शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सन्मान योजनेतील पात्र शेतकºयांच्या खात्याची पडताळणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:30 IST

पाच लाखांवर शेतकरी: अकरा हजार खात्यांमध्ये माहिती भरणे सुरू

ठळक मुद्देशेतकरी सन्मान योजनेतील काम गेल्या दोन महिन्यांपासून जलदगतीने जिल्हा प्रशासनाकडून सुरूजिल्ह्यात ८ - अ नुसार एकूण ११ लाख १४ हजार ९५ इतकी खातेदार शेतकºयांची संख्याएप्रिलअखेर २ लाख ६0 हजार ८२८ शेतकरी कुटुंबाची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली

सोलापूर :  केंद्र शासनाच्या  पीएफएमएस संस्थेकडून  (पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम) प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्याची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली असून यानंतर अंतिम यादीनुसार योजनेतील शेतकºयांना सन्मान निधी थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

शेतकरी सन्मान  योजनेतील काम  गेल्या दोन महिन्यांपासून जलदगतीने जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यात ८ - अ नुसार एकूण ११ लाख १४ हजार ९५ इतकी खातेदार शेतकºयांची संख्या आहे. यामध्ये कृषी सन्मान योजनेस पात्र ठरलेले शेतकरी ५ लाख १३ हजार ११ इतके आहेत. एप्रिलअखेर २ लाख ६0 हजार ८२८ शेतकरी कुटुंबाची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. यानंतर पुन्हा उर्वरित पात्र शेतकरी कुटुंबांची  माहिती अपलोड  करण्यात येत आहे. आतापर्यंत ५ लाख २ हजार ६४ इतक्या शेतकºयांची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अद्याप १0 हजार ९४७ इतक्या शेतकºयांची माहिती अपलोड करण्याचे काम शिल्लक राहिले आहे.

यासाठी शेतकºयांकडील नोंदी, बँक खाते व इतर बाबींमुळे हे काम शिल्लक राहिले आहे. येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील पात्र शेतकºयांची माहिती शासनाच्या एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम ९८ टक्के झाले आहे. 

आता शेवटच्या टप्प्यात एकत्रित कुटुंबात सातबारावर असलेली अनेक नावे, गाव सोडून इतरत्र गेलेल्या खातेदारांच्या बँक खात्याची माहिती मिळणे अवघड झाले आहे. संबंधित शेतकºयांच्या कुटुंबातील सदस्यांना याबाबतची कल्पना देऊन हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. 

काय होणार तपासणी?- जिल्ह्यातून एनआयसी पोर्टलवर अपलोड झालेल्या पात्र शेतकºयांचा डाटा केंद्र शासनाच्या पीएफएमएस या संस्थेकडून तपासण्यात येणार आहे. तपासणीमध्ये शेतकºयांचे बँक खाते आणि त्यांनी दिलेल्या खातेनंबरच्या बँकांच्या आयएफएससी कोडची पडताळणी केली जाणार आहे. या तपासणीमुळे शेतकºयांच्या नावेच पैसे जमा होणार आहेत. पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेत चुका होऊ नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय