शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशील नेत्याची हुरहूर लावणारी ‘एक्झिट’

By admin | Updated: June 4, 2014 00:37 IST

भारतीय जनता पक्षाला महाराष्टÑात जनाधार मिळाला तो गोपीनाथ मुंडे यांच्या सोशल इंजिनिअरिंग प्रयोगामुळे.

सोलापूर: ‘शेठजी अन् भटजीं’चा पक्ष असे हिणवले गेलेला आणि तशीच काहीशी ओळख झालेल्या भारतीय जनता पक्षाला महाराष्टÑात जनाधार मिळाला तो गोपीनाथ मुंडे यांच्या सोशल इंजिनिअरिंग प्रयोगामुळे. ‘सोशल इंजिनिअरिंग’ हा शब्द मायावतींच्या उत्तर प्रदेशातील यशामुळे राजकारणात रूढ झाला असला तरी या कल्पनेवर पंधरा वर्षांपूर्वीच मुंडे यांनी यशस्वीपणे काम केले होते....राजकारणातील या प्रयोगशील नेत्याची आकस्मिक ‘एक्झिट’ सर्वांनाच हुरहूर लावून गेली. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक सक्षम नेतृत्व मिळाले अन् आता ‘अच्छे दिन’ आले असे म्हणत असताना उजाडता मंगळवार ‘निहायत बुरा दिन’ घेऊन आला. भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश म्हणजे काय चमत्कार होता का? मोदी म्हणतात, अनेक पिढ्या आणि कार्यकर्त्यांनी आपले जीवन वाहिले, तेव्हा हे यश मिळाले. महाराष्टÑात भाजपला जनाधार मिळवून देण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनीही आपले अवघे तारूण्य समर्पित केले. प्रमोद महाजनांच्या साथीने त्यांनी महाराष्टÑाच्या कानाकोपर्‍याशी संपर्क स्थापित केला. मुंडे जिथे जिथे जातील तिथे लोक जमा व्हायचे. त्यांची भूमिका जाणून घ्यायचे; पण निवडणुकांमध्ये जनाधार मिळायचा नाही. भाजपला ‘शेठजी आणि भटजी’ यांचा पक्ष म्हणूनच हिणवले जायचे. मुंडे यांनी भाजपची ही ओळख पुसायची असे ठरविले आणि सर्व जाती-धर्मातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील करून त्यांना मानाचे स्थान देण्याचा धडाका लावला. महाराष्टÑाच्या राजकारणावर मराठा समाजाचा मोठा प्रभाव आहे. लोकप्रिय असलेले मराठा नेते भाजपमध्ये कसे सामील होतील यावर त्यांनी विचार केला अन् छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना राज्यमंत्रीपद दिले. अण्णा डांगे यांच्यामुळे भाजपचा धनगर समाजामध्ये पाया होता; पण मुंडे यांनी कवठे महांकाळ येथील प्रकाश शेंडगे यांच्या गळ्यात भाजपचे उपरणे घालून या समाजातील पक्षाचा पाया व्यापक केला. मुंडे यांच्या सोशल इंजिनिअरिंगची अशी राज्यात अनेक उदाहरणे आहेत. सोलापूर जिल्ह्यापुरते बोलायचे तर महाराष्टÑातील राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते - पाटील यांचे कनिष्ठ बंधू प्रतापसिंह मोहिते - पाटील यांना भाजपमध्ये आणले. त्यांना महाराष्टÑ सरकारमध्ये राज्यमंत्रीपद दिले. पश्चिम महाराष्टÑातील भाजपचा ‘बेस’ निर्माण करण्यासाठीचे हे महत्त्वाचे पाऊल होते; पुढे प्रतापसिंह भाजपचे खासदारही झाले. ‘लोकमंगल’ समूहाचे सुभाष देशमुख या मराठा नेत्याला सुरूवातीला मुंडे यांनीच बळ दिले. ते विधानपरिषदेवर निवडून आले. त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी भाजपचा झेंडा फडकाविला. अगदी अलीकडे लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. शरद बनसोडे यांना भाजपची उमेदवारी घेण्यासाठी मुंडे यांनीच प्रोत्साहन दिले आणि तब्बल दहा वर्षांनंतर सोलापूरची जागा भाजपसाठी जिंकून घेतली. मुंडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच अगदी सामान्य सोलापूरकरांच्याही काळजाचा ठोका चुकला. सर्व जाती-धर्मांना घेऊन जाणारा सर्वसमावेशक नेता हरपल्याबद्दल दु:ख व्यक्त झाले. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर आले. चौकाचौकात मुंडेंची छायाचित्रे लावून गुलाबपुष्पांनी आदरांजली वाहण्यात आली.

-----------------------

प्रेमाचा अधिकार

गोपीनाथ मुंडे प्रत्येक कार्यकर्त्याशी अधिकाराने बोलत; पण तो अधिकार प्रेमाचा असे. दोन प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असल्यास ते दोघांनाही स्वतंत्रपणे भेटून प्रेमळ अधिकारवाणीने त्यांच्यात समेट घडवून आणत. खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्यावरही असाच मुंडे यांनी प्रेमाचा अधिकार गाजविला होता. अ‍ॅड. बनसोडे लोकसभेची निवडणूक लढायला तयार नव्हते. मुंडे यांच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा त्यांनी अ‍ॅड. बनसोडे यांना बोलावून घेतले अन् सांगितले, ‘तू लोकसभा निवडणूक लढणार आहेस’. मुंडे यांच्या या प्रेमळ आग्रहामुळेच अ‍ॅड. बनसोडे यांनी निवडणूक लढविली.