शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सूर्यफूल पीक विमा संरक्षणापासून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST

तालुक्यामध्ये नदीकाठ व कालवा परिसर वगळता इतर सर्व परिसर दुष्काळी पट्ट्यात येतो. यामुळे या भागातील शेती पावसावर अवलंबून आहे. ...

तालुक्यामध्ये नदीकाठ व कालवा परिसर वगळता इतर सर्व परिसर दुष्काळी पट्ट्यात येतो. यामुळे या भागातील शेती पावसावर अवलंबून आहे. खरिपामध्ये बाजरी, तूर, सूर्यफूल, मका, उडीद, कांदा, हुलगे, मटकी ही पिके घेतली जातात. आठही महसूल मंडळांमध्ये गतवर्षीपासून कापसाचा विमा भरण्याचे आवाहन केले जाते. प्रत्यक्षात मात्र तालुक्यात कापसाचे क्षेत्रच अस्तित्वात नाही. मात्र, कमी पाण्यात व चांगले उत्पन्न देणारे पीक सूर्यफुलाला विमा संरक्षणापासून वगळले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. याबाबत भाजपचे आ. समाधान आवताडे यांनी लक्ष देऊन सूर्यफुलाचा विमा संरक्षणात समावेश होण्याबाबत प्रयत्न करण्याची गरज आहे.

कोट ::::::::::::::::::

गेल्या दोन वर्षांपासून कृषी विभागाने ठेवलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त क्षेत्रावर सूर्यफूल पेरणी होत आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही बियाणाचा तुटवडा निर्माण झाला. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सूर्यफूल पेरणी केली आहे. अशा परिस्थितीत या पिकाला विमा संरक्षण देणे आवश्यक आहे.

- सोमनाथ नकाते, खते-बियाणे विक्रेते, मंगळवेढा

कापसाच्या विम्यासाठी आग्रह

कापसाचे क्षेत्र नसताना प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत विमा भरण्याचा आग्रह सरकार आणि विमा कंपनी करीत आहे. वास्तविक पाहता तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सूर्यफुलाचे क्षेत्र आहे. त्या पिकाला विमा संरक्षण का देत नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार यांनी उपस्थित केला आहे.