शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

कारवाईच्या भीतीने नागरिक फिरकेना, दुकाने उघडूनही व्यवसाय होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:23 IST

अक्कलकोट : कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घातले. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा व खाद्यपदार्थ वगळता सर्वप्रकारची दुकाने बंद ...

अक्कलकोट : कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घातले. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा व खाद्यपदार्थ वगळता सर्वप्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले, मात्र कारवाईच्या भीतीने नागरिक फिरकत नाहीत. त्यामुळे आमची अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडूनही व्यवसाय होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील लोक पोलीस कारवाई करतील शिवाय सर्व दुकाने बंद असल्याने शहरात येण्याचे टाळत आहेत. एका कामासाठी आल्यानंतर अनेक कामे करून ग्रामीण भागातील नागरिक परततात. परंतु, सध्या अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत, परंतु ग्राहकांअभावी त्यांच्याही व्यवसाय होत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडून काय उपयोग? असा प्रश्न या व्यापाऱ्यांमधून विचारला जात आहे.

कोट:-

अक्कलकोट येथे २५ ते ३० फळविक्रेते आहेत. इतर वेळेला दिवसभर कमी-जास्त ग्राहक असतात. मागील तीन दिवसांपासून शासनाने कडक निर्बंध घातल्याने म्हणावा तसा व्यापार होत नाही. केवळ सकाळी थोडेफार नागरिक येतात. त्यानंतर दुपारी शांतता असते. बाजारपेठ पूर्णपणे सुरू असेल तरच दिवसभर ग्राहक असतात. फळे वेळेवर विक्री होत नसल्याने खराब होऊन आर्थिक नुकसान होत आहेत.

- जलील बागवान, फळविक्रेता

कोट:-

सध्या उन्हाळा आहे. यामुळे खत, बी-बियाणांची विक्री होत नाही. तसेच कोरोनामुळे तालुक्यात सर्वच रस्त्यावर पोलीस कारवाईसाठी तैनात आहेत. यामुळे शेतकरी येण्याचे टाळतात. दुकाने दिवसभर उघडी ठेवली तरी पूर्वीच्या तुलनेत केवळ २५ टक्केच व्यापार होत आहे. यामुळे दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे.

- आप्पासाहेब पाटील

अध्यक्ष, खत बी-बियाणे दुकानदार संघटना

फोटो

०८ अक्कलकोट - दुकान

ओळी

केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी दिली आहे. मात्र, अन्य दुकाने बंद असल्याने फळविक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.