शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नीरा खोऱ्यातील सर्व धरणे झाली ‘ओव्हरफ्लो’; १०० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:28 IST

नीरा नदी खोऱ्यात वीर, भाटघर, नीरा-देवघर आणि गुंजवणी ही चार धरणे येतात. मागील दहा दिवसांत नीरा खोऱ्यात संततधार पाऊस ...

नीरा नदी खोऱ्यात वीर, भाटघर, नीरा-देवघर आणि गुंजवणी ही चार धरणे येतात. मागील दहा दिवसांत नीरा खोऱ्यात संततधार पाऊस कोसळला अन् चारही धरणे १५ सप्टेबर रोजी शंभर टक्के भरली. परंतु पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी या धरणातून सातत्याने पाणी सोडण्यात आले. भाटघर धरण १०० टक्के भरले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता २३.५० टीएमसी इतकी आहे. एकूण पाणीसाठा ६२३.२६ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. १५ सप्टेंबरअखेरपर्यंत ६८४ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. नीरा नदीत ४,४२४ क्यूसेकपाण्याचा विसर्ग केला आहे.

वीर धरण १०० टक्के भरले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ९.४१ टीएमसी इतकी आहे. एकूण पाणीसाठा ५७६.८५ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. १५ सप्टेंबरअखेरपर्यंत ३२५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नीरा नदीत १३,९११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. नीरा-देवधर धरण १०० टक्के भरले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ११.७३ टीएमसी इतकी आहे. एकूण पाणीसाठा ६६७.१० दशलक्ष घनमीटर एवढा आहे. १५ सप्टेंबर अखेरपर्यंत २३०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नीरा नदीत ७५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. गुंजवणी धरण १०० टक्के भरले असून पाणी साठवण क्षमता ३.६९ टीएमसी इतकी आहे. एकूण पाणीसाठा ७२७.१० दशलक्ष घनमीटर एवढा आहे. १५ सप्टेंबरअखेरपर्यंत १५५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नीरा नदीत २०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. दरम्यान, नीरा खोऱ्यातील नीरा-देवघर, भाटघर, वीरपाठोपाठ गुंजवणी धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील लाखो हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे.

धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (१५ सप्टेंबर २०२१ पर्यंत)

प्रकल्पाचे नाव : उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये) : टक्केवारी

भाटघर : २३.५० : १०० टक्के

नीरा देवघर : ११.७३ : १०० टक्के

वीर : ९.४१ : १०० टक्के

गुंजवणी : ३.६९ : १०० टक्के