शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

जास्तीचा पाऊस खरिपाला घातक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:15 IST

चपळगाव मंडलातील विशेषतः चपळगाव, हन्नूर, डोंबरजवळगे, बोरेगाव, बऱ्हाणपूर, पितापूर, चुंगी, किणी, दर्शनाळ, कुरनूर, चुंगी, अरळी, बावकरवाडी, सिंदखेड, मोट्याळ, दहिटणे ...

चपळगाव मंडलातील विशेषतः चपळगाव, हन्नूर, डोंबरजवळगे, बोरेगाव, बऱ्हाणपूर, पितापूर, चुंगी, किणी, दर्शनाळ, कुरनूर, चुंगी, अरळी, बावकरवाडी, सिंदखेड, मोट्याळ, दहिटणे आदी गावांतील शेतकरी प्रामुख्याने दरवर्षी खरीप हंगामातील तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, भुईमूग, मका, बाजरी आदी पिकांचे उत्पादन घेतात. या वर्षीही खरीप पिकांवर बहुतांश शेतकऱ्यांनी भर दिला आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पडणारा रिपरिप पाऊस शेतकऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करत आहे. कोळपे मारण्यासाठी वापसाच नसल्याने या वर्षी खरीप पिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर तण वाढले आहे. परिणामी, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. औषध मारण्यासाठी उपयुक्त परिस्थिती नाही. अनेक दिवसांपासून सूर्यदर्शन नाही. यामुळे पिकांचे भवितव्य अंधारात जाणार आहे.

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात चपळगाव मंडलात सरासरीच्या २४० टक्के पाऊस पडला आहे, तर पावसाळा सुरू झाल्यापासून सरासरीच्या १७२ टक्के इतका पाऊस पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत.

----

आता आधार फक्त पीकविम्याचाच!

सद्यस्थितीत जास्तीच्या पावसाने मूग व उडीद पिकांना फटका बसला आहे. कित्येकांच्या शेतात पाणी असल्याने उभी खरीप पिके कुजत चालली आहेत. संपूर्ण वर्षाचे अर्थकारण खरीप पिकांवर अवलंबून असते. मात्र, जास्तीच्या पावसाने खरीप पिके हातून गेल्यात जमा आहेत. आता आधार आहे तो भविष्यात पीकविम्याची रक्कम मिळण्यावरच.

- बिरप्पा बंदीछोडे, कृषी व्यवसायिक, हन्नूर.

-------

230721\20210710_121826.jpg

प्रमाणापेक्षा जास्त पडलेल्या पावसाने चपळगाव मंडलातील कित्येकांच्या शेतात पाणी थांबल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत.