शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

...अखेर वीजवितरणने तोडलेले कनेक्शन जोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

वीजवितरण कंपनीने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देऊन सळो की पळो करून सोडले आहे. पैसे न भरल्यामुळे वीजवितरणच्या अधिकाऱ्यांनी मंगळवेढा ...

वीजवितरण कंपनीने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देऊन सळो की पळो करून सोडले आहे. पैसे न भरल्यामुळे वीजवितरणच्या अधिकाऱ्यांनी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात घरगुती, उद्योग व शेतीपंपाच्या थकीत बिलापोटी कनेक्शन कट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. साखर कारखान्यांनी १५०० रुपयांच्या पुढील रक्कम अदा न केल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. वारंवार पडणाऱ्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने गोरगरीब मजुरांना कामे नसल्यामुळे तेही आर्थिक अडचणीत आहेत.

अशा परिस्थितीत वीजवितरणने रेटून वसुली सुरू केली आहे. मंगळवेढा शहरात ३० घरगुती ग्राहकांचे कनेक्शन बंद केल्याचे समजताच जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह संध्याकाळी ७.३० वा. वीजवितरण कार्यालयात येऊन कनिष्ठ अभियंता कोळेकर यांना घेराव घालत घोषणाबाजी केली. यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून वीजवितरणच्या अधिकाऱ्यांनी माघार घेत तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववत केले.

यावेळी रघुनाथ चव्हाण, बीरू ढेकळे, बाळासाहेब नागणे, किशोर दत्तू, पप्पू दत्तू, अनिल दत्तू, उमेश दत्तू, अमोल माळी, नेताजी बाबर, शिवाजी कांबळे, सुरेश मुदगूल, सुखदेव डोरले, राजेंद्र मेहेरकर, बंडू मेहेरकर, रवी चेळेकर, धनंजय नवाळे यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

ओळी ::::::::::::::::::::::

वीजवितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता कोळेकर यांना प्रभाकर देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याचे छायाचित्र.