शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

प्रतापगडाचे सौंदर्य वीजवाहिन्यांनी झाकोळले

By admin | Updated: December 9, 2014 01:24 IST

जावळी जिंकून स्वराज्याचा विस्तार केला. प्रतापगडची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत रोमांचकारी घटना मानली जाते.

अजित जाधव- महाबळेश्वर -जावली म्हणजेच जयवल्ली. ‘येता जावली जाता गोवळी’ म्हणून मिरवली गेलेली चंद्रराव उपाधी धारण करणाऱ्या मोऱ्यांची राजधानी. शिवरायांनी ज्याचा बीमोड केला, जावळी जिंकून स्वराज्याचा विस्तार केला. प्रतापगडची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत रोमांचकारी घटना मानली जाते. याच गडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध करून शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार केला. अशा या छत्रपतींच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडाचे सौंदर्य वीजवाहिन्यांच्या जाळ्यात झाकोळले. दरवर्षी लाखोंच्या सख्येने पर्यटक व शालेय सहली प्रतापगडला भेट देतात. गडावर जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागते. अवघे चार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी चार तास लागतात. वाडा-कुंभरोशी ते प्रतापगड हा रस्ता १९५७ मध्ये बनविण्यात आला होता. त्यावेळी आतासारखी वाहतूक नव्हती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. रस्ता रुंदीकरणाची गरज आहे. यासाठी २०१३ मध्ये ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप कामास सुरुवात नाही. प्रतापगडावर १६६१ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते भवानीमातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. राज्याभिषेकापूर्वी शिवराय भवानीच्या दर्शनासाठी आले. १९ मे १६७४ रोजी त्यांनी ५६ हजारांचे सुवर्णछत्र अर्पण केले होते. किल्ल्यावर पश्चिम भागात कडेलोट पॉर्इंट आहे. तेथून रायगड जिल्ह्यातील खेडी दिसतात. ध्वजा बुरुज, तलावाचा बुरुज, अफजल खान बुरुज, रेडका बुरुज, यशवंत बुरुज, केदारेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, चोरवाटा, दरबारी जागा, पाण्याची तळी हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. पंडित नेहरुंच्या हस्ते उभारला पुतळा प्रतापगडावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते १९५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला.त्यानंतर वनविभागाने पुतळा परिसरात बागबगीचा तयार करून सुशोभीकरण करण्यात आले आहे.गडाच्या पायथ्याला असलेल्या वाहनतळावर शंभर ते दीडशे वाहने उभी राहू शकतात. मात्र, पर्यटकांचा हंगाम असेल त्यावेळी गडावर तीनशे ते चारशे वाहने दाखल होतात. त्यावेळी मोठी अडचण निर्माण होते. वाहनतळाची जागा ही वनविभागाकडे असल्याने येथे वाहनतळ वाढविण्यास जागा मिळत नाही.