र येऊन विचारविनिमय करतील, त्यावेळीच विकास होण्यास मदत होणार असल्याचा आशावाद जि. प. च्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा युवा पुरस्काराच्या वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डुबे होते. यावेळी प्रताप कचरे यांना युवा तर ड्रीम फाउंडेशनला संस्था पुरस्कार देण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे उपस्थित होते. एक शिक्षक उत्तमरित्या अध्यापनाचे काम केल्यास त्याच्या हातून सात पिढ्यांचा उद्धार होऊ शकतो. अभियंता आयुष्यभर अभियंताच राहतो. डॉक्टर आपलाच पेशा करतो तर शिक्षक मात्र समाजातील विविध घटक घडविण्याचे काम करीत असल्याने देशाच्या जडणघडणीत त्याचा मोलाचा वाटा असतो. राजकारणात सध्या वाईट प्रवृत्ती जन्म घेत असल्याने अधोगती होत आहे, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन निर्धार केल्यास विकास होणे शक्य आहे. राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिल्यास समस्या नष्ट होण्यास मदत होणार आहे. मात्र यावर कोणीच विचारमंथन करीत नसल्याने प्रश्न व समस्या तशाच असल्याचेही त्यांनी सांगितले. एकाला मिळालेले ज्ञान ते दुसऱ्याला दिल्यास दुसऱ्याला एक भाकरी मिळण्यास मदत होते. यासाठी प्रत्येकांनी ज्ञानाची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे, असा सल्लाही डॉ. माळी यांनी दिला. प्रास्ताविकात भाग्यश्री बिले यांनी देशाच्या जडणघडणीमध्ये युवकांचा मोठा योगदान असल्याने शासन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देत असल्याचे सांगितले. यावेळी प्रताप कचरे व काशिनाथ भतगुणकी, अनिल देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.