शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

सर्वाधिक कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यात साखर उता-यात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:34 IST

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा साखर उताऱ्यात नेहमीच आघाडीवर असतो. यंदा सरासरी ११.८३ टक्के असला तरी सध्या १२.८४ टक्के असल्याने ...

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा साखर उताऱ्यात नेहमीच आघाडीवर असतो. यंदा सरासरी ११.८३ टक्के असला तरी सध्या १२.८४ टक्के असल्याने हंगाम संपेपर्यंत १३ टक्के होईल. सोलापूर जिल्ह्याचा एकूण सरासरी उतारा ९.२३ टक्के तर आजचा उतारा १०.६८ टक्के आहे. हंगाम संपत आला तरी एकूण साखर उतरण्याची टक्केवारी १० च्या आतच राहिली.

बी-हेवी मळीच्या निर्मितीकडे कल आसवनी (डिस्टिलरी) प्रकल्पांची संख्या वाढत आहे. त्यांना मळी (मोलॅसिस) पुरवठा करण्याकडे कारखान्यांचा कल आहे. मळीमध्ये १५ ते २० टक्के रसाचे प्रमाण राखून ही मळी आसवनी प्रकल्पांना इथेनॉल निर्मितीसाठी विकली जात आहे. त्याला चांगला दर मिळत आहे. सी-हेवी मळीपेक्षा प्रतिटन दोन हजार रुपये कारखान्यांना जादा मिळत असल्याने बी-हेवी मळी विकण्याकडे अधिक कल आहे. मळीसोबत साखर गेल्याने उताऱ्यात १ ते १.५० टक्क्यांची घट होत आहे. साखर उतारा घटनेचे प्रमाण

कोल्हापूर जिल्ह्यात कोएम-०२६५ जातीच्या उसाची लागवड होते, परंतु ऊस परिपक्व झाल्याशिवाय किमान १५ महिन्यानंतर कारखाने गाळपाला घेतात. त्यामुळे साखर उतारा वाढतो. सोलापूर जिल्ह्यात कोएम-०२६५ जातीचा ६० टक्के ऊस आहे. हंगाम सुरू झाल्यासांपासून हाच ऊस गाळपाला घेण्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी तो परिपक्व होण्यापूर्वी १० व्या महिन्यातच गाळपाला पाठवतात. त्यात साखरेचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळेही साखर उताऱ्यात घट होते.

गाळपासाठी कारखान्यात स्पर्धा

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता अधिक आहे. गाळप क्षमतेच्या तुलनेत जिल्ह्यात ऊस लागवड कमी आहे. त्यामुळे कारखाने मिळेल तो ऊस गाळपाला नेण्यासाठी स्पर्धा करतात. सर्वाधिक कोएम -०२६५ जातीचा ऊस असल्याने तोच स्वीकारावा लागतो. या ऊसाचे वजन चांगले मिळते म्हणून शेतकरी तोच निवडतात, पण कारखान्यांना तो परवडत नाही. तोडणी कामगार, वाहतूकदार यांचीही पसंती याच जातीच्या ऊसाला असते. उताऱ्यात त्याचा फटका बसतो.

असा आहे जिल्हानिहाय साखर उतारा

जिल्हा आजचा उतारा एकूण साखर उतारा

कोल्हापूर १२.८४ ११.८४

सांगली ११.०८ ११.५६

सातारा १२.६० १०.८५

पुणे १०.९१ १०.२५

सोलापूर १०.६८ ९.२३