शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

सुक्या गवताचा तुटवडा

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

अनियमित पाऊस : पशुपालन व्यवसायावर परिणाम

महेश चव्हाण - ओटवणे --सह्याद्री पट्ट्याच्या तळाशी राहणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जवळजवळ शंभर टक्के भातशेती कापणी पूर्ण झाली आहे. मात्र, उत्पन्नाबरोबरच गवत चाऱ्याचा विचार करता पुढील वर्षी पावसाळ्यात गवतचाऱ्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा शेतकऱ्यांना जाणवणार आहे. गवत-चाऱ्याच्या या कमतरतेमुळे पशुपालन व्यवसायावरही त्याचे विपरीत परिणाम होत असून या व्यवसायाला आता उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. सह्याद्री पट्ट्यातील ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पावसाळी भातशेती करतात. पावसाळी भातशेतीवरच येथील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे आर्थिक साधन आणि गुरांसाठी गवत चारा अवलंबून असतो. यावर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे उत्पन्न तर घटलेच, शिवाय गवत चाऱ्यावरही याचा वितरीत परिणाम झाला आहे. मे-जून महिन्यात जोरदार कोसळणारा पाऊस लांबणीवर गेल्याने भातशेती उशिरा झाली. त्यामुळे साहजीकच बदलत्या वातावरणामुळे त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. त्यातच गवते डोलू लागल्यानंतर लागणाऱ्या अवेळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आणि भूमिगत झालेला गवतचारा कुजून गेला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भातशेतीत मोठ्या प्रमाणात केला जातो. कमी उंचीची आणि अधिक उत्पन्न देणारी बी-बियाणी लावली जात असल्याने या शेतीत गवताचा चारा कमी मिळतो. सह्याद्री पट्ट्याच्या गावातील लोकांची भातशेती ही अधिक प्रमाणात डोंगराळ भागातच आहे. मात्र, या भातशेतीवर जंगली प्राणी तुटून पडत असल्याने या भागातील शेती करणे शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरते. त्यामुळे येथील जमिनी अधिकतर पडीकच ठेवल्या जातात. तसेच जंगली प्राणी चारासुद्धा फस्त करू लागल्याने गुरांसाठी डोंगराळ भागातील चवदार गवत मिळणे कठीण होऊन बसले आहे. गवत हे गुरांसाठी महत्त्वाचे आणि प्राथमिक अन्न आहे. मात्र, ऐन उन्हाळी आणि पावसाच्या सुरुवातीला या गवताचा तुटवडा भासू लागतो. पुरेशा प्रमाणात गवत उपलब्ध होत नसल्याने गुरांची परवड होते. त्यामुळे गुरांना मोकाट सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. गवताच्या कमतरतेमुळे पशुपालन व्यवसायालाही आता उतरती कळा लागली आहे. याचा दुग्धोत्पादनावरही परिणाम होत आहे. शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढलीपशुपालन हा शेती व्यवसायाचा जोड धंदा. परंतु शेतीतून मिळणारे गवतच तुटपुंजे असल्याने त्याचा परिणाम पशुपालनावर होऊन गुरे मोकाट सोडण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. ही मोकाट जनावरे शहरातही दाखल होत असल्याने शहरी भागात मोकाट जनावरांची संख्या वाढू लागली आहे.