शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

संस्थात्मक पडझडीने काँग्रेसला फटका..

By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST

पृथ्वीराज पाटील : आत्मचिंतन करण्याची गरज

सांगली : वसंतदादा पाटील यांनी उभारलेल्या सहकारी संस्था, बँका तसेच शहरातील पतसंस्था बंद पडल्यामुळे सांगली शहर व परिसराची आर्थिक अधोगती झाली. त्यातच गटबाजीचाही फटका बसल्याने गेल्या २९ वर्षांत काँग्रेसला सांगली विधानसभा मतदारसंघात अपवाद वगळता यश मिळू शकले नाही, असे मत प्रदेश काँग्रेसचे सदस्य पृथ्वीराज पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले की, लोकांना आता बदल हवा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे आकडे पाहिले, तर या गोष्टी लक्षात येतील. सांगली विधानसभा मतदारसंघात कधीकाळी वसंतदादा पाटील ज्याला उमेदवारी द्यायचे, त्याचा विजय व्हायचा. पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांनाही त्यावेळी संधी मिळत होती. १९८५ नंतर आजअखेर पक्षाला सांगली मतदारसंघात एक अपवाद वगळता विजय मिळू शकलेला नाही. त्याची अनेक कारणे आहेत. कारखाना, सूतगिरणी, बँका, पतसंस्था या माध्यमातून वसंतदादांनी निर्माण केलेल्या सहकार चळवळीला मोठा धक्का बसला आहे. अनेक संस्था बंद पडल्याने हजारो लोकांचा रोजगार गेला. साहजिकच त्यांचा संताप पक्षावर निघाला. या बाबींवर कधीही गांभीर्याने विचार झाला नाही. अनेक वर्षांपासून काँग्रेसला गटबाजीचाही मोठा फटका बसला आहे. आजअखेर ही गटबाजी कायम आहे. पक्षांतर्गत कुरघोड्या रोखण्यातही यश आलेले नाही. पूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो काही वर्षांपूर्वी ढासळला. त्यानंतर वारंवार पक्षाला पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे या गोष्टींचा विचार आता पक्षीय पातळीवर होणे आवश्यक आहे. त्याच त्या चेहऱ्यांना जनता वैतागली आहे. त्यांना नवा चेहरा हवा आहे. गुणवत्ता पाहून पक्षाकडून उमेदवार निवडला जावा, अशी आमची मागणी आहे. काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मीही अर्ज दाखल केला आहे. उमेदवारांच्या संस्थात्मक, पक्षीय कार्याचा विचार करताना, तो स्वच्छ चारित्र्याचा, सुशिक्षित असावा, याचा विचार केला जावा, अशी आमची मागणी आहे. (प्रतिनिधी)