शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माळेवाडी-बोरगाव ग्रामपंचायतीसमोरच केला अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:26 IST

माळेवाडी-बोरगाव येथील मागासवर्गीय समाजातील माजी सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे २० ऑगस्ट २०२१ रोजी रात्री २ वाजता निधन झाले. ...

माळेवाडी-बोरगाव येथील मागासवर्गीय समाजातील माजी सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे २० ऑगस्ट २०२१ रोजी रात्री २ वाजता निधन झाले. सकाळी त्यांच्यावर माळेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने तेथील खासगी शेतकऱ्याने त्यांच्या शेतातून अंत्ययात्रा नेण्यासाठी विरोध केला. याला कारण की काही महिन्यांपूर्वी मयताच्या नातेवाइकांनी त्यांच्याविरुद्ध दोन केसेस केल्या होत्या. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने त्यांच्या शेतातून जाण्यासाठी त्यांना मनाई केली. यानंतर मागासवर्गीय समाजातील लोकांनी तहसीलदार व पोलिसांना कळवले. त्यानंतर माळशिरसचे तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. मयताचे नातेवाईक व शेतकऱ्याबरोबर चर्चा केली. मात्र यातून काहीही मार्ग निघाला नसल्याने मयताच्या नातेवाइकांनी ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी केला.

सार्वजनिक ठिकाणी माळेवाडी-बोरगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रेताचे दहन करून, सार्वजनिक उपद्रव करून प्रेताची विटंबना केली. म्हणून सात जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदला आहे. यामध्ये दशरथ आनंता साठे, मिथुन सुरेश साठे, अनिकेत दशरथ साठे, अभिषेक दशरथ साठे, किरण सुरेश साठे, सुरेश आनंता साठे, अरुण आनंता साठे (सर्व रा. माळेवाडी-बोरगाव, ता. माळशिरस) यांचा समावेश आहे.

------

उपसरपंच, पोलीस पाटील यांच्यासह १३ जणांवर ॲट्रॉसिटी

सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधीला अडवणूक केल्याबद्दल विमल सुरेश साठे (रा. माळेवाडी-बोरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपसरपंच रवींद्र शहाजीराव पाटील, सदस्य प्रवीण मधुकर कुदळे, चंद्रकांत मारुती पांढरे, पोलीस पाटील गजेंद्र भीमराव पांढरे, संभाजी नाथाजी कुदळे, जयरम रामचंद्र कुदळे, भगवान बाबुराव कुदळे, रामचंद्र मच्छींद्र पांढरे, राहुल शिवाजी कुदळे, विनायक शिवाजी कुदळे, सुभाष सदाशिव पांढरे, संदीप भगवान कुदळे, अमोल दत्तात्रय कुदळे अशा १३ जणांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

-----

सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने तहसीलदारांना आम्ही बोरगाव स्मशानभूमीत अंत्यविधी करण्याचे सुचविले होते. तरीसुद्धा गावाला वेठीस धरून ग्रामपंचायतीसमोर दहन करून मयताची त्यांनी विटंबना केली आहे. ही गोष्ट अशोभनीय आहे.

- रवींद्र पाटील, उपसरपंच, माळेवाडी-बोरगाव

----

शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी रात्री २ वाजता मयत झालेल्या व्यक्तीचे सायंकाळी ६.३० पर्यंत दहन झाले नव्हते. स्मशानभूमीत जाण्यास मज्जाव केल्यामुळे मयत व्यक्तीच्या नातेवाइकांना जवळपास १४ ते १५ तास वाट पाहावी लागली. शेवटी तहसीलदारांनी पर्याय दिला. परंतु पावसामुळे चिखलामधून स्मशानभूमीकडे जाता येईना. दुसरा पर्याय निघत नसल्यामुळे आमच्या नातेवाईक व सामाजिक संघटनांनी याचा निषेध म्हणून ग्रामपंचायतीसमोर मयताचा अंत्यविधी केला. आम्हाला न्याय मिळावा.

- विमल सुरेश साठे, मयताचे नातेवाईक

----