शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

दुष्काळाचे निकष बदलणार : मुख्यमंत्री

By admin | Updated: August 19, 2014 00:58 IST

काँग्रेस कमिटी : कार्यकर्त्यांशी संवाद

सोलापूर : सध्या प्रचलित असलेली पावसाची सरासरी करण्याची पद्धत चुकीची असल्याने दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष बदलण्याची गरज आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखविली. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवे निकष ठरविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.सोलापूर काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, कुठे जास्त तर कुठे कमी पाऊस पडतो, पावसाच्या या विसंगत आकडेवारीचा सरासरीवर परिणाम होतो. बहुतेक वेळा एकाच तालुक्यात एखाद्या गावात जोरदार पर्जन्यवृष्टी होते तर त्याच तालुक्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत असते. तरीही सरासरी वाढल्याने अवर्षणग्रस्त जनतेवर अन्याय होतो. हा अनुभव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्याची दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत बदलण्याची गरज असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत नवे निकष ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील १२३ तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली आहे. इतर तालुक्यांची आकडेवारी उपलब्ध होताच निर्णय घ्यावा लागेल असे सांगताना दुष्काळग्रस्तांना सर्व सोयी—सवलती देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविली. राज्यातील ११ जिल्ह्यांत पावसाची सरासरी ५0 टक्क्यांपेक्षा जास्त असली तर उर्वरित जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले. ------------------------------नेत्यांना चिंता...सध्याच्या दुष्काळी स्थितीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी मोहोळचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली. आ. भारत भालके यांनी मंगळवेढ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी संपूर्ण जिल्हाच दुष्काळी जाहीर करण्याची मागणी करीत मुख्यमंत्र्यांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.--------------------------------