शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

जीव मुठीत घेऊन पाण्यातून वाट काढत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:22 IST

गेल्या दोन दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे बोरी नदीकाठी असलेल्या आंदेवाडी (ज.) गावाला चहुबाजूने पाण्याने वेढले. यामुळे ...

गेल्या दोन दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे बोरी नदीकाठी असलेल्या आंदेवाडी (ज.) गावाला चहुबाजूने पाण्याने वेढले. यामुळे जोडणारे दुधनी-आंदेवाडी, बोरोटी-आंदेवाडी हे दोन्ही मार्ग गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत बंद पडले. अशातच गावातल्या शावरेप्पा पुजारी (वय ६०) यांचं गुरुवारी मध्यरात्री निधन झालं. बाहेर पाऊस घरात मृतदेह पुजारी कुटुंबीयांना काहीच सूचेना. मयतासाठी साहित्य आणायचे म्हटले तर बाहेर जायला मार्गही नव्हता. चहूबाजूने पाणीच पाणी. त्यातच धनगर समाजासाठी स्मशानभूमीही नसल्यामुळे रात्र कशीबशी काढली. थोडेफार पाणी ओसरल्यानंतर अंत्यविधीच्या सामानाची जुळवाजुळव करून पुलावरील पाण्यातून जीव मुठीत घेऊन वाट काढत पुजारी यांच्या स्वत:च्या शेतामध्ये शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पाच मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

----

दोन्ही रस्त्यावरील पुलाची उंची वाढवावी. प्रत्येक समाजाला स्मशानभूमी व्हावी म्हणून शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव दिला आहे. पूल झाला असता तर पुजारी यांच्या अंत्ययात्रेसाठी पाण्यातून जीव मुठीत घेऊन जावे लागले नसते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

- मल्लप्पा बिराजदार,

सरपंच

----

दोन वर्षांपासून आमच्या गावाला पुराच्या पाण्याने वेढा पडतो. इतर गावांशी संपर्क तुटतो. काही समाजाला स्मशानभूमी नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. गावाचे स्थलांतर करणे आवश्यक आहे.

- श्रीशैल पाटील, आंदेवाडी, पोलीस पाटील.

फोटो

आंदेवाडी (ज)येथील शावरेप्पा पुजारी यांच्या अंत्ययात्रेसाठी पुलावरील पाण्यातून वाट काढताना ग्रामस्थ.