शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

उसाच्या एफआरपीसाठी शेतकरी आक्रमक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:22 IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने तीन टप्प्यात उसाचा एफआरपी देण्यासंदर्भात सुरु असलेल्या विचार विनिमयासंदर्भात संभ्रम निर्माण झाल्याने पुन्हा ...

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने तीन टप्प्यात उसाचा एफआरपी देण्यासंदर्भात सुरु असलेल्या विचार विनिमयासंदर्भात संभ्रम निर्माण झाल्याने पुन्हा गोड ऊस कडू ठरू नये यासाठी सर्वपक्षीय शेतकरी पुत्र या मोहिमेत सहभागी झाल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे.

----

एकरकमी बिलाशिवाय माघार नाही

उसाचा तीन टप्प्यात एफआरपी देण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध आहे. यापुढे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढून एकरकमी ऊस बिल मिळावे यासाठी लढत राहणार आहे. एकरकमी बिल घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, अशा प्रतिक्रिया स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे यांनी दिली.

-

केंद्र सरकारने साखर उद्योगावरील निर्याती संदर्भातील निर्बंध शिथिल करुन साखर निर्यात वाढवावी. साखरेचे दर वाढवावे. तसेच राज्य सरकारने शेअरिंग कायद्याची अंमलबजावणी करून दोन्ही सरकार कडून योग्य तो तोडगा काढून उसाला तीन हजार रुपये हप्ता जाहीर करावा. सध्याचा एफआरपी चा कायदा आम्हाला मान्य नसून योग्य निर्णय न झाल्यास १ ऑक्टोबरनंतर सोलापूर जिल्ह्यात मोठे आंदोलन करणार आहे.

- संजय पाटील- घाटणेकर संस्थापक अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना