शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

दुष्काळाचे निकष बदलणार : मुख्यमंत्री

By admin | Updated: August 19, 2014 00:58 IST

काँग्रेस कमिटी : कार्यकर्त्यांशी संवाद

सोलापूर : सध्या प्रचलित असलेली पावसाची सरासरी करण्याची पद्धत चुकीची असल्याने दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष बदलण्याची गरज आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखविली. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवे निकष ठरविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.सोलापूर काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, कुठे जास्त तर कुठे कमी पाऊस पडतो, पावसाच्या या विसंगत आकडेवारीचा सरासरीवर परिणाम होतो. बहुतेक वेळा एकाच तालुक्यात एखाद्या गावात जोरदार पर्जन्यवृष्टी होते तर त्याच तालुक्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत असते. तरीही सरासरी वाढल्याने अवर्षणग्रस्त जनतेवर अन्याय होतो. हा अनुभव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्याची दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत बदलण्याची गरज असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत नवे निकष ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील १२३ तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली आहे. इतर तालुक्यांची आकडेवारी उपलब्ध होताच निर्णय घ्यावा लागेल असे सांगताना दुष्काळग्रस्तांना सर्व सोयी—सवलती देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविली. राज्यातील ११ जिल्ह्यांत पावसाची सरासरी ५0 टक्क्यांपेक्षा जास्त असली तर उर्वरित जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले. ------------------------------नेत्यांना चिंता...सध्याच्या दुष्काळी स्थितीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी मोहोळचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली. आ. भारत भालके यांनी मंगळवेढ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी संपूर्ण जिल्हाच दुष्काळी जाहीर करण्याची मागणी करीत मुख्यमंत्र्यांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.--------------------------------