शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

प्रयोगशील नेत्याची हुरहूर लावणारी ‘एक्झिट’

By admin | Updated: June 4, 2014 00:37 IST

भारतीय जनता पक्षाला महाराष्टÑात जनाधार मिळाला तो गोपीनाथ मुंडे यांच्या सोशल इंजिनिअरिंग प्रयोगामुळे.

सोलापूर: ‘शेठजी अन् भटजीं’चा पक्ष असे हिणवले गेलेला आणि तशीच काहीशी ओळख झालेल्या भारतीय जनता पक्षाला महाराष्टÑात जनाधार मिळाला तो गोपीनाथ मुंडे यांच्या सोशल इंजिनिअरिंग प्रयोगामुळे. ‘सोशल इंजिनिअरिंग’ हा शब्द मायावतींच्या उत्तर प्रदेशातील यशामुळे राजकारणात रूढ झाला असला तरी या कल्पनेवर पंधरा वर्षांपूर्वीच मुंडे यांनी यशस्वीपणे काम केले होते....राजकारणातील या प्रयोगशील नेत्याची आकस्मिक ‘एक्झिट’ सर्वांनाच हुरहूर लावून गेली. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक सक्षम नेतृत्व मिळाले अन् आता ‘अच्छे दिन’ आले असे म्हणत असताना उजाडता मंगळवार ‘निहायत बुरा दिन’ घेऊन आला. भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश म्हणजे काय चमत्कार होता का? मोदी म्हणतात, अनेक पिढ्या आणि कार्यकर्त्यांनी आपले जीवन वाहिले, तेव्हा हे यश मिळाले. महाराष्टÑात भाजपला जनाधार मिळवून देण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनीही आपले अवघे तारूण्य समर्पित केले. प्रमोद महाजनांच्या साथीने त्यांनी महाराष्टÑाच्या कानाकोपर्‍याशी संपर्क स्थापित केला. मुंडे जिथे जिथे जातील तिथे लोक जमा व्हायचे. त्यांची भूमिका जाणून घ्यायचे; पण निवडणुकांमध्ये जनाधार मिळायचा नाही. भाजपला ‘शेठजी आणि भटजी’ यांचा पक्ष म्हणूनच हिणवले जायचे. मुंडे यांनी भाजपची ही ओळख पुसायची असे ठरविले आणि सर्व जाती-धर्मातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील करून त्यांना मानाचे स्थान देण्याचा धडाका लावला. महाराष्टÑाच्या राजकारणावर मराठा समाजाचा मोठा प्रभाव आहे. लोकप्रिय असलेले मराठा नेते भाजपमध्ये कसे सामील होतील यावर त्यांनी विचार केला अन् छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना राज्यमंत्रीपद दिले. अण्णा डांगे यांच्यामुळे भाजपचा धनगर समाजामध्ये पाया होता; पण मुंडे यांनी कवठे महांकाळ येथील प्रकाश शेंडगे यांच्या गळ्यात भाजपचे उपरणे घालून या समाजातील पक्षाचा पाया व्यापक केला. मुंडे यांच्या सोशल इंजिनिअरिंगची अशी राज्यात अनेक उदाहरणे आहेत. सोलापूर जिल्ह्यापुरते बोलायचे तर महाराष्टÑातील राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते - पाटील यांचे कनिष्ठ बंधू प्रतापसिंह मोहिते - पाटील यांना भाजपमध्ये आणले. त्यांना महाराष्टÑ सरकारमध्ये राज्यमंत्रीपद दिले. पश्चिम महाराष्टÑातील भाजपचा ‘बेस’ निर्माण करण्यासाठीचे हे महत्त्वाचे पाऊल होते; पुढे प्रतापसिंह भाजपचे खासदारही झाले. ‘लोकमंगल’ समूहाचे सुभाष देशमुख या मराठा नेत्याला सुरूवातीला मुंडे यांनीच बळ दिले. ते विधानपरिषदेवर निवडून आले. त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी भाजपचा झेंडा फडकाविला. अगदी अलीकडे लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. शरद बनसोडे यांना भाजपची उमेदवारी घेण्यासाठी मुंडे यांनीच प्रोत्साहन दिले आणि तब्बल दहा वर्षांनंतर सोलापूरची जागा भाजपसाठी जिंकून घेतली. मुंडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच अगदी सामान्य सोलापूरकरांच्याही काळजाचा ठोका चुकला. सर्व जाती-धर्मांना घेऊन जाणारा सर्वसमावेशक नेता हरपल्याबद्दल दु:ख व्यक्त झाले. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर आले. चौकाचौकात मुंडेंची छायाचित्रे लावून गुलाबपुष्पांनी आदरांजली वाहण्यात आली.

-----------------------

प्रेमाचा अधिकार

गोपीनाथ मुंडे प्रत्येक कार्यकर्त्याशी अधिकाराने बोलत; पण तो अधिकार प्रेमाचा असे. दोन प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असल्यास ते दोघांनाही स्वतंत्रपणे भेटून प्रेमळ अधिकारवाणीने त्यांच्यात समेट घडवून आणत. खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्यावरही असाच मुंडे यांनी प्रेमाचा अधिकार गाजविला होता. अ‍ॅड. बनसोडे लोकसभेची निवडणूक लढायला तयार नव्हते. मुंडे यांच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा त्यांनी अ‍ॅड. बनसोडे यांना बोलावून घेतले अन् सांगितले, ‘तू लोकसभा निवडणूक लढणार आहेस’. मुंडे यांच्या या प्रेमळ आग्रहामुळेच अ‍ॅड. बनसोडे यांनी निवडणूक लढविली.