शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणी अट रद्द

By admin | Updated: July 12, 2014 00:41 IST

दिलीप सोपल : तालुक्यातील ३३ गावांचे १ कोटी ३५ लाख वाचणार

बार्शी : ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी आकारण्यात येत असलेली लोकवर्गणीची रक्कम पूर्णत: रद्द करण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयाचा अध्यादेश प्रसिद्ध झाला आहे. यापुढील काळात कोणत्याही पाणीपुरवठा योजनेसाठी लोकवर्गणी भरावी लागणार नसल्याचे सांगून यामुळे तालुक्यातील ३३ योजनांचा १ कोटी ३५ लाख रुपयांचा फायदा होणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांनी दिली़ लोकवर्गणीच्या अटीमुळे पाणीपुरवठ्याच्या योजना राबविण्यास विलंब होत होता़ केंद्राकडूनही प्राप्त होणारा निधीदेखील पर्याप्त प्रमाणात खर्च होऊ शकत नव्हता़ त्यामुळे ही लोकवर्गणीची अट रद्द करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू होते. ही अट रद्द केल्यामुळे योजना वेळेत पूर्ण होऊन योजना रखडल्यामुळे वाढत जाणारी किंमत देखील आटोक्यात येण्यास मदत होणार आहे़ योजनांचे नियोजन, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती या तिन्ही टप्प्यांमध्ये ग्रामीण जनतेचा सहभाग येत असल्यामुळे लोकसहभागदेखील अबाधित राहणार आहे़ याचा विचार करून २ जुलै रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकवर्गणीची अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ यापूर्वी ज्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांकरिता पूर्णत: अथवा अंशत: लोकवर्गणीची रक्कम जमा केली असेल तर अशी जमा रक्कम संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेस परत केली जाणार नाही़ तथापि अशा पाणीपुरवठा योजनांमधील उर्वरित लोकवर्गणीची तरतूद पाणीपुरवठा योजनांच्या किमतीमध्ये समाविष्ट करण्यात येईल़ या योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून वितरित केला जाणारा निधी चार हप्त्यात देण्यात येईल. यामध्ये पहिले तीन हप्ते ३० टक्के व चौथा हप्ता १० टक्के या प्रमाणात निधीचे वितरण करण्यात येणार आहे़ चौथ्या हप्त्याची रक्कम ही पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन एक वर्ष चालविल्यानंतर देण्यात येणार आहे़ हा अध्यादेश ९ जुलै रोजी प्रसिद्ध झाला असला तरी याची अंमलबजावणी २ जुलैपासून लागू होणार आहे़ -------------------------बार्शी तालुक्यातील या गावांना लाभबार्शी तालुक्याचा विचार केला तर १ कोटी ३५ लाख रुपये लोकवर्गणी वाचणार आहे़ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील अंबाबाईचीवाडी, बळेवाडी, बेलगाव, इर्लेवाडी, इंदापूर, कळंबवाडी पा., मळेगाव, रस्तापूर, रातंजन , सर्जापूर, वैराग, येळंब, बावी, हत्तीज, मानेगाव, चुंब, धामणगाव, पिंपळगाव पा., पिंपरी आर., सुर्डी व उंडेगाव योजना मंजूर झालेल्या आहेत़ या योजनांसाठी ११ कोटी ६५ लाख रुपये निधी मंजूर आहे. तसेच या योजनेची कामे प्रत्यक्षात सुरू झालेली आहेत. मात्र त्याचा हप्ता अद्याप मागितलेला नाही. त्यामुळे या योजनांसाठी भरावी लागणारी दहा टक्के लोकवर्गणी वाचणार असून, यामुळे या गावांचे १ कोटी १६ लाख ५० हजार रुपये तर अलिपूर, भांडेगाव, इर्ले, काळेगाव, कापसी, निंबळक, पानगाव, पाथरी, पिंपरी पान, तावरवाडी व खामगाव या गावात ३ कोटी ७० लाख रुपयांची कामे सुरू आहेत़ या योजनांचादेखील पाच टक्के याप्रमाणे १८ लाख ५० हजार रुपये फायदा होणार आहे़