शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

कारमध्ये फिरणाऱ्यांना कर्जमाफी नको : इम्तियाज जलील यांचे मत

By admin | Updated: June 20, 2017 12:21 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, शेतकऱ्यांचा प्रश्न जाणूनबुजून लटकवला जातो़ सरकारने घेतलेला लहान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय चांगला आहे़ लहान शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळालीच पाहिजे़ आज मोठमोठ्या कारमध्ये फिरून नेते, आमदार कर्जमाफी मागत आहेत, अशांना कदापि कर्जमाफी दिली जाऊ नये, असे मत औरंगाबाद एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले़ एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी यांच्या वतीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीनिमित्त आ़ इम्तियाज जलील सोलापुरात आले होते़ त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी विविध प्रश्नांवर संवाद साधला़ यावेळी नगरसेवक अमेजा शेख, वाहिदा शेख, गाजी जहागीरदार, इरफान शेख उपस्थित होते़ प्रारंभी त्यांनी येथील कायदा, सुव्यवस्थेवर भाष्य करीत असताना महाराष्ट्रापेक्षा बिहार सुरक्षित असल्याचे म्हणाले़ पूर्वी असुरक्षित, नियमांची पायमल्ली करणारे राज्य म्हणून बिहारला ओळखले जायचे़ परंतु बिहार आज असुरक्षित आहे हा आपला गैरसमज आहे़ आज बिहारमध्ये महाराष्ट्रपेक्षा चांगली स्थिती आहे़ काही दिवसांपूर्वी नंदुरबारमध्ये एका युवकाची हत्या झाली, त्यानंतर एका ७५ वर्षीय वृद्धाला बिर्यानीचे पैसे मागितले म्हणून जिवंत जाळण्यात आले, तरीही आपण कोणी यावर काही बोलत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ यानंतर त्यांनी विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेवर भाष्य करीत असताना या यात्रेत एमआयएमलाही सहभागी होण्याचे सांगितले गेले होते. परंतु आपण सहभाग टाळल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ ऐन विधानसभेच्या तोंडावर ही संघर्ष यात्रा काढण्यात आल्याचे ते म्हणाले़ वर्षातून जेमतेम तीनवेळा विधानसभा भरवली जाते़ या काळात विरोधी पक्षाने सभागृहात उपस्थित राहणे जरुरीचे असते़ तरीदेखील याच काळात त्यांनी संघर्ष यात्रा काढली़ यादरम्यान ९ आमदारांचे निलंबनही झाले आणि सरकारचे काम संपल्यावर शेवटच्या दिवशी या आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे म्हणाले़ एमआयएम पक्ष राजकारणात सक्रिय झाल्यामुळे राजकारण्याचे धाबे दणाणले आहेत़ त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे पक्षाला अडचणीत आणण्याचे प्रकार घडत असल्याचे ते म्हणाले़