शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

पोलिसांच्या विरोधात सोमवारी बार्शी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:27 IST

त्यांनी दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, मागील एक महिन्यापूर्वी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रामदास ...

त्यांनी दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, मागील एक महिन्यापूर्वी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रामदास शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बार्शीत हजर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शहरात फेरफटका मारताना येथील नागरिक व व्यापाऱ्यांना शिस्त नाही, असे सांगत शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा इरादा बोलून दाखविला होता. या संदर्भात त्यांनी मागील १० दिवसांपासून रस्त्यावर दुकानासमोर उभी असलेली वाहने, दुकानाच्या बाहेर आलेली अतिक्रमणे लक्ष्य करून शहरात पेट्रोलिंग सुरू केले होते. मात्र हे करीत असताना त्यांनी व्यापाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे, माणसात अपमानित करणे असे प्रकार सुरू केले होते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

तसेच ऐन गणेशोत्सव व गौरीच्या सणाच्या काळात त्यांनी रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे छोटे विक्रेते, हातगाडीवाले यांनादेखील टार्गेट केले होते. त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या आदल्या दिवशी बंद करण्याची बैठक घेऊन व्यापाऱ्यांनी निश्चित केले होते. मात्र आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी यांनी त्यात मध्यस्थी करून सणाच्या काळात बंद करू नका, आपण पोलीस, नगरपालिका प्रशासन व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते.

...............

गेल्या आठ-दहा दिवसांपासून बार्शी शहर पोलिसांकडून गेल्या पाच-पन्नास वर्षापासून रस्त्यावर बसून पोट भरणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना त्रास देणे, व्यापाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणे, त्यांना अपमानित करणे असे प्रकार सुरू आहेत. गेल्या ५० वर्षांपासून रत्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या या छोट्या विक्रेत्यांनी काय करायचे? व्यापाऱ्यांना काही किमत आहे की नाही? पोलिसांची भाषा बरोबर नाही, त्यामुळे या निषेधार्ह सोमवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

- सुभाष लोढा, अध्यक्ष व्यापारी महासंघ

................

मी व्यापाऱ्यांना शहरातील वाहतुकीच्या कोंडीच्या संदर्भात बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय घेऊ असे सांगितले होते. यानंतरही त्यांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. अद्याप तरी माझ्याकडे याबाबत काही लेखी निवेदन वगैरे आलेले नाही.

रामदास शेळके, पोलीस निरीक्षक, बार्शी शहर