शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

प्रयोगशील नेत्याची हुरहूर लावणारी ‘एक्झिट’

By admin | Updated: June 4, 2014 00:37 IST

भारतीय जनता पक्षाला महाराष्टÑात जनाधार मिळाला तो गोपीनाथ मुंडे यांच्या सोशल इंजिनिअरिंग प्रयोगामुळे.

सोलापूर: ‘शेठजी अन् भटजीं’चा पक्ष असे हिणवले गेलेला आणि तशीच काहीशी ओळख झालेल्या भारतीय जनता पक्षाला महाराष्टÑात जनाधार मिळाला तो गोपीनाथ मुंडे यांच्या सोशल इंजिनिअरिंग प्रयोगामुळे. ‘सोशल इंजिनिअरिंग’ हा शब्द मायावतींच्या उत्तर प्रदेशातील यशामुळे राजकारणात रूढ झाला असला तरी या कल्पनेवर पंधरा वर्षांपूर्वीच मुंडे यांनी यशस्वीपणे काम केले होते....राजकारणातील या प्रयोगशील नेत्याची आकस्मिक ‘एक्झिट’ सर्वांनाच हुरहूर लावून गेली. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक सक्षम नेतृत्व मिळाले अन् आता ‘अच्छे दिन’ आले असे म्हणत असताना उजाडता मंगळवार ‘निहायत बुरा दिन’ घेऊन आला. भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश म्हणजे काय चमत्कार होता का? मोदी म्हणतात, अनेक पिढ्या आणि कार्यकर्त्यांनी आपले जीवन वाहिले, तेव्हा हे यश मिळाले. महाराष्टÑात भाजपला जनाधार मिळवून देण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनीही आपले अवघे तारूण्य समर्पित केले. प्रमोद महाजनांच्या साथीने त्यांनी महाराष्टÑाच्या कानाकोपर्‍याशी संपर्क स्थापित केला. मुंडे जिथे जिथे जातील तिथे लोक जमा व्हायचे. त्यांची भूमिका जाणून घ्यायचे; पण निवडणुकांमध्ये जनाधार मिळायचा नाही. भाजपला ‘शेठजी आणि भटजी’ यांचा पक्ष म्हणूनच हिणवले जायचे. मुंडे यांनी भाजपची ही ओळख पुसायची असे ठरविले आणि सर्व जाती-धर्मातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील करून त्यांना मानाचे स्थान देण्याचा धडाका लावला. महाराष्टÑाच्या राजकारणावर मराठा समाजाचा मोठा प्रभाव आहे. लोकप्रिय असलेले मराठा नेते भाजपमध्ये कसे सामील होतील यावर त्यांनी विचार केला अन् छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना राज्यमंत्रीपद दिले. अण्णा डांगे यांच्यामुळे भाजपचा धनगर समाजामध्ये पाया होता; पण मुंडे यांनी कवठे महांकाळ येथील प्रकाश शेंडगे यांच्या गळ्यात भाजपचे उपरणे घालून या समाजातील पक्षाचा पाया व्यापक केला. मुंडे यांच्या सोशल इंजिनिअरिंगची अशी राज्यात अनेक उदाहरणे आहेत. सोलापूर जिल्ह्यापुरते बोलायचे तर महाराष्टÑातील राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते - पाटील यांचे कनिष्ठ बंधू प्रतापसिंह मोहिते - पाटील यांना भाजपमध्ये आणले. त्यांना महाराष्टÑ सरकारमध्ये राज्यमंत्रीपद दिले. पश्चिम महाराष्टÑातील भाजपचा ‘बेस’ निर्माण करण्यासाठीचे हे महत्त्वाचे पाऊल होते; पुढे प्रतापसिंह भाजपचे खासदारही झाले. ‘लोकमंगल’ समूहाचे सुभाष देशमुख या मराठा नेत्याला सुरूवातीला मुंडे यांनीच बळ दिले. ते विधानपरिषदेवर निवडून आले. त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी भाजपचा झेंडा फडकाविला. अगदी अलीकडे लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. शरद बनसोडे यांना भाजपची उमेदवारी घेण्यासाठी मुंडे यांनीच प्रोत्साहन दिले आणि तब्बल दहा वर्षांनंतर सोलापूरची जागा भाजपसाठी जिंकून घेतली. मुंडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच अगदी सामान्य सोलापूरकरांच्याही काळजाचा ठोका चुकला. सर्व जाती-धर्मांना घेऊन जाणारा सर्वसमावेशक नेता हरपल्याबद्दल दु:ख व्यक्त झाले. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर आले. चौकाचौकात मुंडेंची छायाचित्रे लावून गुलाबपुष्पांनी आदरांजली वाहण्यात आली.

-----------------------

प्रेमाचा अधिकार

गोपीनाथ मुंडे प्रत्येक कार्यकर्त्याशी अधिकाराने बोलत; पण तो अधिकार प्रेमाचा असे. दोन प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असल्यास ते दोघांनाही स्वतंत्रपणे भेटून प्रेमळ अधिकारवाणीने त्यांच्यात समेट घडवून आणत. खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्यावरही असाच मुंडे यांनी प्रेमाचा अधिकार गाजविला होता. अ‍ॅड. बनसोडे लोकसभेची निवडणूक लढायला तयार नव्हते. मुंडे यांच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा त्यांनी अ‍ॅड. बनसोडे यांना बोलावून घेतले अन् सांगितले, ‘तू लोकसभा निवडणूक लढणार आहेस’. मुंडे यांच्या या प्रेमळ आग्रहामुळेच अ‍ॅड. बनसोडे यांनी निवडणूक लढविली.