शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

सुक्या गवताचा तुटवडा

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

अनियमित पाऊस : पशुपालन व्यवसायावर परिणाम

महेश चव्हाण - ओटवणे --सह्याद्री पट्ट्याच्या तळाशी राहणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जवळजवळ शंभर टक्के भातशेती कापणी पूर्ण झाली आहे. मात्र, उत्पन्नाबरोबरच गवत चाऱ्याचा विचार करता पुढील वर्षी पावसाळ्यात गवतचाऱ्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा शेतकऱ्यांना जाणवणार आहे. गवत-चाऱ्याच्या या कमतरतेमुळे पशुपालन व्यवसायावरही त्याचे विपरीत परिणाम होत असून या व्यवसायाला आता उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. सह्याद्री पट्ट्यातील ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पावसाळी भातशेती करतात. पावसाळी भातशेतीवरच येथील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे आर्थिक साधन आणि गुरांसाठी गवत चारा अवलंबून असतो. यावर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे उत्पन्न तर घटलेच, शिवाय गवत चाऱ्यावरही याचा वितरीत परिणाम झाला आहे. मे-जून महिन्यात जोरदार कोसळणारा पाऊस लांबणीवर गेल्याने भातशेती उशिरा झाली. त्यामुळे साहजीकच बदलत्या वातावरणामुळे त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. त्यातच गवते डोलू लागल्यानंतर लागणाऱ्या अवेळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आणि भूमिगत झालेला गवतचारा कुजून गेला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भातशेतीत मोठ्या प्रमाणात केला जातो. कमी उंचीची आणि अधिक उत्पन्न देणारी बी-बियाणी लावली जात असल्याने या शेतीत गवताचा चारा कमी मिळतो. सह्याद्री पट्ट्याच्या गावातील लोकांची भातशेती ही अधिक प्रमाणात डोंगराळ भागातच आहे. मात्र, या भातशेतीवर जंगली प्राणी तुटून पडत असल्याने या भागातील शेती करणे शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरते. त्यामुळे येथील जमिनी अधिकतर पडीकच ठेवल्या जातात. तसेच जंगली प्राणी चारासुद्धा फस्त करू लागल्याने गुरांसाठी डोंगराळ भागातील चवदार गवत मिळणे कठीण होऊन बसले आहे. गवत हे गुरांसाठी महत्त्वाचे आणि प्राथमिक अन्न आहे. मात्र, ऐन उन्हाळी आणि पावसाच्या सुरुवातीला या गवताचा तुटवडा भासू लागतो. पुरेशा प्रमाणात गवत उपलब्ध होत नसल्याने गुरांची परवड होते. त्यामुळे गुरांना मोकाट सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. गवताच्या कमतरतेमुळे पशुपालन व्यवसायालाही आता उतरती कळा लागली आहे. याचा दुग्धोत्पादनावरही परिणाम होत आहे. शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढलीपशुपालन हा शेती व्यवसायाचा जोड धंदा. परंतु शेतीतून मिळणारे गवतच तुटपुंजे असल्याने त्याचा परिणाम पशुपालनावर होऊन गुरे मोकाट सोडण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. ही मोकाट जनावरे शहरातही दाखल होत असल्याने शहरी भागात मोकाट जनावरांची संख्या वाढू लागली आहे.