शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

...अखेर वीजवितरणने तोडलेले कनेक्शन जोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

वीजवितरण कंपनीने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देऊन सळो की पळो करून सोडले आहे. पैसे न भरल्यामुळे वीजवितरणच्या अधिकाऱ्यांनी मंगळवेढा ...

वीजवितरण कंपनीने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देऊन सळो की पळो करून सोडले आहे. पैसे न भरल्यामुळे वीजवितरणच्या अधिकाऱ्यांनी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात घरगुती, उद्योग व शेतीपंपाच्या थकीत बिलापोटी कनेक्शन कट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. साखर कारखान्यांनी १५०० रुपयांच्या पुढील रक्कम अदा न केल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. वारंवार पडणाऱ्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने गोरगरीब मजुरांना कामे नसल्यामुळे तेही आर्थिक अडचणीत आहेत.

अशा परिस्थितीत वीजवितरणने रेटून वसुली सुरू केली आहे. मंगळवेढा शहरात ३० घरगुती ग्राहकांचे कनेक्शन बंद केल्याचे समजताच जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह संध्याकाळी ७.३० वा. वीजवितरण कार्यालयात येऊन कनिष्ठ अभियंता कोळेकर यांना घेराव घालत घोषणाबाजी केली. यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून वीजवितरणच्या अधिकाऱ्यांनी माघार घेत तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववत केले.

यावेळी रघुनाथ चव्हाण, बीरू ढेकळे, बाळासाहेब नागणे, किशोर दत्तू, पप्पू दत्तू, अनिल दत्तू, उमेश दत्तू, अमोल माळी, नेताजी बाबर, शिवाजी कांबळे, सुरेश मुदगूल, सुखदेव डोरले, राजेंद्र मेहेरकर, बंडू मेहेरकर, रवी चेळेकर, धनंजय नवाळे यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

ओळी ::::::::::::::::::::::

वीजवितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता कोळेकर यांना प्रभाकर देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याचे छायाचित्र.