शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

संस्थात्मक पडझडीने काँग्रेसला फटका..

By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST

पृथ्वीराज पाटील : आत्मचिंतन करण्याची गरज

सांगली : वसंतदादा पाटील यांनी उभारलेल्या सहकारी संस्था, बँका तसेच शहरातील पतसंस्था बंद पडल्यामुळे सांगली शहर व परिसराची आर्थिक अधोगती झाली. त्यातच गटबाजीचाही फटका बसल्याने गेल्या २९ वर्षांत काँग्रेसला सांगली विधानसभा मतदारसंघात अपवाद वगळता यश मिळू शकले नाही, असे मत प्रदेश काँग्रेसचे सदस्य पृथ्वीराज पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले की, लोकांना आता बदल हवा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे आकडे पाहिले, तर या गोष्टी लक्षात येतील. सांगली विधानसभा मतदारसंघात कधीकाळी वसंतदादा पाटील ज्याला उमेदवारी द्यायचे, त्याचा विजय व्हायचा. पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांनाही त्यावेळी संधी मिळत होती. १९८५ नंतर आजअखेर पक्षाला सांगली मतदारसंघात एक अपवाद वगळता विजय मिळू शकलेला नाही. त्याची अनेक कारणे आहेत. कारखाना, सूतगिरणी, बँका, पतसंस्था या माध्यमातून वसंतदादांनी निर्माण केलेल्या सहकार चळवळीला मोठा धक्का बसला आहे. अनेक संस्था बंद पडल्याने हजारो लोकांचा रोजगार गेला. साहजिकच त्यांचा संताप पक्षावर निघाला. या बाबींवर कधीही गांभीर्याने विचार झाला नाही. अनेक वर्षांपासून काँग्रेसला गटबाजीचाही मोठा फटका बसला आहे. आजअखेर ही गटबाजी कायम आहे. पक्षांतर्गत कुरघोड्या रोखण्यातही यश आलेले नाही. पूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो काही वर्षांपूर्वी ढासळला. त्यानंतर वारंवार पक्षाला पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे या गोष्टींचा विचार आता पक्षीय पातळीवर होणे आवश्यक आहे. त्याच त्या चेहऱ्यांना जनता वैतागली आहे. त्यांना नवा चेहरा हवा आहे. गुणवत्ता पाहून पक्षाकडून उमेदवार निवडला जावा, अशी आमची मागणी आहे. काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मीही अर्ज दाखल केला आहे. उमेदवारांच्या संस्थात्मक, पक्षीय कार्याचा विचार करताना, तो स्वच्छ चारित्र्याचा, सुशिक्षित असावा, याचा विचार केला जावा, अशी आमची मागणी आहे. (प्रतिनिधी)